संजय कपूरची ३० हजार कोटींची मालमत्ता कोणाला मिळणार ? न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे येणार नवा ट्विस्ट ?


नवी दिल्ली : उद्योगपती संजय कपूरची ३० हजार कोटी रुपयांची मालमत्ता कोणाच्या मालकीची होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. न्यायालयासमोर आलेल्या याचिकेमुळे एक मोठा ट्विस्ट आला आहे.


संजय कपूर यांनी एकूण तीन वेळा लग्न केले. पहिले लग्न फॅशन डिझायनर नंदिता महातानिशीशी केले. काही काळानंतर घटस्फोट घेतला आणि बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूरसोबत लग्न केले. या लग्नानंतर त्याला समायरा ही मुलगी आणि कियान हा मुलगा झाला. नंतर २०१४ मध्ये करिश्मा आणि संजय यांनी परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. यानंतर संजयने प्रिया सचदेवशी लग्न केलं. त्यांना अझारियस हा मुलगा झाला. संजयने प्रिया सचदेवचा पहिला पती विक्रम चटवालपासून झालेली मुलगी सफिरा चटवाल हिलाही दत्तक घेतलं. यानंतर काही काळाने संजय मृत्यू झाला. संजयच्या पश्चात त्याच्या संपत्तीवरुन वाद सुरू झाला आहे.



काय आहे वाद ?


संजय आणि करिश्माच्या मुलांनी म्हणजेच समायरा आणि कियानने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका केली आहे. करिश्माच्या मुलांनी दावा केला की त्यांचे वडील संजय कपूर यांचं मृत्यूपत्र बनावट आहे, ते जिवंत असतानाच त्यात छेडछाड करण्यात आली होती आणि बदल करण्यात आले होते. गेल्या सुनावणीत वकील महेश जेठमलानी यांनी युक्तीवाद केला की, संजय त्यांच्या मुलांसोबत सुट्टीवर असताना मृत्यूपत्र बदलण्यात आलं होतं. मृत्यूपत्रात सुधारणा करणाऱ्या व्यक्तीला संजय कपूरच्या मृत्यूच्या एक दिवसानंतर लगेच कंपनीचा संचालक बनवण्यात आलं.


संजयची पत्नी प्रिया सचदेव कपूर यांनी मृत्यूपत्रात बदल केल्याच्या आरोपात तथ्य नसल्याचा दावा केला आहे. आता समायरा आणि कियानने मृत्यूपत्राच्या फॉरेन्सिक तपासणीची मागणी केली आहे. समायरा आणि कियानच्या दाव्यानुसार संजय कपूर यांनी त्यांना मालमत्तेत हक्क देणार असल्याचे सांगितले होते. पण न्यायालयापुढे आलेल्या मृत्यूपत्रात उल्लेखच दिसत नाही. यामुळे प्रियाने संजयच्या मृत्यूपत्रात छेडछाड करुन स्वार्थ साधल्याचा आरोप समायरा आणि कियानने केला आहे.


फॉरेन्सिक तपासणीच्या मागणीला प्रियाच्या वकिलाने विरोध केला आहे. या प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. यामुळे पुढील सुनावणीत काय होणार ? दिल्ली उच्च न्यायालय काय निर्णय किंवा निर्देश देणार याकडे संजय कपूरच्या नातलगांचे लक्ष आहे.


Comments
Add Comment

रामायण मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांच्या मुलाचे निधन

मुंबई : रामायण ही टीव्ही मालिका घराघरात पोहोचली. या लोकप्रिय मालिकेचे दिग्दर्शक रामानंद सागर यांचे पुत्र आनंद

Valentines Day: अभिनेत्री नम्रता गायकवाड 'काहीतरी वेगळे' करणार? चर्चांना उधाण

मुंबई: काही दिवसांपूर्वी अभिनेत्री नम्रता गायकवाड हीने अभिनेता तुषार कावळे यांच्यासोबतचे काही फोटो शेअर करून

The Lalla Anthem: अनिल कपूर आणि हरभजन सिंह यांचा दमदार संदेश – इंडियन क्रिकेट टीमशी भिडलात तर परिणाम भोगावे लागतील!

अनिल कपूर आणि राधिका मदान अभिनित ‘लल्ला अँथम – अ वॉर्निंग फ्रॉम सूबेदार’ या गाण्यात भारताचे माजी क्रिकेटपटू

एडिट केलेलं फुटेज जाहीर करा’; ‘बिग बॉस मराठी’च्या निर्मात्यांना दिव्या शिंदेचा कायदेशीर इशारा

मुंबई : बिग बॉस मराठी’मधून बाहेर पडल्यानंतर स्पर्धक दिव्या शिंदेने निर्मात्यांवर गंभीर आरोप करत कायदेशीर

Rajpal Yadav's Brother Statement: अभिनेता राजपाल यादवच्या भावाने केले मोठे खुलासे; काय म्हणाले श्रीपाल यादव?

मुंबई: बॉलिवूड अभिनेता राजपाल यादव नऊ कोटी रुपयांच्या कथित आर्थिक वाद प्रकरणी न्यायालयीन कोठडीत आहे. ५

नव्या आकर्षक पोस्टरसह ‘द पॅराडाईज’ची घोषणा

मुंबई : २०२६ मधील सर्वाधिक प्रतिक्षित चित्रपटांपैकी एक म्हणून द पॅराडाईजची ओळख निर्माण झाली आहे. चित्रपटाची