मुंबई महापालिका निवडणुकीसाठी १० हजार ३०० मतदान केंद्र

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी विधानसभेतील मतदार केंद्राप्रमाणेच केंद्र असतील. मात्र, महापालिका प्रभागांचा विचार करता विधानसभेप्रमाणेच मतदार केंद्र कायम ठेवतच तब्बल १९० मतदान केंद्राची वाढ केली जात आहे. विधानसभा निवडणुकीत १० हजार १११ मतदान केंद्र होतेे, तर महापालिका निवडणुकीत सुमारे १० हजार ३०० मतदान केंद्र असतील असे महापालिका निवडणूक विभागाने स्पष्ट केले. यामध्ये ७०० सोसायट्यांमधील मतदान केंद्रांचा समावेश आहे.


मुंबई महापालिकेच्यावतीने निवडणुकीसाठी मतदार यादी अंतिम करण्यात येत असून यातील ११ लाख ०१ हजार ५०६ दुबार मतदारांपैंकी १ लाख ६८ हजार ३५७ दुबार मतदार आढळून आले. उर्वरीत ९ लाख ३३ हजार १५६ हे वेगवेगळ्या नावाचे होते. तर त्यातील १ लाख २६ हजार ६६० दुबार मतदारांच्या घरी प्रत्यक्ष जावून पाहणी करण्यात आली आहे. त्यातल ४८ हजार ६२८ दुबार मतदारांनी परिशिष्ट एक लिहून दिले. तर ७८ हजार १०५ दुबार मतदारांनी परिशिष्ट एक स्वीकारण्यास तथा भरुन देण्यास नकार दिला. या ११ लाख ०१ हजार दुबार मतदारांपैंकी २ लाख २५ हजार ५७२ मतदारांची नावे एकाच प्रभागातील होती, तर ८ लाख ३५ हजार ९३५ दुबार मतदारांची नावे वेगवेगळ्या विभागांमध्ये होती,अशी माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी दिली आहे


येत्या १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या महापालिका निवडणूक मतदानासाठी यंदा १० हजार ३०० मतदान केंद्र निर्माण केली जाणार आहेत. तर विधानसभेत या मतदान केंद्राची संख्या १० हजार १११ एवढी होती. त्यामुळे विधानसभेच्या तुलनेत १९० मतदान केंद्रांची संख्या वाढली जाणार आहे. तर ७०० सोसायट्यांमध्ये मतदान केंद्र असतील. विधानसभेतील सोसायट्यांमधील मतदान केंद्र कायम ठेवण्यात आली असून नव्याने त्यात वाढ झालेली नसल्याचे अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी स्पष्ट केले.



संवेदनशील मतदार केंद्र


मुंबईतील जे संवेदनशील पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मतदान केंद्र ही संवेदनशील केंद्र म्हणून ओळखले जातात. त्यातच दहा पेक्षा अधिक मतदान केंद्र ही एकाच जागेवर असल्यास त्या मतदान केंद्रांना संवेदनशील मतदान केंद्र म्हणून निश्चित केले जात असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त डॉ अश्विनी जोशी यांनी दिली आहे.

Comments
Add Comment

BMC : मुंबई महानगरपालिका मुख्यलयात मंत्रालयाच्या धर्तीवर प्रवेश

मुंबई  : मुंबई महापालिका मुख्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी प्राप्त झाल्यानंतर पुन्हा एकदा महापालिका

BMC मुख्यालय उडवून देण्याची धमकी, महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ

महापािलका मुख्यालय उडवून देण्याची धमकी ; महापौरांसह इमारतीच्या सुरक्षेत वाढ अशा धमक्यांना मी मुळीच घाबरत नाही-

अवकाळी पावसाने बाधित फळपिकांचे पंचनामे पूर्ण करा, कृषिमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : 'राज्यात मे आणि जून २०२६ या कालावधीत अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीमुळे बाधित झालेल्या फळपिकांच्या

Verification of Street Vendors : मुंबईत २० हजार फेरीवाल्यांची पडताळणी पूर्ण

येत्या २६ जून पर्यंत पडताळणी न झालेल्यांना मिळणार नाही क्यू आर कोड ओळखपत्र मुंबई (विशेष प्रतिनिधी ) : उच्‍च

Devendra Fadnavis : समर्थ भारत ते विकसित भारत’ पंतप्रधान मोदींमुळेच शक्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; महाराष्ट्र राज्याच्या वतीने पत्र लिहून केले अभिनंदन मुंबई : देशाच्या इतिहासात

Panvel-Karjat Corridor : रेल्वेला नवी लाइफलाइन! लवकरच धावणार उपनगरी रेल्वे; पनवेल-कर्जत कॉरिडॉरचे ९८ टक्के काम पूर्ण

MUMBAI : मुंबई उपनगरी रेल्वे नेटवर्कसाठी महत्त्वाचा ठरणारा बहुप्रतीक्षित पनवेल-कर्जत रेल्वे कॉरिडॉर आता