मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या राजकीय जाहिरातींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.आतापर्यंत साडेसात हजारांहूना अधिक बॅनर, पोस्टर, झेंडे आदींवर कारवाई करून ते हटवण्यात आले आहे. मुंबईतील खासगी जागांवरच सर्वांधिक ही बॅनरबाजी करण्यात आली होती. परंतु निवडणूक आचारसंहितेमुळे मुंबईला बकाल स्वरुप देणाऱ्या या पोस्टरबाजीवर कारवाई करण्यात आल्यामुळे मुंबई आता बॅनर आणि पोस्टरमुक्त झालेले पहायला मिळत आहे.


मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता आचांरसहिता लागू झाल्यांनंतर मुंबईतील विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेले फलक, बॅनर, पोस्टर तसेच झेंडे हटवण्यास सुरुवात झाली आहे. १५ डिसेंबरला झालेल्या पहिल्या दिवशीच्या कारवाईमध्ये तब्बल १८१३ अनधिकृत बॅनर व फलकांसह झेंड्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी सर्वाधिक ३७५० जाहिरातींवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक दिवशी ही कारवाई तीव्र करत अखेर २५ डिसेंबर २०२५ रोजी एकाही पोस्टर,बॅनर तसेच झेंड्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे परवाना विभागाच्या सातत्यपूर्ण कारवाईनंतर मुंबईत आजमितीस एकही राजकीय बॅनर, फलक आणि पोस्टर तसेच झेंडे नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.



दिनांक १५ ते २५ डिसेंबर २०२५ पर्यंतची कारवाई



  1. भिंती रंगवणे : २७

  2. पोस्टर :९२५

  3. कटआऊट होर्डींग :६९८

  4. बॅनर : ४८७३

  5. झेंडे : ११२८

  6. एकूण : ७६५१

Comments
Add Comment

'उबाठा' गटाला पुन्हा खिंडार? निम्म्याहून अधिक खासदार शिवसेनेच्या वाटेवर

- कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होताच 'धमाका' होणार; एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यांनातर घडामोडींना वेग मुंबई :

महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक २०२६ एकमताने मंजूर

मुंबई : राज्यातील पर्यावरण संरक्षण, आर्थिक शिस्त आणि औद्योगिक विकास यांचा समतोल साधण्याच्या दृष्टीने

‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

मुंबई : ‘तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल’ कॉफीटेबल बुकचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वर्षा

नक्षलग्रस्त भागात सागवान तस्करांचा धुमाकूळ; वनमंत्र्यांकडून सखोल चौकशीचे आदेश

मुंबई : नक्षलग्रस्त भागातील मौल्यवान सागवान लाकडाची तस्करी करणार्‍या संघटित टोळ्यांना राजकीय पाठबळ मिळत आहे,

मालाडमध्ये प्रकल्प बाधितांच्या पुनर्वसनात घोटाळा- चौकशी समिती गठीत; अहवाल प्राप्त होईपर्यंत प्रकल्पाला स्थगिती

मुंबई : मालाड पूर्वमधील प्रकल्प बाधितांच्या (पीएपी) पुनर्वसनात घोटाळा झाल्याची बाब बुधवारी विधानसभेत चर्चेला

मुंबईतील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापनात त्रुटी ठेवणार नाही; मंत्री पंकजा मुंडेंनी विधान परिषदेत मांडली ठोस भूमिका

मुंबई: बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या केईएम (KEM), नायर आणि कूपर या प्रमुख रुग्णालयांमधील जैववैद्यकीय कचऱ्याची