नाताळ ते नवरात्रीपर्यंत तुळजीभवानी रेफरल पेड दर्शन बंद; प्रशासनाचा निर्णय

धाराशिव : श्री तुळजाभवानी देवीच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. हा नवरात्र उत्सव २८ डिसेंबर ते ३ जानेवारी या कालावधीत पार पडणार आहे. याचदरम्यान, नाताळ तसेच नववर्ष, असा तिहेरी योग साधून देवीच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ सुरू झाला आहे. नाताळपासून गर्दीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने मंदिर प्रशासनाने काही बदल केले आहेत. यात प्रामुख्याने २०० रुपयांचे सामान्य दर्शन पासेस तसेच याच किमतीत उपलब्ध होणारे रेफरल पेड दर्शन पासेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जेणेकरून सर्वसामान्य भाविकांना लवकर व सुलभतेने दर्शन होऊ शकेल. सोबतच दर्शन सुलभतेसाठी २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर धर्मदर्शन व मुखदर्शन घेणाऱ्या भाविकांना बीडकर पायऱ्यांमार्गे दर्शनमंडपात सोडण्यात येणार असल्याचेही मंदिर प्रशासनाने कळवले आहे.


शाकंभरी नवरात्र महोत्सव कालावधीत रेफरल पासेस बंद केले असले तरी ५०० रुपयांचे स्पेशल देणगी दर्शन पासेस मात्र उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रशासकीय कार्यालयाच्या तळ मजल्यातून हे पासेस वितरित होतील. या पासधारक भाविकांना तसेच सिंहासन/अभिषेक पूजा पासधारकांना राजे शहाजी महाद्वारातूनच मंदिरात सोडले जाणार असल्याचे प्रशासनाने कळवले आहे.

Comments
Add Comment

Ramdas Athawale : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल महामहीम जिष्णू देव वर्मा यांची रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय

Israel Attacks Lebanon : होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद; ट्रम्प अडचणीत? इस्रायलच्या कारवाईमुळे इराण आक्रमक

तेहरान : अमेरिका आणि इराण यांच्यातील शस्त्रसंधीनंतर मध्यपूर्वेतील तणाव कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात

Middle East War : इस्रायलचा लेबनॉनवर हल्ला; ८९ ठार, इराणचा अमेरिकेला थेट इशारा

तेहरान : मध्यपूर्वेतील तणाव पुन्हा एकदा चिघळताना दिसत आहे. इस्रायलने लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांमध्ये मोठी

Bhondubaba Ashok Kharat : भोंदू खरातविरोधात तक्रारींचा महापूर, लैंगिक शोषणाचे आणखी ११ आरोप

मुंबई : वासनांध अशोक खरात प्रकरण दिवसेंदिवस अधिक गंभीर होत असून, तक्रारींची संख्या सातत्याने वाढताना दिसत आहे.

Bmc News, Andheri Subway : अंधेरी सब वे मधील पावसाचे तुंबणारे पाणी,  महापौरांनी  रेल्वेशी समन्वय राखून गती देण्याचे महापालिकेला दिले निर्देश

मुंबई : अंधेरी भूयारी मार्ग हा अतिसखल परिसर असल्याने पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा होतो. त्यावर

Bmc News : मुंबईत यापूर्वी खरेदी केलेल्या कचरा पेट्या गेल्या कुठे? महापालिका प्रशासनावर स्थायी समितीची प्रश्नांची सरबती

खासगी कंत्राटदार कचरा पेट्या देणार तर अधिक पेट्यांची खरेदी कशाला? पेट्या खरेदीचा प्रस्ताव अध्यक्षांनी ठेवला