Navnath Ban : "हिंदुत्वाचा सौदा करणाऱ्यांनी लोकशाहीवर बोलू नये"; भाजपचे नवनाथ बन यांचा संजय राऊतांवर घणाघाती प्रहार

मुंबई : राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन (Navnath Ban) यांनी सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. "ज्यांनी सत्तेसाठी हिंदुत्वाचा सौदा केला आणि मराठी माणसाची पत्राचाळ लुटली, त्यांनी आम्हाला लोकशाही शिकवू नये," अशा शब्दांत बन यांनी राऊतांना सुनावले आहे.



भ्रष्टाचार आणि कोविड घोटाळ्यावरून टोला


नवनाथ बन यांनी राऊतांच्या टीकेचा समाचार घेताना जुन्या घोटाळ्यांची आठवण करून दिली. ते म्हणाले की, "राऊतांनी बोलायचे असेल तर पत्राचाळ लूट, खिचडी घोटाळा आणि वसुली रॅकेटवर बोलावे. कोविडच्या संकटात जेव्हा जनता होरपळत होती, तेव्हा मलिदा खाणारे आज लोकशाहीसाठी मगरीचे अश्रू ढाळत आहेत, हा दुटप्पीपणाचा कळस आहे."



घरात बसून निवडणूक, बाहेर येऊन आरोप


उद्धव ठाकरे गटावर टीका करताना बन म्हणाले की, "देशात लोकशाही पूर्णपणे सुरक्षित आहे, मात्र उभाठा गटात कार्यकर्ते बेवारस झाले आहेत. नगरपालिका निवडणुका जाहीर झाल्या तरी यांचा एकही नेता मैदानात सभा घ्यायला तयार नाही. घरात बसून निवडणुका लढवायच्या आणि निकाल प्रतिकूल लागला की यंत्रणेवर शंका घ्यायची, ही राऊतांची जुनी सवय आहे."



हिंदुत्व सोडल्याचा पश्चात्ताप आणि 'खंजीर' राजकारण


"देवेंद्र फडणवीस यांच्या पाठीत खंजीर खुपसून राऊतांनी जे राजकारण केले, त्याचा फटका त्यांना आता बसू लागला आहे," असा दावा बन यांनी केला. हिरव्या मतांसाठी हिंदुत्वाचा सौदा करणाऱ्यांना जनता कधीही माफ करणार नाही आणि विधानसभेप्रमाणेच महापालिकेतही त्यांना पश्चात्ताप करावा लागेल, असेही ते म्हणाले.



विकास विरुद्ध भ्रष्टाचार : महाराष्ट्राचा कौल स्पष्ट


भाजपच्या विकासकामांचा पाढा वाचताना बन म्हणाले, "भाजप जेव्हा मेट्रो, कोस्टल रोड आणि अटल सेतू यांसारख्या विकासकामांवर बोलते, तेव्हा विरोधक केवळ घोटाळ्यांची चर्चा करतात. सव्वा दोनशे जागांचा महायुतीला मिळालेला कौल ही विकासावर उमटलेली मोहर आहे. महाराष्ट्राने भ्रष्टाचाराला पूर्णपणे नाकारले आहे."



राज ठाकरेंना धोक्याचा इशारा


मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य जवळिकीवर भाष्य करताना नवनाथ बन यांनी इशारा दिला. ते म्हणाले, "उद्धव आणि राऊत यांची परंपरा ही नेहमीच जवळच्यांना धोका देण्याची राहिली आहे. २००८ चा इतिहास पाहता राज ठाकरेंनी सावध राहावे. ही मिठी नसून पाठीत वार करण्याची तयारी असू शकते. मनसैनिकांनी राऊतांच्या नादाला लागू नये, हे 'मनोमिलन' नसून सत्तेच्या भीतीपोटी झालेले 'मिलन' आहे."

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र