नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड 


नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून आणि पालापाचोळ्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताला महाराष्ट्र शासनाचा अधिकृत व राज्य-नोंदणीकृत ब्रॅण्ड “हरित महासिटी कंपोस्ट” लाभला आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तुर्भे क्षेपणभूमी येथील प्रकल्पात दररोज ३०-४० मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते.


हा ब्रॅण्ड गुणवत्तापरक आणि पर्यावरणपूरक मानकांचे पालन करतो, तसेच शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीत समाविष्ट असणाऱ्या मुंबई शहराला आणखी एक विशेष मानांकन लाभले आहे. "हरित महासिटी कंपोस्ट”हा ब्रॅण्ड महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या पुढाकाराने शहरी ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा प्रचार व विपणन करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे.


हा ब्रॅण्ड राज्य कचरा व्यवस्थापन नियम तसेच खत नियंत्रण आदेश (एफसीओ) अंतर्गत निर्धारित केलेल्या गुणवत्ता मानकांचे काटेकोरपणे पालन करतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी निर्माण होणारे सेंद्रिय खत त्या गुणवत्तेचे ठरले आहे.


या सेंद्रिय खताचा वापर नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये केला जात आहे. तसेच हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यातून शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक व गुणवत्तापूर्ण खताचा लाभ होत आहे.


महापालिकेच्या या पुढाकारामुळे केवळ कचऱ्याची मात्रा कमी होत नाही, तर मातीची सुपिकता वाढते आणि शाश्वत शेतीला चालना मिळते. “हरित महासिटी कंपोस्ट” ब्रॅण्डमुळे नवी मुंबई महानगरपालिका आता पर्यावरण संवर्धन व कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आणखी एक मानांकन प्राप्त करत आहे.

Comments
Add Comment

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत

भिवंडीतील बंडखोरांवर अपात्रतेची टांगती तलवार

भाजपचा व्हीप पाळावा लागणार; प्रदेश पातळीवरून वेगवान हालचाली सुरू मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या