एकाच महिला नेत्याला मिळाला प्रथम नागरिकाचा मान!

वसई-विरारमध्ये पाच पुरुष महापौर


गणेश पाटील विरार : वसई-विरार महापालिकेच्या महापौरपदी विराजमान होण्याची संधी यापूर्वी पाच पुरुषांना मिळाली असून, महिला नेत्याला मात्र केवळ एकदाच महापौर पदाच्या खुर्चीवर बसता आले आहे. महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असताना महापौर पदाच्या आरक्षणाबाबत मात्र अनिश्चितता आहे. त्यामुळे आगामी महापौर पदाच्या आरक्षणाकडे सर्वच राजकीय पक्षाच्या नेते, पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत.


२३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली आहे. १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान आणि १६ जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे. दरम्यान, नगरपंचायत, नगरपरिषदांच्या निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. नगराध्यक्षांची निवड थेट मतदारांनीच केली आहे. नगराध्यक्ष पदाचे आरक्षण निवडणुकांच्या पूर्वीच जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे संभाव्य नगराध्यक्ष पदाच्या शर्यतीतील नावे मतदारांसमोर सुद्धा आली होती. तथापि, महापालिका निवडणुक प्रक्रिया सुरू करण्याअगोदर महापौर पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आलेले नाही. त्यामुळे १६ जानेवारी रोजी नगरसेवक निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व राजकीय पक्षांना महापौर पदाच्या आरक्षणाबाबत उत्सुकता राहणार आहे.वसई-विरार महापालिका अस्तित्वात आल्यापासून ६ नगरसेवकांना महापौर पदाची संधी मिळाली आहे. प्रथम महापौर होण्याचा मान २८ मार्च २०१० रोजी बहुजन विकास आघाडीच्या राजीव यशवंत पाटील यांना मिळाला. त्यानंतरच्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नारायण मानकर हे महापौर झाले. महापालिकेच्या दुसऱ्या निवडणुकीत बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या पत्नी प्रविणा ठाकूर या वसई-विरारच्या पहिल्या महिला महापौर झाल्या. त्यानंतर रुपेश जाधव, प्रकाश रॉड्रिग्ज आणि प्रवीण शेट्टी या तीन पुरुष नगरसेवकांना महापौर पदाची संधी मिळाली. ११५ सदस्य संख्या असलेल्या या महापालिकेत आता सातवा महापौर कोण आणि कोणत्या राजकीय पक्षाचा असेल ही बाब आता आरक्षण जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे.


वसई-विरारमधील आतापर्यंतचे महापौर


१) राजीव यशवंत पाटील (२८ मार्च २०१० ते ४ जानेवारी २०१२), २) नारायण मानकर ( ५ जानेवारी २०१२ ते २८ जून २०१५), ३) प्रविणा हितेंद्र ठाकूर (२९ जून २०१५ ते २८ डिसेंबर २०१७), ४) रुपेश जाधव ( २९ डिसेंबर २०१७ ते २५ जुलै २०१९), ५) प्रकाश रॉड्रिग्ज ( २६ जुलै २०१९ ते २२ ऑगस्ट २०१९ ), ६) प्रवीण शेट्टी (२३ ऑगस्ट २०१९ ते २८ जून २०२०).

Comments
Add Comment

Bullet Train : बुलेट ट्रेनचे राज्यातील काम जोरात, तंत्रज्ञांनी पालघर जिल्ह्यात केली कमाल

पालघर : मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनचे काम प्रगतीपथावर आहे. केंद्रातल्या मोदी सरकार आणि राज्यातल्या फडणवीस

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन: पालघरमध्ये तिसऱ्या डोंगराळ बोगद्याचे काम फत्ते; अवघ्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील 'हे' मोठे आव्हान पूर्ण

पालघर : देशातील पहिल्या हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या (high-Speed Railway Project) म्हणजेच 'मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन'च्या

मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात ठार १३ जणांवर अंत्यसंस्कार, पीडित कुटुंबांचे पालकत्व शासन स्वीकारणार

डहाणू : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील धनिवरी येथे १८ मे रोजी झालेल्या भीषण अपघातातील १३ मृतांवर आज अत्यंत

Palghar Accident : काळजाचा ठोका चुकवणारं दृश्य! एकाच रांगेत १२ मृतदेह, बापूगावात महिलांचा हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

पालघर : आनंदाने नटलेले घर, साखरपुड्याच्या निमित्ताने जमलेले सर्व नातेवाईक आणि उत्साहाचे वातावरण... पण नियतीच्या

Palghar Accident : साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला, १३ जणांचा मृत्यू; मृतांच्या वारसांना मदत जाहीर

डहाणू : मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर डहाणू तालुक्यातील धानोरी येथे रविवारी दुपारी एक अत्यंत भीषण आणि

Mumbai- Ahemdabad Expressway Accident : डहाणूमध्ये 100 वऱ्हाड्यांनी भरलेल्या ट्रकला भरधाव कंटेनरची धडक; 12 जणांचा जागीच मृत्यू, 25 हून अधिक गंभीर

डहाणू : साखरपुड्याचा आनंद साजरा करण्यासाठी निघालेल्या एका कुटुंबावर आणि त्यांच्या पाहुण्यांवर काळाने अचानक