मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

मविआ घटक पक्षांना जास्त जागांची अपेक्षा


भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती न झाल्यास तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्ष एकत्र येऊन भाजप-शिवसेना युतीला आव्हान देण्याच्या तयारीत असली तरी, प्रत्येक घटक पक्षाने मागितलेल्या जागांची अपेक्षा जास्त असल्याने आघाडीतील नेते चिंताग्रस्त आहेत. तर, भाजप आणि शिवसेना यांनी आपली तयारी जोरदार ठेवली आहे. गेली १५ वर्षे मीरा-भाईंदर महापालिकेत भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले असून, २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने सत्ता एकट्याने मिळवली होती. त्यामुळे या निवडणुकीत युतीत भाजप मोठा भाऊ राहण्याची शक्यता आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जागांची मागणी केली असली तरी, शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युला मागितल्यामुळे युती न होण्याची शक्यता वाढली आहे.


विरोधी पक्षाने आता आपली युक्ती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि मीरा-भाईंदर नेते मुजफ्फर हुसेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला आव्हान देणार आहेत. यामध्ये उबाठा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस तसेच बहुजन विकास आघाडीचे घटक पक्ष असतील. संख्याबळ अद्याप निश्चित झालेले नाही, पण लवकरच जाहीर केले जाईल.


मीरा-भाईंदर उबाठाचे नेते मनोज मयेकर यांनी सांगितले की, उबाठा आणि मनसे यांची युती झाली असून, उबाठा ८० आणि मनसे १५ जागा वाटप झाली आहेत. मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी ३८ इच्छुक असून, २०-२२ जागांची मागणी असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष विक्रम तारे पाटील यांनी ४७ इच्छुक असून, ३५ जागांची मागणी आघाडीकडे केली असल्याची माहिती दिली. १२ प्रभागांमध्ये एकमत झाले असून उर्वरित १२ प्रभागांमध्ये बोलणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी ३२ उमेदवार निश्चित झाल्याचे सांगितले, पण भाजप-शिवसेना युतीबाबत अजून बोलणी झालेली नाही. या सर्व राजकीय परिस्थितीमुळे भाजप, शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यता अधिक स्पष्ट झाली आहे.

Comments
Add Comment

Temple Endowment Law : नवा देवस्थान इनाम जमीन कायदा सर्वंकष न्याय देणारा असेल, महसूलमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई : राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे संवर्धन करण्यासह वर्षानुवर्षे प्रलंबित असलेले समस्या मार्गी

Digital India : आधार ॲपने 31 दशलक्ष डाऊनलोडचा टप्पा ओलांडला

नवी दिल्ली : आधार ॲपला लोकांमध्ये उत्तम प्रतिसाद मिळत असून हे ॲप सुरु झाल्यापासून अवघ्या पाच महिन्यांपेक्षा कमी

Lucknow Fire : लखनौत तीन मजली इमारतीला आग, १४ जणांचा मृत्यू, पंतप्रधानांकडून मदत जाहीर

लखनौ : उत्तर प्रदेशातील लखनौच्या अलिगंजमधील पुरानिया परिसरात आज, सोमवारी दुपारी एक तीन मजली इमारतीला भीषण आग

Bangladeshi infiltrators : अडीच वर्षांत महाराष्ट्रातून ३ हजार ५४१ बांगलादेशी घुसखोरांची हकालपट्टी

मुंबई : वर्ष २०२४ पासून आजपर्यंत म्हणजेच गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत महाराष्ट्रातून

Dipali Sayyad : ‘महाराष्ट्राची एप्स्टिन फाईल’ चर्चेत; दिपाली सय्यद साकारणार रुपाली चाकणकरांची भूमिका, फर्स्ट लूक व्हायरल

Dipali Sayyad : राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या घटनांवर आधारित असल्याचे सांगितल्या

Eknath Shinde : उबाठाच्या ६ बंडखोर खासदारांचा शिवसेनेत प्रवेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हाती दिला भगवा; लोकसभा अध्यक्षांकडे सर्व प्रक्रिया पूर्ण केल्याची