मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

मविआ घटक पक्षांना जास्त जागांची अपेक्षा


भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती न झाल्यास तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्ष एकत्र येऊन भाजप-शिवसेना युतीला आव्हान देण्याच्या तयारीत असली तरी, प्रत्येक घटक पक्षाने मागितलेल्या जागांची अपेक्षा जास्त असल्याने आघाडीतील नेते चिंताग्रस्त आहेत. तर, भाजप आणि शिवसेना यांनी आपली तयारी जोरदार ठेवली आहे. गेली १५ वर्षे मीरा-भाईंदर महापालिकेत भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले असून, २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने सत्ता एकट्याने मिळवली होती. त्यामुळे या निवडणुकीत युतीत भाजप मोठा भाऊ राहण्याची शक्यता आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जागांची मागणी केली असली तरी, शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युला मागितल्यामुळे युती न होण्याची शक्यता वाढली आहे.


विरोधी पक्षाने आता आपली युक्ती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि मीरा-भाईंदर नेते मुजफ्फर हुसेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला आव्हान देणार आहेत. यामध्ये उबाठा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस तसेच बहुजन विकास आघाडीचे घटक पक्ष असतील. संख्याबळ अद्याप निश्चित झालेले नाही, पण लवकरच जाहीर केले जाईल.


मीरा-भाईंदर उबाठाचे नेते मनोज मयेकर यांनी सांगितले की, उबाठा आणि मनसे यांची युती झाली असून, उबाठा ८० आणि मनसे १५ जागा वाटप झाली आहेत. मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी ३८ इच्छुक असून, २०-२२ जागांची मागणी असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष विक्रम तारे पाटील यांनी ४७ इच्छुक असून, ३५ जागांची मागणी आघाडीकडे केली असल्याची माहिती दिली. १२ प्रभागांमध्ये एकमत झाले असून उर्वरित १२ प्रभागांमध्ये बोलणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी ३२ उमेदवार निश्चित झाल्याचे सांगितले, पण भाजप-शिवसेना युतीबाबत अजून बोलणी झालेली नाही. या सर्व राजकीय परिस्थितीमुळे भाजप, शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यता अधिक स्पष्ट झाली आहे.

Comments
Add Comment

Navnath Ban : 'देवेंद्र फडणवीस लवकरच सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहण्याचा विक्रम करतील'; भाजपचे नवनाथ बन यांचा दावा

मुंबई :  भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत,

Mumbai News : धक्कादायक! अंधेरीच्या लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू, पोलीस तपास सुरु

मुंबई : मुंबई (Mumbai) येथील अंधेरी पूर्व परिसरात एका लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू (Death)

Mulund AC Local : गर्दीच्या वेळी एसी लोकलचा एसी बंद; मुलुंड स्थानकावर १५ मिनिटे खोळंबा, प्रवासी गुदमरून बेशुद्ध

मुंबई : मुंबईतील मध्य रेल्वे मार्गावर सकाळच्या ऐन गर्दीच्या वेळी एसी लोकलमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे

Ahilyanagar : हॉटेल व्यावसायिक प्रकरणानंतर व्यापारांचा एल्गार! सलग दुसऱ्या दिवशी शहर कडकडीत बंद

Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर (Shrirampur) शहरात गुन्हेगारांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. गेल्या अकरा

Train Viral Video : चक्क चालत्या ट्रेनमध्ये पूजा अर्चा! व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वेने दिली महत्त्वाची माहिती

नवी दिल्ली : सोशल मीडियावर (Social Media) सध्या भारतीय रेल्वेच्या (indian Railway) एका चालत्या डब्यात धार्मिक विधी आणि पूजा केली जात

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून ९२ लाख नावे वगळली

ई-केवायसी प्रक्रियेत अपात्र; उत्पन्नाचे निकष न पाळल्याने कारवाई मुंबई : राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी