बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल


मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री जागरण करुन नववर्षाचा जल्लोष केला जातो. मुंबईतील सर्व समुद्र किनारे, हॉटेल, पर्यटनस्थळे मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात. सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी असते. ही बाब विचारात घेऊन नववर्षाचे सेलिब्रेशन करणाऱ्यांना मध्यरात्री पण आरामात घरी जाता यावे यासाठी मध्य रेल्वेने चार विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबईतील हजारो नागरिक दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, बॅण्ड स्टॅण्ड येथे जातात. तसेच हजारो नागरिक १ जानेवारीच्या सकाळी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेच घर सोडून प्रभादेवीच्या दिशेने प्रवास करतात. या सर्व बाबी विचारात घेऊन मध्य रेल्वेने चार विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथून विशेष लोकल सुटेल आणि कल्याण येथे मध्यरात्री तीन वाजता पोहोचेल. तसेच गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता कल्याण येथून विशेष लोकल सुटेल आणि मध्यरात्री तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथे पोहोचेल. याच पद्धतीने गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथून विशेष लोकल सुटेल आणि पनवेल येथे मध्यरात्री दोन वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. तसेच गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री पनवेल येथून विशेष लोकल सुटेल आणि मध्यरात्री दोन वाजून ५० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथे पोहोचेल. या सर्व विशेष लोकल मार्गातील सर्व स्थानकांवर थांबतील.


Comments
Add Comment

सागराचे आव्हान आणि करिअर संधी

सुरेश वांदिले मुंबईमध्ये २७ ते ३१ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘मेरीटाइम वीक’ ही आतंरराष्ट्रीय परिषद पार पडली.

मुंबई झाली पूर्णपणे बॅनर,फलकमुक्त, दहा दिवसांमध्ये ७६५१ जाहिरातींवर कारवाई

मुंबई (विशेष प्रतिनिधी) :  मुंबई महापालिकेची निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यांनतर मुंबईला विद्रुप करणाऱ्या

ठाकरे बंधूंची युती, पण उबाठा आणि मनसैनिकांची दिलजमाई कुठे?

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उबाठा आणि मनसेच्या युतीची जाहीर घोषण

एनबीसीसी आणि मुंबई बंदर प्राधिकरणामध्ये मुंबईतील विकासासाठी सामंजस्य करार

मुंबई : एनबीसीसी (इंडिया) लिमिटेड आणि मुंबई बंदर प्राधिकरण (एमबीपीए) यांनी मुंबई पोर्टच्या जमिनीवर विविध विकास

वायुप्रदूषण नियम उल्लंघनावरून उच्च न्यायालय आक्रमक

पालिका आयुक्त आणि एमपीसीबी सचिवांना प्रत्यक्ष हजर राहण्याचे आदेश मुंबई : फोर्ट, वरळी, बीकेसी, अंधेरी, चकाला आदी

मनसेतून उबाठात गेलेल्यांची उमेदवारी अडचणीत?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भूमिका निर्णायक ठरणार मुंबई : उबाठा गट आणि मनसेची युती झाल्याने दोन्ही पक्षातील