भारताने अल्प किंवा दीर्घकालीन युद्धासाठी तयार राहावे: तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान

मुंबई : दहशतवाद रोखण्यासाठी आणि शेजारी राष्ट्रांबरोबर असलेल्या प्रादेशिक वादाच्या पार्श्वभूमीवर भारताने उच्च तीव्रतेचे अल्पकालीन आणि दीर्घकालीन युद्धासाठी नेहमी तयार असले पाहिजे, असे महत्त्वाचे विधान भारताच्या तिन्ही संरक्षण दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केले. आशियातील सर्वात मोठ्या तंत्रज्ञान महोत्सवांपैकी एक असलेल्या आयआयटी मुंबईच्या टेकफेस्ट कार्यक्रमात बोलताना चौहान यांनी भविष्यातील बदलते युद्धांचे स्वरूप, तंत्रज्ञान आणि सामरिक दृष्टिकोनावर भाष्य केले.


अनिल चौहान यांनी पाकिस्तान आणि चीन यांचे नाव न घेता म्हटले की, भारताने कोणत्या प्रकारचे धोके आणि आव्हानांसाठी तयार असले पाहिजे? हे दोन तथ्यांवर आधारित असले पाहिजे. आपल्या शेजारचे दोन्ही देश अण्वस्त्रधारी देश आहेत. म्हणून आपण त्या पातळीपर्यंत प्रतिबंधकतेचे उल्लंघन होऊ देता कामा नये.


बदलत्या युद्धशैलीबाबतही चौहान यांनी भाष्य केले. ते म्हणाले, युद्धभूमी आता केवळ जमिनीपुरती मर्यादित राहिलेली नाही. युद्धक्षेत्राचा विस्तार आता अनेक क्षेत्रांपर्यंत झाला आहे. तंत्रज्ञानामुळे युद्धात क्रांतिकारक बदल घडले आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, हायपरसॉनिक शस्त्रे, प्रगत सेन्सर्स आणि डेटा विश्लेषणामुळे युद्ध अधिक वेगवान आणि बुद्धिमान बनत आहे. मानव विरुद्ध मानव याऐवजी मशीन विरुद्ध मशीन अशी युद्धाची दिशा झुकत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र