ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय


नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे केंद्र सरकारच्या भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) स्पष्ट केले आहे.


अरवलीच्या व्याख्येतील बदलाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर आता केंद्र सरकारने ‘चहा’ची व्याख्याही बदलली आहे. ‘चहा’ हा फक्त त्या उत्पादनासाठी वापरला जाऊ शकतो, जो कॅमेलिया सायनेन्सिस या वनस्पतीपासून बनलेला असेल. तसेच एफएसएसएआयने फूड बिझनेस ऑपरेटर्स (एफबीओएस)ला कडक इशारा दिला आहे की, कॅमेलिया सायनेन्सिस वनस्पतीपासून न बनलेल्या पेयांना-जसे की औषधी वनस्पती किंवा फुलांपासून तयार केलेले यांना चहा म्हणणे बेकायदेशीर आहे.


जर हर्बल टी किंवा ग्रीन टीला चहा म्हणून ब्रँडिंग केली गेली, तर ती भ्रामक जाहिरात आणि चुकीच्या लेबलिंगच्या अंतर्गत येईल. एफएसएसएआयने २४ डिसेंबरला जारी केलेल्या आदेशात सांगितले की, अनेक कंपन्या ‘हर्बल टी’, ‘रुईबोस टी’, ‘फ्लॉवर टी’ असे उत्पादन चहा म्हणून विकत आहेत, पण प्रत्यक्षात ही उत्पादने चहाच्या वनस्पतीपासून बनलेली नाहीत. नियमांनुसार ‘चहा’ हा शब्द फक्त कॅमेलिया सायनेन्सिसपासून बनलेल्या पेयांसाठी वापरता येईल. यात कांगडा चहा, ग्रीन टी आणि इन्स्टंट टी यांसारख्या प्रकारांचा समावेश आहे. एफएसएसएआयने स्पष्ट केले की, हर्बल किंवा इतर वनस्पतीपासून बनलेले पेय या वनस्पतीपासून न बनल्यास त्यांना चहा म्हणणे चुकीचे आहे, तसेच प्राधिकरणाने मॅन्युफॅक्चरिंग, पॅकिंग, मार्केटिंग, आयात, विक्री आणि ई-कॉमर्ससंबंधी सर्व व्यवसायांना निर्देश दिले आहेत की अशा उत्पादनांसाठी ‘टी’ हा शब्द थेट किंवा अप्रत्यक्षरीत्या वापरू नये. तसेच ऑनलाइन विक्रेते आणि इतर सर्व एफबीओएसवर नियमांचे काटेकोर पालन होईल याची दक्षता घ्यावी, असे निर्देश दिले आहे. यामुळे आता हर्बल टी, डिटॉक्स टी, फ्लॉवर टी यांसारख्या ड्रिंक्सची नावे बदलावी लागणार आहेत.

Comments
Add Comment

वेस्ट इंडिज-भारताच्या सामन्याचा पावसावर ठरणार निकाल

रन रेटवर ठरणार उपांत्य फेरीचा दावेदार नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील सुपर ८ फेरीचे सामने अंतिम टप्प्यात असून

प्रदूषणाच्या विळख्यात जीवनवाहिन्या?

४६ % नद्यांसोबतच गंगा-यमुनाही दूषित नवी दिल्ली : कोट्यवधी भारतीयांची जीवनवाहिनी आणि श्रद्धेचे प्रतीक असलेल्या

भारत-पाक सीमेवर 'प्रचंड' हेलिकॉप्टरमध्ये सह-वैमानिक म्हणून राष्ट्रपती मुर्मू यांनी रचला इतिहास

जयपूर : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी राजस्थान मधील जैसलमेर येथे स्वदेशी हलक्या लढाऊ हेलिकॉप्टर

RTO Rules Upadate : चालकांसाठी आरटीओचे 'हे' नवीन नियम; नितीन गडकरी यांची घोषणा

नवी दिल्ली : देशात रस्ते अपघातांचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत आहे. गाड्यांच्या धडकेत निष्पाप नागरिक प्राण गमावत

Amit Shah : सीमांचलमधून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम - केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

सीमांचल भागातून घुसखोरांना बाहेर काढण्यासाठी लवकरच विशेष मोहिम सुरू केली जाईल, असे विधान करत केंद्रीय

शनिवारपासून सलग पाच दिवस बँका राहणार बंद

मुंबई: तुम्ही जर बँकेत जाऊन काही काम करायचा विचार करत असाल किंवा लोन किंवा इतर काही कामं तुमची राहिली असतील तर