परिक्षेत प्रश्न विचारला आणि दिल्लीच्या विद्यापीठातील प्राध्यापकाचे थेट निलंबन! काय आहे प्रकरण?

नवी दिल्ली: दिल्लीतील महाविद्यालयं आणि शाळांबाबत नेहमीच काहीतरी विषय चर्चेत असतो. अशाच प्रकारे दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहे. या विद्यापीठाच्या एका सत्र परिक्षेत विचारल्या गेलेल्या प्रश्नावरून विद्यापीठात गोंधळ निर्माण झाला आहे. ज्याचा परिणाम थेट प्राध्यापकाच्या नोकरीवर झाला असून अंतिम निकषापर्यंत प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.


जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील बीए (ऑनर्स) सोशल वर्क या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षेत एक प्रश्न विचारण्यात आला होता आणि याच प्रश्नावरून वाद सुरू झाला आहे. याची दखल विद्यापीठाने घेत मोठी कारवाई केली असून अंतर्गत चौकशी समिती स्थापन केली आहे. तसेच समिती स्थापन करताच संबंधित पेपर तयार करणाऱ्या प्राध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सत्र परीक्षेत भारतात मुस्लिम नागरिकांविषयी उल्लेख असलेला एक प्रश्न विचारण्यात आला होता. ज्या प्रश्नाविरोधात विद्यापीठ प्रशासनाला अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तसेच हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचल्याने विद्यापीठाने पोलिसांना या प्रकरणात एफआयआर नोंदवण्यास सांगितले.




विद्यापीठाने याबाबत माहिती देताना सांगितले की, विद्यापीठ प्रशासनाने प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांच्या निष्काळजीपणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. ही चौकशी समिती या प्रकरणाची तपास पूर्ण करून निष्कर्ष देईपर्यंत प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जामिया विद्यापीठाच्या कुलगुरूंनी कायद्याच्या कलम ३७(१) अंतर्गत ही कारवाई केली आहे.


नेमका काय प्रश्न विचारण्यात आला होता?
बीए (ऑनर्स) सोशल वर्क प्रोग्रामसाठी 'भारतातील सामाजिक समस्या' या विषयाची सत्र १ ची प्रश्नपत्रिका प्राध्यापक वीरेंद्र बालाजी शहारे यांनी तयार केली होती. ज्यात 'भारतात मुस्लिम अल्पसंख्याकांवरील अत्याचारांवर योग्य उदाहरण देऊन चर्चा करा', असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावरून वाद निर्माण झाला आहे.


Comments
Add Comment

मुंबईत थर्टी फर्स्ट सेलिब्रेशन साठी 'फायर अलर्ट' जारी; हॉटेल्स, पब्स आणि मॉल्सची झाडाझडती सुरु

मुंबई : थर्टी फर्स्ट जवळ येतोय, नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई हळू हळू सज्ज होत असतानाच, मुंबईकरांच्या

चाउमीन, पिझ्झा-बर्गर.. फास्ट फूडच्या अतिसेवनाने आतड्यांना छिद्र, ११ वीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू

अमरोहा : एखाद्या गोष्टीच अतिव्यसन हे नेहमीच जीवघेणं ठरत. अश्याच एका अति फास्ट फूड (जंक फूड) व्यसनाने उत्तर

Ayodhya Ram Mandir : अयोध्येत 'रत्नजडित' रामाचे आगमन; १० फूट उंच, ३० कोटींची सुवर्णमूर्ती आणि तंजावर कलेचा अजोड संगम!

अयोध्या : रामजन्मभूमी अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भक्तीचा एक नवा अध्याय सुरू झाला आहे. कर्नाटकातील अज्ञात

New Zealand Visa : न्यूझीलंडमध्ये आता भारतीयांची चांदी! ५,००० कुशल व्यावसायिकांना थेट वर्क व्हिसा, विद्यार्थ्यांसाठीही मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील व्यापारी संबंधांनी आता एक नवं वळण घेतले आहे. दोन्ही देशांनी मुक्त

इस्रोच्या ब्लूबर्ड ब्लॉक-2 चे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरिकोटा : भारतीय अवकाश संशोधन संस्थाने नुकतेच एका ऐतिहासिक मोहिमेचे प्रक्षेपण केले आहे. श्रीहरिकोटा येथील

दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई

८०० कारखाने बंद करण्याचा दिल्ली सरकारचा निर्णय नवी दिल्ली : दिल्लीतील प्रदूषणावर निर्णायक कारवाई करण्याच्या