दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय


नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त ‘अटल कॅन्टीन’ योजनेची सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शहरात १०० ठिकाणी ५ रुपयांत एक प्लेट जेवण मिळणार आहे. तसेच प्रत्येक कॅन्टीनमध्ये सुमारे ५०० लोकांना जेवण उपलब्ध करून दिले जाईल. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी अटल कॅन्टीन हे असे ठिकाण असेल जिथे कोणालाही उपाशी झोपावे लागणार नाही, असे म्हटले आहे.


मुख्यमंत्र्यांनी अटल कॅन्टीनला भेट दिली, जिथे त्यांनी जेवण वाढणाऱ्या आणि जेवण करणाऱ्या लोकांशी संवाद साधला. संवादादरम्यान लोकांनी सांगितले की, ५ रुपयांमध्ये असे स्वादिष्ट आणि पौष्टिक जेवण मिळणे ही मोठी गोष्ट आहे. दिल्ली सरकारचा हा उपक्रम गरीब आणि मजुरांसाठी संजीवनीपेक्षा कमी नाही. या योजनेचा उद्देश गरीब, मजूर आणि कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांना सन्मानाने भोजन उपलब्ध करून देणे हा आहे. सरकारने दिल्लीतील विविध भागांमध्ये, ज्यात आरके पुरम, जंगपुरा, शालीमार बाग, ग्रेटर कैलाश, राजौरी गार्डन, नरेला, बवाना यांचा समावेश आहे, अशा ४५ अटल कॅन्टीनची सुरुवात केली आहे. उर्वरित ५५ कॅन्टीनचे उद्घाटन येत्या काही दिवसांत केले जाईल. या कॅन्टीनमध्ये दररोज दोन वेळा जेवण दिले जाईल.


कॅन्टीन दोन शिफ्टमध्ये चालेल. पहिल्या शिफ्टमध्ये सकाळी ११ वाजल्यापासून ते संध्याकाळी ४ वाजेपर्यंत लोक जेवण करू शकतील. तर दुसऱ्या शिफ्टमध्ये संध्याकाळी ६.३० वाजल्यापासून ते रात्री ९.३० वाजेपर्यंत कॅन्टीन उघडी राहील. जेवणाच्या थाळीमध्ये डाळ, भात, चपाती, हंगामी भाजी आणि लोणचे यांचा समावेश आहे.


जेवण वाटण्यासाठी डिजिटल टोकन प्रणाली


दिल्ली सरकारने जेवण वाटण्यासाठी मॅन्युअल कूपनऐवजी डिजिटल टोकन प्रणाली सुरू केली आहे. सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे पाळत ठेवली जाईल, ज्याचे दिल्ली अर्बन शेल्टर इम्प्रूव्हमेंट बोर्ड (DUSIB) च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरून रिअल-टाइममध्ये निरीक्षण केले जाईल.

Comments
Add Comment

भाजपचा मुंबईतील विजय ही अभिमानास्पद बाब

मालदामध्ये ‘स्लिपर वंदे भारत’ला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर मोदींचे प्रतिपादन नवी दिल्ली : ‘भाजपने देशात सुशासन

दिल्लीसह चार राज्यांत सतर्कतेचा इशारा; २६ जानेवारीआधी सुरक्षायंत्रणा अलर्ट मोडवर

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशाची राजधानी दिल्ली तसेच हरियाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थान

केरळच्या पर्यटकांवर अरुणाचलमध्ये काळाचा घाला; गोठलेल्या तलावात पडून एकाचा मृत्यू दुसऱ्याचा शोध सुरु

अरुणाचल प्रदेश : थंड हवेचा अनुभव घेण्यासाठी अरुणाचल प्रदेशात आलेल्या केरळमधील पर्यटकांच्या सहलीला दुर्दैवी

Hapur News : लग्न समारंभात राडा! हापूरमध्ये माशांच्या स्टॉलवर पाहुण्यांनी टाकला 'दरोडा, व्हिडिओ पाहून व्हाल थक्क

हापूर : उत्तर प्रदेशातील (Uttar Pradesh) हापूर जिल्ह्यात एका विवाह सोहळ्यात आनंदाच्या वातावरणाऐवजी धक्कादायक आणि

Virat Ramayana Temple : जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगाची आज स्थापना! २१० टन वजन, ३३ फूट उंची; बिहारमधील 'विराट रामायण मंदिर' ठरणार आकर्षणाचे केंद्र

मोतिहारी : बिहारमधील पूर्व चंपारण जिल्ह्यातील मोतिहारी येथे आज एक सुवर्णक्षण अनुभवायला मिळणार आहे. येथील विराट

देशातील पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ राज्यात सुरू

मुंबई : महिलांचे आरोग्य केंद्रस्थानी ठेवत राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये ‘मेनोपॉज