दीपू दासच्या हत्येचे मुंबईसह, दिल्लीतही पडसाद

बांगलादेश उपउच्चायुक्तालयावर धडक; रस्त्यावर ठिय्या


मुंबई : बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकावरील हल्ले आणि दिपू चंद्र दास या तरुणाच्या हत्येच्या निषेधार्थ मुंबईत विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आक्रमक पवित्रा घेतला. मुंबई पालिका मुख्यालयासमोर कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी रस्ता रोखून धरल्याने पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेऊन आझाद मैदानात हलवले. तसेच देशभरातील इतर राज्यांमध्येही हिंदू संघटनांनी निषेध नोंदवला आहे. दिल्लीतील बांगलादेश उच्चायुक्तालयात सुरक्षा वाढवण्यात आली आहे.


दरम्यान मंगळवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास, बांगलादेश उच्चायुक्तालयाबाहेर कार्यकर्त्यांनी पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली. त्यांनी बांगलादेशात अडकलेल्या हिंदूंना, विशेषतः वैद्यकीय विद्यार्थ्यांना, सुरक्षा पुरवण्याचा मुद्दाही उपस्थित केला. बांगलादेशातील परिस्थिती सतत बिघडत चालली आहे, हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. सिंगापूरमध्ये बांगलादेशी विद्यार्थी नेता उस्मान हादीच्या मृत्यूनंतर, हिंदू मुलगा दीपू दासच्या मृत्यूबद्दल व्यापक संताप व्यक्त केला जात आहे.


सोमवारी, दीपू दास यांच्या मृत्यूचा निषेध करणाऱ्या विहिंप कार्यकर्त्यांनी सिलिगुडीच्या मध्यभागी असलेल्या सेवक रोडवरील बांगलादेश व्हिसा अर्ज केंद्र बंद पाडले. या घटनेमुळे शहरात व्यापक तणाव निर्माण झाला. गेल्या आठवड्यात, बांगलादेशातील भालुका येथे कपड्याच्या कारखान्यातील कामगार दीपू चंद्र दास यांना जमावाने मारहाण केली आणि नंतर रस्त्यावर लटकवून जिवंत जाळले. या घटनेच्या व्हिडीओमुळे बांगलादेशच्या अंतरिम सरकार आणि त्यांचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस यांच्याविरुद्ध जगभरात संतापाची लाट उसळली. युनूस यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.दीपू यांच्या क्रूर हत्ये आणि बांगलादेशात राहणाऱ्या अल्पसंख्याक हिंदूंवरील वाढत्या अत्याचारांविरुद्ध सोमवारी सकाळी सिलीगुडीमध्ये विविध टप्प्यांत निदर्शने करण्यात आली. बांगिया हिंदू जागरण मंचने रविवारी रात्री निदर्शने सुरू केली. त्यांनी शहरात मशाल मिरवणूक काढली आणि भारतातील बांगलादेशींसाठी असलेल्या सर्व वैद्यकीय, शैक्षणिक आणि इतर सुविधा बंद करण्याची मागणी केली.


या मुद्द्यावरून विश्व हिंदू परिषद रस्त्यावर उतरली. विश्व हिंदू परिषदच्या सदस्यांनी प्रथम बाघाजतीन पार्क ग्राउंड येथून निषेध मोर्चा काढला. त्यानंतर मिरवणूक कचरी रोडवरून पुढे गेली आणि हाश्मी चौकात पोहोचली, जिथे संघटनेच्या सदस्यांनी रस्ता रोखला. पोलिसांनी नाकेबंदी हटवल्यानंतर, विश्व हिंदू परिषद कार्यकर्ते आणि समर्थकांनी बिधान रोडवरून मोर्चा काढला आणि सेवक रोडवरील बांगलादेश व्हिसा अर्ज केंद्राला घेराव घातला आणि निदर्शने केली.


निषेधादरम्यान, निदर्शकांनी व्हिसा सेंटरच्या साइनबोर्डची तोडफोड केली आणि फ्लेक्स बॅनर फाडले. त्यांनी बांगलादेश व्हिसा सेंटरच्या गेटला बाहेरून कुलूपही लावले.

Comments
Add Comment

BMC APP : रस्त्यांवर खड्डे दिवसात का? करा माय बीएमसी मार्ग ऍपवर तक्रार

Mumbai : नागरिकांच्या तक्रारींचे जलद व प्रभावी निवारण करण्याच्या उद्देशाने मुंबई महानगरपालिकेने या वर्षी ‘MyBMC MARG’

BMC : घरकाम करणाऱ्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी पालिकेचे 'अ‍ॅप' विकसित करा; महिला व बाल कल्याण समिती अध्यक्षांची मागणी

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या महिला बचत गटातील सदस्यांना हक्काचा रोजगार

Industrial and commercial water usage : तरण तलाव, बांधकामांच्या ठिकाणच्या जलजोडण्या करणार खंडित

औद्योगिक व व्यावसायिक पाणी वापरात २० टक्के कपात मुंबई: पावसाळा लांबणीवर पडल्याने मुंबईत १५ मे २०२६ पासून १०

Commissioner Dr. Ashwini Joshi : अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची बदली

प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची नियुक्ती मुंबई  : मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉ. अश्विनी जोशी यांची

Water Shortage : पाणीटंचाईचे सावट गडद

जलतरण तलाव व बांधकामांच्या जलजोडण्या खंडित ; उद्योगांना २० टक्के कपात मुंबई : नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन

Alternative Transport Hub : बोरिवली स्थानकावरील गर्दी कमी होणार; कांदिवलीचा 'पर्यायी वाहतूक केंद्र' म्हणून विकास

मुंबई: पश्चिम रेल्वेवरील सर्वात वर्दळीचे स्थानक असलेल्या बोरिवली स्थानकावरील प्रवाशांचा ताण कमी करण्यासाठी