पद्म पुरस्कार, भारतरत्न उपाधी नव्हे; ते नावाआधी लावता येणार नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय


मुंबई : पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण आणि भारतरत्न हे नागरी पुरस्कार उपाधी नाहीत असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे, ते एखाद्या व्यक्तीच्या नावापूर्वी किंवा नंतर वापरता येत नाहीत. न्यायालयाने एका याचिकेच्या केस शीर्षकात ‘पद्मश्री’ शब्दाच्या वापराबद्दल हे निरीक्षण नोंदवले. न्यायमूर्ती सोमशेखर सुंदरेसन यांच्या खंडपीठासमोर याचिकेची सुनावणी सुरू होती. २००४ मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेले डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर हे देखील एक पक्ष होते. त्यांचे नाव केस शीर्षकात ‘पद्मश्री डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर’ असे सूचीबद्ध केले होते. न्यायाधीशांनी यावर आक्षेप घेत म्हटले की, हे कायद्यानुसार बेकायदेशीर आहे, असे स्पष्ट केले.


उच्च न्यायालयाने १९९५ च्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या निर्णयाचा हवाला दिला. त्या निर्णयात, सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे म्हटले होते की पद्म पुरस्कार आणि भारतरत्न ही उपाधी नाही आणि नावापूर्वी किंवा नंतर वापरली जाऊ नयेत. न्यायमूर्ती सुंदरेसन यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय संविधानाच्या कलम १४१ अंतर्गत सर्वांना लागू आहे आणि त्याचे काटेकोरपणे पालन केले पाहिजे. पुढील कायदेशीर कार्यवाहीमध्ये सर्व पक्ष आणि न्यायालये या नियमाचे पालन करतील, असे निर्देश त्यांनी दिले.


पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात


देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी पद्म पुरस्कार तीन श्रेणींमध्ये दिले जातात. पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण. हे पुरस्कार कला, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, व्यवसाय, उद्योग, वैद्यक, साहित्य, शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा अशा विविध क्षेत्रांतील उत्कृष्टतेसाठी दिले जातात. २०२५ मध्ये एकूण १३९ व्यक्तींना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले होते. ७ पद्मविभूषण, १९ पद्मभूषण आणि ११३ पद्मश्रींचा समावेश होता.

Comments
Add Comment

Mumbai ATS Raid : दहशतवादी संघटनांशी संबंध, मुंबईत अभियांत्रिकी विद्यार्थ्याला अटक

मुंबई : दहशतवादी संघटनांशी असलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) २१

अनिल अंबानी आणि रिलायन्स पॉवर लिमिटेडशी संबंधित अनेक कंपन्यांवर ईडीचे छापे

मुंबई : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या समूहाची कंपनी असलेल्या रिलायन्स पॉवर लिमिटेडच्या मनी लाँड्रिंग चौकशीचा

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प दुपारी दोन वाजता सादर होणार

मुंबई : महाराष्ट्राचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा अर्थसंकल्प आज

जाणून घ्या आजच्या संकष्टी चतुर्थीची वेळ, शुभमुहूर्त आणि व्रत करण्याचे फायदे

मुंबई : हिंदू कालगणनेत संकष्टी चतुर्थी ही प्रत्येक महिन्यात येते. त्या महिन्यांनुसार संकष्टीचे महत्वही वेगळे

स्थायी समितीतील ‘अंडरस्टँडिंग’ला पूर्णविराम; भाजपची सत्ता येताच यापूर्वीच्या भ्रष्टाचाराला आमंत्रण देणाऱ्या अनिष्ठ प्रथा करणार बंद

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीत (स्टॅंडिंग कमिटी) यापुढे कोणतेही ‘अंडरस्टँडिंग’ खपवून घेतले जाणार

MHADA App: म्हाडाच्या मोबाईल ॲपचा शुभारंभ; आता सर्व सेवा फक्त एका क्लिकवर

मुंबई: सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र अधिकारिणीने (म्हाडा) आता