मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या राजकीय जाहिरातींवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.आतापर्यंत साडेसात हजारांहूना अधिक बॅनर, पोस्टर, झेंडे आदींवर कारवाई करून ते हटवण्यात आले आहे. मुंबईतील खासगी जागांवरच सर्वांधिक ही बॅनरबाजी करण्यात आली होती. परंतु निवडणूक आचारसंहितेमुळे मुंबईला बकाल स्वरुप देणाऱ्या या पोस्टरबाजीवर कारवाई करण्यात आल्यामुळे मुंबई आता बॅनर आणि पोस्टरमुक्त झालेले पहायला मिळत आहे.


मुंबई महापालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता आचांरसहिता लागू झाल्यांनंतर मुंबईतील विविध राजकीय पक्ष आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून लावण्यात आलेले फलक, बॅनर, पोस्टर तसेच झेंडे हटवण्यास सुरुवात झाली आहे. १५ डिसेंबरला झालेल्या पहिल्या दिवशीच्या कारवाईमध्ये तब्बल १८१३ अनधिकृत बॅनर व फलकांसह झेंड्यांवर कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर १६ डिसेंबर रोजी सर्वाधिक ३७५० जाहिरातींवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे प्रत्येक दिवशी ही कारवाई तीव्र करत अखेर २५ डिसेंबर २०२५ रोजी एकाही पोस्टर,बॅनर तसेच झेंड्यांवर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे परवाना विभागाच्या सातत्यपूर्ण कारवाईनंतर मुंबईत आजमितीस एकही राजकीय बॅनर, फलक आणि पोस्टर तसेच झेंडे नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.



दिनांक १५ ते २५ डिसेंबर २०२५ पर्यंतची कारवाई



  1. भिंती रंगवणे : २७

  2. पोस्टर :९२५

  3. कटआऊट होर्डींग :६९८

  4. बॅनर : ४८७३

  5. झेंडे : ११२८

  6. एकूण : ७६५१

Comments
Add Comment

‘टपाली मतपत्रिकांच्या पेट्या मतमोजणीच्या दिवशीच गोदामातून बाहेर काढणार’

मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५ - २६ अंतर्गत, निवडणूक निर्णय अधिकारी - २१ (प्रभाग क्रमांक

मतदानाची वेळ संपली, आतापर्यंत झाले किती टक्के मतदान ?

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान करण्याची वेळ

शाई पुसून पुन्हा मतदान करणे शक्य नाही!

राज्य निवडणूक आयुक्तांचे स्पष्टीकरण; मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न मुंबई : महापालिका

Ashish Shelar : मेंदूत केमिकल लोचा अन् हातावर...'रडके' म्हणत आशिष शेलारांनी ठाकरे बंधूना काढला चिमटा

मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उत्साहात मतदान पार पडत असतानाच, शाईच्या

मतदानानंतर बोटावर शाई का लावली जाते? हात किंवा बोट नसल्यास काय असते नियम?

मुंबई : राज्यातील अनेक महापालिकांमध्ये आज मतदान प्रक्रिया सुरू असून नागरिक उत्साहाने आपला मतदानाचा हक्क बजावत

'मशिदीवर पुन्हा भोंगे लावण्याचे उबाठाचे वचन'

मुंबई :मशिदीवरील भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देत उद्धव ठाकरेंनी निवडणूक प्रचार केला, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री