मुंबईतील वायू प्रदूषण रोखण्यात त्रुटी आढळल्यास सहाय्यक आयुक्तांवर कारवाई

उच्च न्यायालयाचा इशारा


मुंबई : मुंबईसह आजूबाजूच्या परिसरातील वायू प्रदूषण रोखण्यातील कारवाईमध्ये त्रुटी किंवा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीत कोणतीही कमतरता आढळल्यास, मुंबई महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उच्च न्यायालयाने दिला.


मुंबईतील खालावलेली हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी अमूलाग्र बदल करण्याची गरज असल्याचे अधोरेखीत करून परिस्थिती आणखी बिघडणार नाही याची खात्री करण्यासाठी एका यंत्रणेची आवश्यकता मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ६ नोव्हेबर २०२३च्या आदेशाची आठवण करून देताना प्रामुख्याने व्यक्त केली. दोन वर्षांपूर्वीच्या आदेशानुसार, धूळ पसरणार नाही यासाठी बांधकामस्थळांभोवती पुरेशा उंचीच्या धातूचे पत्रे लावणे, बांधकाम, रस्ते पुनर्बांधणीस्थळी सतत पाणी शिंपडणे, साठवलेल्या ढिगाऱ्यांवर आणि कचऱ्यावर, राडारोडा वाहून नेणाऱ्या अवजड वाहनांवर आवरण घालणे यासह अन्य उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले होते.


तसेच, या उपाययोजना करूनही हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा न झाल्यास बांधकामस्थळी लागणाऱ्या बांधकाम साहित्याच्या वाहतुकीवर बंदी घालण्याचा इशारा न्यायालयाने दिला होता. आदेशांच्या अंमलबजावणीतील कोणत्याही त्रुटीसाठी प्रभागांचे सहाय्यक आयुक्त वैयक्तिकरित्या जबाबदार असतील आणि दोषी अधिकाऱ्यांची माहिती देण्याचे आदेशही महानगरपालिका आयुक्तांना दिले होते. तथापि, या आदेशांकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष करून त्याचे उल्लंघन केले आहे. परिणामी, मागील दोन वर्षांत हवा प्रदूषणाची परिस्थिती बदलेली नाही, असा ठपका मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने आदेशात ठेवला. त्यामुळे महापालिकेकडून अशा चुका पुढेही सुरू राहिल्या, तर मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीतील चुका किंवा त्रुटींसाठी जबाबदार असलेल्या संबंधित प्रभागाच्या सहाय्यक महानगरपालिका आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.


मुंबई शहर उपनगरातील खराब हवेच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त करणाऱ्या याचिकांवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने दिलेल्या सविस्तर आदेशाची प्रत नुकतीच उपलब्ध झाली. शहरातील वाढत्या वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याबद्दल मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने महापालिकेला धारेवर धरले होते आणि मुंबईसारख्या शहरात १,००० कोटी रुपयांचे खर्चाच्या १२५ मोठ्या प्रकल्पांना मंजुरी दिल्यावर प्रश्न उपस्थित केला होता. तसेच, परिस्थिती पालिकेच्या नियंत्रणाबाहेर गेल्याचे ताशेरेही ओढले होते.


Comments
Add Comment

Maharashtra school holiday : मुसळधार पावसाचा इशारा; मुंबईसह अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना आज सुट्टी

मुंबई : राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कायम असल्याने अनेक जिल्ह्यांमध्ये खबरदारीचा उपाय म्हणून शाळा आणि

Breaking News : मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा; सलग दुसऱ्या दिवशी शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर

मुंबई : मुंबई महापालिकेने सलग दुसऱ्या दिवशी म्हणजे उद्या मंगळवार ७ जुलै २०२६ रोजी सर्व शासकीय, खासगी,

Dadar Tree Collapse : दादरमध्ये भलंमोठं झाड कोसळलं! प्लाझाजवळ पार्क केलेल्या कारचा चक्काचूर; अग्निशमन दलाकडून मदतकार्य सुरू

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये गेल्या

BMC Park : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! महापालिकेची सर्व उद्याने उद्या बंद राहणार; जोरदार वारे आणि पावसाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शहरातील अनेक

Mumbai Rain : मुंबईत मुसळधार पावसाचा तडाखा! २९१ ठिकाणी झाडे कोसळली, २२ ठिकाणी भिंती-घरांचे नुकसान; पुढील २४ तास अतिवृष्टीचा इशारा

मुंबईत सोमवारी (६ जुलै) दिवसभर मुसळधार पावसाने हजेरी लावली असून शहरातील जनजीवनावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे.

Girish Mahajan : अतिवृष्टीमुळे घडलेल्या सर्व घटनांची चौकशी होणार, नागरिकांनी सतर्क राहावे : मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार आणि अतिवृष्टीमुळे विविध ठिकाणी दरडी कोसळणे, झाडे पडणे आणि इमारतींचे