ठाकरे बंधूंची युती होताच भाजपने दिला मोठा दणका


मुंबई : महाराष्ट्रातील मुंबईसह २९ महापालिकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमानुसार मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. देशाची आर्थिक आणि महाराष्ट्राची राजकीय राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेत मागील मागील अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरेंच्या समर्थकांची सत्ता आहे. या सत्तेचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप भाजपने केला आहे. उद्धव ठाकरेंचा पक्ष आकंठ भ्रष्टाचारात बुडाला असल्याचे मंत्री आशिष शेलार म्हणाले. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या पक्षांनी मुंबई महापालिकेची निवडणूक एकत्र लढवण्याचा निर्णय घेतला आहे. ठाकरे बंधूंनी युतीची घोषणा करताच भाजपने दोन्ही भावांना जबर राजकीय धक्का दिला आहे.


उद्धव ठाकरे गटाच्या आणि मनसेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हा ठाकरे बंधूंसाठी मोठा दणका असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


उल्हासनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा दणका बसला. उल्हासनगरचे माजी उपमहापौर व माजी सभागृह नेते धनंजय बोडारे, माजी नगरसेविका वसुधाताई बोडारे, शितलताई बोडारे, ओमी कलानी गटाचे माजी नगरसेवक नाना बिराडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले. यावेळी आमदार कुमार आयलानी, उल्हासनगरचे भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया, प्रदीप राजानी, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन यांच्यासह भाजपचे इतर पदाधिकारी आणइ कार्यकर्ते उपस्थित होते.





पनवेलमध्ये मनसेला मोठा धक्का बसला. मनसेचे पनवेल महानगर संघटक तानाजी पिसे, नवीन पनवेलचे शहराध्यक्ष प्रथमेश गवळी, विद्यार्थी सेना विभाग अध्यक्ष रोहन गवळी, पदाधिकारी केनेथ देवासगयम यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या सर्वांना पक्षात प्रवेश देताना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी भाजप परिवाराच्या विकासाभिमुख आणि पारदर्शक कार्यशैलीने प्रेरित होऊन हे पदाधिकारी प्रवेश करत असल्याची माहिती दिली.


Comments
Add Comment

FIFA WORLDCUP 2026 : शिस्तभंगाच्या कारवायांचा विक्रम; लाल कार्डांचा आकडा १२ वर!

फुटबॉल जगतात शिस्तीचे कडक धोरण: २०२६ च्या फिफा विश्वचषकात पंचांनी अत्यंत कठोर भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे.

Bachchu Kadu : सध्या फक्त 'सचिन' आलेत, लवकरच संपूर्ण क्रिकेट टीम येणार; बच्चू कडूंचा दावा

- ठाकरे गटाच्या पडझडीला संजय राऊतच जबाबदार मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या सुरू असलेल्या वेगवान घडामोडी आणि

FIFA WORLDCUP 2026 : चॉकलेट ॲव्हेन्यू ते वर्ल्ड कप, हर्शेल, पेनसिल्व्हेनियाने ख्रिश्चन पुलिसिकला कसे घडवले?

हर्शेल: हर्शेल हे शहर आपल्या चॉकलेट उत्पादनांमुळे 'पृथ्वीवरील सर्वात गोड ठिकाण' (Sweetest Place on Earth) म्हणून ओळखले जाते.

Shivsena Amey Ghole : मुंबईकरांच्या मदतीसाठी शिवसेना सज्ज; गटनेते अमेय घोले यांनी दिले महत्वाचे निर्देश

मुंबई : मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचणे, झाडे कोसळणे, वाहतूक कोंडी, वीजपुरवठा खंडित

Indian Warships in Thailand : थायलंडमध्ये भारतीय युद्धनौकांचा संयुक्त सराव; सागरी सुरक्षेसाठी वाढला समन्वय

नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्यातील आयएनएस उदयगिरी, आयएनएस शक्ती आणि आयएनएस कवरत्ती या युद्धनौकांनी

Rain Alerts : हवामान खात्याचा रेड, ऑरेंज, यलो आणि ग्रीन अलर्ट म्हणजे काय? जाणून घ्या संपूर्ण माहिती

मुंबई : जून महिना जवळपास कोरडाच गेल्यानंतर जुलैच्या पहिल्याच दिवशी महाराष्ट्रात पावसाने दमदार हजेरी लावली.