नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड 


नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून आणि पालापाचोळ्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताला महाराष्ट्र शासनाचा अधिकृत व राज्य-नोंदणीकृत ब्रॅण्ड “हरित महासिटी कंपोस्ट” लाभला आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तुर्भे क्षेपणभूमी येथील प्रकल्पात दररोज ३०-४० मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते.


हा ब्रॅण्ड गुणवत्तापरक आणि पर्यावरणपूरक मानकांचे पालन करतो, तसेच शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीत समाविष्ट असणाऱ्या मुंबई शहराला आणखी एक विशेष मानांकन लाभले आहे. "हरित महासिटी कंपोस्ट”हा ब्रॅण्ड महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या पुढाकाराने शहरी ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा प्रचार व विपणन करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे.


हा ब्रॅण्ड राज्य कचरा व्यवस्थापन नियम तसेच खत नियंत्रण आदेश (एफसीओ) अंतर्गत निर्धारित केलेल्या गुणवत्ता मानकांचे काटेकोरपणे पालन करतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी निर्माण होणारे सेंद्रिय खत त्या गुणवत्तेचे ठरले आहे.


या सेंद्रिय खताचा वापर नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये केला जात आहे. तसेच हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यातून शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक व गुणवत्तापूर्ण खताचा लाभ होत आहे.


महापालिकेच्या या पुढाकारामुळे केवळ कचऱ्याची मात्रा कमी होत नाही, तर मातीची सुपिकता वाढते आणि शाश्वत शेतीला चालना मिळते. “हरित महासिटी कंपोस्ट” ब्रॅण्डमुळे नवी मुंबई महानगरपालिका आता पर्यावरण संवर्धन व कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आणखी एक मानांकन प्राप्त करत आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये