रामदास आठवले यांची मुंबईत १४ ते १५ जागांची मागणी

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आपल्या पक्षासाठी १४ ते १५ जागांची मागणी केली आहे. रिपाइंचे संख्याबळ कमी असले, तरी ज्यांच्या सोबत आरपीआय असतो, त्यांचेच सरकार सत्तेत येते, असा दावा करत त्यांनी महायुतीकडून सन्मानजनक जागा मिळतील अशी अपेक्षा व्यक्त केली. माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले, "आरपीआय पूर्वी काँग्रेससोबत होता तेव्हा काँग्रेसचे सरकार आले. नंतर शिवसेनेसोबत गेल्याने युतीचे सरकार सत्तेत आले. त्यामुळे आम्हाला सन्मानजनक जागा मिळाल्याच पाहिजेत." तसेच, मुंबईतील राजकीय स्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, मुंबईत ४० टक्के मराठी आणि ६० टक्के परप्रांतीय मतदार आहेत. मराठी मतदारांमध्येही महायुतीला मतदान करणारे मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे मनसेसोबतची युती उबाठा गटाला फळणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
Comments
Add Comment

Borivali : बोरीवलीतील पंजाबी गल्लीतील डायग्नोस्टीक सेंटर खासगी संस्थेकडे

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्यावतीने अनेक रुग्णालये खासगी संस्थांना चालवण्यास देण्याचा निर्णय

Mumbai : मौलाना शौकत अली मार्गावरील अनधिकृत फर्निचर विक्रेत्यांवर कारवाई, चालवला बुलडोझर

मुंबई(विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या ‘ई’ विभाग अंतर्गत मौलाना शौकत अली मार्गावरील जुने फर्निचर

'स्थानिक माथाडी भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य द्या'

मुंबई : राज्यात कुठल्याही आस्थापनेत माथाडी कामगारांची आवश्यकता असल्यास त्या ठिकाणी स्थानिक माथाडी भूमिपुत्र

Nari Shakti : संसदेत ३३ टक्के महिला आरक्षण मिळेपर्यंत हा लढा थांबणार नाही!

वरळीतील ‘जन आक्रोश’ मेळाव्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांना इशारा मुंबई : "महिला आरक्षण

Baramati : बारामतीच्या सभेत मुख्यमंत्र्यांनी केला अजित पवारांच्या कार्याचा गौरव, सुनेत्रा पवारांसाठी केला जोरदार प्रचार

बारामती : अजित पवारांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात २३ एप्रिल रोजी पोटनिवडणूक

Kerala Massive Explosion : फटाक्यांच्या गोदामात भीषण स्फोट; ६ जणांचा मृत्यू

केरळच्या त्रिशूर जिल्ह्यातील मुंडाथिकोड गावात फटाक्यांच्या गोदामात भीषण आग आणि स्फोटाची घटना घडली आहे. या