आंबा बागेमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव

खालापूर : थंडीच्या दिवसात आंब्यांना उत्तम मोहर आला आहे. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात थंडीमुळे आंब्यावर तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे आलेला मोहर वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. आठ दिवसांनी फवारणी करूनसुद्धा कीड नियंत्रणात येत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन करून नवीन औषध उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.


पाच ते दहा वर्षांच्या एका आंब्याच्या फवारणीसाठी ५० ते ६० रुपये खर्च येतो. त्याचबरोबर २५ ते ३० वर्षांच्या एका आंब्याच्या फवारणीचा खर्च १५० ते २०० रुपये इतका खर्च येतो. तसेच कृषी विभागाकडून कीटकनाशके औषध मिळत असली तरीसुद्धा ती तेवढी प्रभावी नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. सध्या आंबा बागेमध्ये तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून, दोन औषधे बदली करून पुन्हा लॅबमध्ये पाठवून त्यांची गुणवत्ता तपासली जाईल व पुढील आठवड्यात शेतकरीवर्गास आंब्याच्या तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार असल्याचे खालापूर तालुका कृषी अधिकारी, सुनील निंबाळकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.