मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत तिरंगी लढतीची शक्यता

मविआ घटक पक्षांना जास्त जागांची अपेक्षा


भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिका निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांची युती न झाल्यास तिरंगी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शहरातील महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्ष एकत्र येऊन भाजप-शिवसेना युतीला आव्हान देण्याच्या तयारीत असली तरी, प्रत्येक घटक पक्षाने मागितलेल्या जागांची अपेक्षा जास्त असल्याने आघाडीतील नेते चिंताग्रस्त आहेत. तर, भाजप आणि शिवसेना यांनी आपली तयारी जोरदार ठेवली आहे. गेली १५ वर्षे मीरा-भाईंदर महापालिकेत भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व राहिले असून, २०१७ च्या निवडणुकीत भाजपाने सत्ता एकट्याने मिळवली होती. त्यामुळे या निवडणुकीत युतीत भाजप मोठा भाऊ राहण्याची शक्यता आहे. भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी जागांची मागणी केली असली तरी, शिवसेनेने ५०-५० फॉर्म्युला मागितल्यामुळे युती न होण्याची शक्यता वाढली आहे.


विरोधी पक्षाने आता आपली युक्ती आखण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि मीरा-भाईंदर नेते मुजफ्फर हुसेन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन निवडणुकीत भाजप-शिवसेना युतीला आव्हान देणार आहेत. यामध्ये उबाठा, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), काँग्रेस तसेच बहुजन विकास आघाडीचे घटक पक्ष असतील. संख्याबळ अद्याप निश्चित झालेले नाही, पण लवकरच जाहीर केले जाईल.


मीरा-भाईंदर उबाठाचे नेते मनोज मयेकर यांनी सांगितले की, उबाठा आणि मनसे यांची युती झाली असून, उबाठा ८० आणि मनसे १५ जागा वाटप झाली आहेत. मनसेचे शहराध्यक्ष संदीप राणे यांनी ३८ इच्छुक असून, २०-२२ जागांची मागणी असल्याचे सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) जिल्हाध्यक्ष विक्रम तारे पाटील यांनी ४७ इच्छुक असून, ३५ जागांची मागणी आघाडीकडे केली असल्याची माहिती दिली. १२ प्रभागांमध्ये एकमत झाले असून उर्वरित १२ प्रभागांमध्ये बोलणी सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) जिल्हाध्यक्ष प्रमोद कांबळे यांनी ३२ उमेदवार निश्चित झाल्याचे सांगितले, पण भाजप-शिवसेना युतीबाबत अजून बोलणी झालेली नाही. या सर्व राजकीय परिस्थितीमुळे भाजप, शिवसेना आणि महाविकास आघाडी अशी तिरंगी लढत मीरा-भाईंदर महापालिका निवडणुकीत होण्याची शक्यता अधिक स्पष्ट झाली आहे.

Comments
Add Comment

donkey derby : कराचीत रंगली गाढवांची शर्यत

कराची : पाकिस्तानातील कराची शहरात नुकतीच गाढवगाड्यांची अनोखी शर्यत पार पडली. नेटिव्ह जेटी ब्रिजपासून कमिशनर

FDA : राज्यातील १३ खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित

मुंबई : अन्नसुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन केल्याप्रकरणी महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने

Gadchiroli : गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सामूहिक सर्पदंश प्रकरणी अखेर मोठी कारवाई झाली आहे.

Jamkhed : नान्नज प्राथमिक आरोग्य केंद्र बॉम्बने उडविण्याची धमकी; डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवीगाळ

जामखेड : नान्नज येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांशी वाद घालत एका व्यक्तीने शिवीगाळ

USA : अमेरिकेतून ५,२०० भारतीय हद्दपार

वॉशिग्टन डीसी : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाने बेकायदा स्थलांतरितांविरोधातील कारवाई

ISRO : इस्त्रोची प्रक्षेपण वाहन निर्मितीतून माघार; खासगी कंपन्यांकडे जबाबदारी

नवी दिल्ली : भारताच्या अंतराळ कार्यक्रमात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्त्रो)