कुडूसला स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा

५२ गावांच्या सुरक्षिततेसाठी गृहविभागाची मंजुरी


वाडा : वाडा तालुक्यातील औद्योगिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण आणि ५२ गावांचा विस्तीर्ण परिसर असलेल्या कुडूस येथील पोलीस दूरक्षेत्राचे रूपांतर आता स्वतंत्र पोलीस ठाण्यात होणार आहे. नागरिकांकडून अनेक वर्षांपासून करण्यात येत असलेल्या मागणीला यश आले असून, वाढती लोकसंख्या, औद्योगिक वसाहत आणि गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेऊन राज्य सरकारच्या गृहविभागाने या नवीन पोलीस ठाण्याला मंजुरी दिली आहे.
कुडूस परिसर हा केवळ ग्रामीण भाग राहिला नसून, येथे कोकाकोला, ओनिडा, एस.एल. पॅकेजिंगसह चारशेहून अधिक लहान-मोठे कारखाने आहेत. उद्योगधंद्यांमुळे वाहनांची मोठी वर्दळ असते. या परिसरातून गेलेल्या वाडा-भिवंडी-मनोर या राज्य महामार्गावर नेहमीच अपघात आणि वाहतूक कोंडीची समस्या असते. अपुऱ्या मनुष्यबळावर ताण: सुमारे एक लाखाहून अधिक लोकसंख्या आणि ५२ गावांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आजवर केवळ ७ पोलिसांवर होती. अपुऱ्या मनुष्यबळामुळे चोरीचे मोठे गुन्हे, कामगार संघटना व मालकांमधील वाद तसेच इतर तंटे हाताळताना पोलिसांना मोठ्या अडचणी येत होत्या.


कायद्यासुव्यवस्थेसाठी महत्त्वाचे पाऊल


स्वतंत्र पोलीस ठाण्याच्या निर्मितीमुळे या भागातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट होणार आहे. नवीन रचनेनुसार, कुडूस पोलीस ठाण्यासाठी दोन पोलीस अधिकारी आणि ३० पोलीस कर्मचारी इतके अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे. गृहविभागाने घेतलेल्या या निर्णयाचे कुडूस आणि परिसरातील नागरिकांनी तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणावर स्वागत केले आहे. आता स्थानिक पातळीवरच नागरिकांचे प्रश्न आणि तक्रारी वेळेवर सुटण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक

'Satpati' will get Global recognition : मत्स्यनगरी 'सातपाटी'ला मिळणार जागतिक ओळख

बंदर विकास कामाचा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ; २४ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार मुंबई :

घरी जाताना अपघात घडला अन मित्र दगावला… दुसऱ्याचाही मग धक्कादायक निर्णय

Palghar Road Accident: पालघर (Palghar ) जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. जिल्ह्यातील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या

राज्यातील भाजपा खासदाराचा पहाटे भीषण अपघात, एअरबॅगमुळे थोडक्यात बचावले

पालघर : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येत आहे. भाजपचे पालघरचे खासदार डॉ. हेमंत विष्णू सावरा (MP Dr.

विरारमध्ये आणखी २ प्लॅटफॉर्मवरून धावणार १५ डब्यांच्या लोकल

चार महिन्यांत प्लॅटफॉर्म विस्तारीकरणाचे काम पूर्ण विरार : पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे