बिनधास्त करा नववर्षाचे सेलिब्रेशन, मध्य रेल्वे मध्यरात्री सोडणार विशेष लोकल


मुंबई : नववर्षाचे स्वागत करण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी रात्री उशिरापर्यंत कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. रात्री जागरण करुन नववर्षाचा जल्लोष केला जातो. मुंबईतील सर्व समुद्र किनारे, हॉटेल, पर्यटनस्थळे मध्यरात्रीपर्यंत सुरू असतात. सर्वच ठिकाणी प्रचंड गर्दी असते. ही बाब विचारात घेऊन नववर्षाचे सेलिब्रेशन करणाऱ्यांना मध्यरात्री पण आरामात घरी जाता यावे यासाठी मध्य रेल्वेने चार विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


मुंबईतील हजारो नागरिक दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मरिन ड्राइव्ह, गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, जुहू चौपाटी, गेट वे ऑफ इंडिया, बॅण्ड स्टॅण्ड येथे जातात. तसेच हजारो नागरिक १ जानेवारीच्या सकाळी सिद्धिविनायकाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेच घर सोडून प्रभादेवीच्या दिशेने प्रवास करतात. या सर्व बाबी विचारात घेऊन मध्य रेल्वेने चार विशेष लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे.


मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथून विशेष लोकल सुटेल आणि कल्याण येथे मध्यरात्री तीन वाजता पोहोचेल. तसेच गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता कल्याण येथून विशेष लोकल सुटेल आणि मध्यरात्री तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथे पोहोचेल. याच पद्धतीने गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री दीड वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथून विशेष लोकल सुटेल आणि पनवेल येथे मध्यरात्री दोन वाजून ५० मिनिटांनी पोहोचेल. तसेच गुरुवार १ जानेवारी २०२६ रोजी मध्यरात्री पनवेल येथून विशेष लोकल सुटेल आणि मध्यरात्री दोन वाजून ५० मिनिटांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अर्थात सीएसएमटी येथे पोहोचेल. या सर्व विशेष लोकल मार्गातील सर्व स्थानकांवर थांबतील.


Comments
Add Comment

राज्यातील अनधिकृत मोबाईल टॉवर्सचे लवकर सर्वेक्षण

मुंबई : केंद्र शासनाचे धोरण आणि राज्याची गरज यांचा मेळ घालून भविष्यात महाराष्ट्राची स्वतंत्र 'टॉवर पॉलिसी' कशी

‘एआय’, डिजिटल सुविधा आणि विविध योजनांमुळे महाराष्ट्रातील शेती अधिक सक्षम होणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

शेतकऱ्यांच्या विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञान, संशोधन, नैसर्गिक शेती, अन्नप्रक्रिया उद्योग आणि पायाभूत सुविधांवर

अनाथ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती संदर्भातील अडचणी दूर करू

मुंबई : राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या शुल्काचा भार हलका करणार, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

मुंबई : राज्यातील व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जाची

नियम व अटींची पूर्तता केल्यासच गुंठेवारी प्रस्तावांना मंजुरी मिळणार; मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

मुंबई : राज्यातील गुंठेवारी नियमितीकरणाबाबत राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गुंठेवारी विकास नियमित

राज्यातील चेक पोस्ट बंद करणार, मंत्री प्रताप सरनाईकांनी दिले आश्वासन

मुंबई : चेक पोस्ट संदर्भात लोकप्रतिनिधी तसेच विविध संस्थांकडून तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या विषयाची गंभीर दखल