अयोध्येतील राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन! भाविकांसाठी मंदिर बंद... जाणून घ्या सविस्तर

अयोध्या: अयोध्येतील राम मंदिराचे काम संपूर्ण झाले आहे. या पार्श्वभूमीवर २५ नोव्हेंबर, २०२५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभ हस्ते धर्म ध्वज स्थापन करण्यात आला. या दिवसानंतर राम मंदिर परिसर अधिक भव्य आणि आकर्षक झाल्याने दररोज लाखो भाविक अयोध्येत रामललाचे दर्शन करण्यासाठी येतात. तर दुसरीकडे ख्रिसमस आणि नववर्षाच्या सुट्ट्यांमुळेही भाविकांनी राम मंदिर दर्शनाचे नियोजन केले होते. मात्र तिथीनुसार ३१ डिसेंबरला राम मंदिराचा दुसरा वर्धापन दिन साजरा केला जाणार असल्याने मंदिर दर्शनासाठी बंद राहणार की खुले असणार याबाबत भाविकांना प्रश्न पडला होता. ज्यावर मंदिर संस्थानाने उत्तर दिले आहे.


२२ जानेवारी २०२४ रोजी पौष शुक्ल द्वादशी तिथीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी रामललाची प्राणप्रतिष्ठा करून राम मंदिराचे लोकार्पण केले होते. यंदा हा दिवस ३१ डिसेंबर २०२५ रोजी येत आहे.त्यामुळे तिथीनुसार राम मंदिराच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त अयोध्येत पुन्हा एकदा पाच दिवसांचे सांस्कृतिक आणि धार्मिक विधी होत आहेत. २८ डिसेंबर २०२५ ते ०२ जानेवारी २०२६ पर्यंत राम मंदिराचा दुसरा वर्धापन साजरा केला जाणार आहे. या आनंदात भाविकांनाही सामावून घेण्यासाठी मंदिर संस्थानाने दर्शनासाठी राम मंदिर खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.




अयोध्येत प्राणप्रतिष्ठा द्वादशीनिमित्त राम मंदिर परिसरात पाच दिवसांचा सांस्कृतिक आणि धार्मिक विधी होणार आहे. हा कार्यक्रम राम मंदिरातून बाहेर पडण्याच्या ठिकाणी म्हणजेच अंगद टीला येथे होणार आहेत. सामान्य रामभक्तही या कार्यक्रमात सहभागी होऊ शकणार आहेत. तसेच ३१ डिसेंबर रोजी राम मंदिर आणि श्रीरामांचा दरबार नेहमीप्रमाणे रामभक्तांच्या दर्शनासाठी खुला राहणार असून भाविकांना ३१ तारखेला रामललाची विशेष पूजा आणि आरास पाहायला मिळणार आहे. राम मंदिर ट्रस्टने यासाठी व्यापक तयारी केली आहे.


गेल्या वर्षी प्रतिष्ठा द्वादशीचा दिवस ११ जानेवारी रोजी होता. यावर्षी हा दिवस ३१ डिसेंबर रोजी आहे. या खास दिवसानिमित्त मंदिरात सकाळी ९.३० वाजता विशेष पूजन होणार आहे. तर जे भाविक अयोध्येत येऊ शकत नसतील, त्यांना हा मंगल सोहळा घरातून पाहण्यासाठी राम मंदिर ट्रस्टने दूरदर्शनला या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्याची परवानगी दिली आहे.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात