नवी मुंबईत कचऱ्यापासून निर्मित खताला मानांकित ओळख

राज्य नोंदणीकृत ‘हरित महासिटी कंपोस्ट’ ब्रॅण्ड 


नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात निर्माण होणाऱ्या ओल्या कचऱ्यापासून आणि पालापाचोळ्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताला महाराष्ट्र शासनाचा अधिकृत व राज्य-नोंदणीकृत ब्रॅण्ड “हरित महासिटी कंपोस्ट” लाभला आहे. नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, तुर्भे क्षेपणभूमी येथील प्रकल्पात दररोज ३०-४० मेट्रिक टन सेंद्रिय खताची निर्मिती केली जाते.


हा ब्रॅण्ड गुणवत्तापरक आणि पर्यावरणपूरक मानकांचे पालन करतो, तसेच शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध आहे. देशातील सर्वोत्तम स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’ या विशेष कॅटेगरीत समाविष्ट असणाऱ्या मुंबई शहराला आणखी एक विशेष मानांकन लाभले आहे. "हरित महासिटी कंपोस्ट”हा ब्रॅण्ड महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभागाच्या पुढाकाराने शहरी ओल्या कचऱ्यापासून तयार होणाऱ्या सेंद्रिय खताचा प्रचार व विपणन करण्यासाठी विकसित करण्यात आला आहे.


हा ब्रॅण्ड राज्य कचरा व्यवस्थापन नियम तसेच खत नियंत्रण आदेश (एफसीओ) अंतर्गत निर्धारित केलेल्या गुणवत्ता मानकांचे काटेकोरपणे पालन करतो. नवी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी निर्माण होणारे सेंद्रिय खत त्या गुणवत्तेचे ठरले आहे.


या सेंद्रिय खताचा वापर नवी मुंबई महानगरपालिकेच्या उद्यानांमध्ये केला जात आहे. तसेच हे सेंद्रिय खत शेतकऱ्यांना विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात येत असून, त्यातून शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक व गुणवत्तापूर्ण खताचा लाभ होत आहे.


महापालिकेच्या या पुढाकारामुळे केवळ कचऱ्याची मात्रा कमी होत नाही, तर मातीची सुपिकता वाढते आणि शाश्वत शेतीला चालना मिळते. “हरित महासिटी कंपोस्ट” ब्रॅण्डमुळे नवी मुंबई महानगरपालिका आता पर्यावरण संवर्धन व कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात आणखी एक मानांकन प्राप्त करत आहे.

Comments
Add Comment

उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी

बदलापूर ते नवी मुंबई थेट लोकलचा प्रस्ताव

बदलापूर : बदलापूर येथून थेट नवी मुंबईपर्यंत लोकल सेवा सुरू करण्याच्या दृष्टीने मोठी हालचाल सुरू झाली आहे.

कडोंमपाचा ३ हजार १८६ कोटींचा शिलकी अर्थसंकल्प

कोणतीही कर आणि दरवाढ नाही राज्य सरकारच्या अनुदानावर मदार कल्याण : चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर