आंबा बागेमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव

खालापूर : थंडीच्या दिवसात आंब्यांना उत्तम मोहर आला आहे. मात्र, यावर्षी मोठ्या प्रमाणात थंडीमुळे आंब्यावर तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव होत असल्यामुळे आलेला मोहर वाचविण्याची शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. आठ दिवसांनी फवारणी करूनसुद्धा कीड नियंत्रणात येत नसल्यामुळे शेतकरी हतबल झाले असून, विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी संशोधन करून नवीन औषध उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी करीत आहे.


पाच ते दहा वर्षांच्या एका आंब्याच्या फवारणीसाठी ५० ते ६० रुपये खर्च येतो. त्याचबरोबर २५ ते ३० वर्षांच्या एका आंब्याच्या फवारणीचा खर्च १५० ते २०० रुपये इतका खर्च येतो. तसेच कृषी विभागाकडून कीटकनाशके औषध मिळत असली तरीसुद्धा ती तेवढी प्रभावी नसल्याचे शेतकऱ्यांचे मत आहे. सध्या आंबा बागेमध्ये तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव दिसून येत असून, दोन औषधे बदली करून पुन्हा लॅबमध्ये पाठवून त्यांची गुणवत्ता तपासली जाईल व पुढील आठवड्यात शेतकरीवर्गास आंब्याच्या तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव यासंदर्भात मार्गदर्शन केले जाणार असल्याचे खालापूर तालुका कृषी अधिकारी, सुनील निंबाळकर यांनी सांगितले.

Comments
Add Comment

Raigad : १९६२ पशुवैद्यकीय हेल्पलाईन आता व्हॉट्सअ‍ॅपवर

अलिबाग : गेल्या पाच वर्षांत भारत फायनान्शियल इंक्लुजन लिमिटेड, इंडसइंड बँक व पशुसंवर्धन विभाग, महाराष्ट्र शासन

Devendra Fadnavis : नवी मुंबई विमानतळावर शिवरायांचा कांस्य पुतळा

नवी मुंबई विमानतळ : महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय

Chhatrapati Shivaji Maharaj's Coronation Day : शिवमय झाला रायगड! राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर लाखो शिवभक्तांची हजेरी

रायगड : प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता। शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।। छत्रपती शिवाजी

Raigad Crime : सोन्याच्या दागिन्यांसाठी महिलेचे अपहरण करून खून; दोघांना अटक

रायगड : सोन्याच्या दागिन्यांच्या लालसेपोटी एका महिलेचे अपहरण करून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना मांडवा

Minister Adv. Ashish Shelar : रायगडावरील सुविधांची सामूहिक पाहणी करून व्यापक आराखडा ठरविणार

मुंबई,  : रायगड किल्ला परिसरातील विकासकामे, जनसुविधा, स्वच्छता व्यवस्था, पाणीपुरवठा तसेच रायगड विकास

रायगड सज्ज! शिवराज्याभिषेकाच्या ३५३ व्या वर्धापन दिनासाठी ५ आणि ६ जूनला भव्य सोहळा