राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नवी मुंबई अध्यक्षपदी भरत जाधव

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नवी मुंबई शहराध्यक्षपदी भरत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष नामदेव भगत यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्या जागी भाजपपासून काही काळ दूर असलेले भरत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. जाधव हे नवी मुंबई महापालिकेत भाजपचे खाते उघडणारे पहिले नगरसेवक म्हणून ओळखले जातात. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असताना, २००५ मध्ये जाधव भाजपकडून सभागृहात निवडून गेले होते. त्यानंतर राजकीय प्रवासात अनेक स्थित्यंतरं झाली.


गणेश नाईक यांच्या पक्षांतरानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचा दबदबा पूर्वीसारखा राहिलेला नाही. अशा परिस्थितीत नामदेव भगत यांच्या जाण्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र भरत जाधव यांची थेट अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


वडील-मुलगी एकाच पक्षात:


ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच पक्षप्रवेश सोहळा रविवारी (ता. २१) ऐरोली येथे पार झाला. या वेळी अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, त्यांच्या पत्नी इंदुमती भगत, माजी नगरसेविका तनुजा मढवी यांच्यासह शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसच्या नवी मुंबई अध्यक्ष पूनम पाटील यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर भगत यांनीही पदाचा राजीनामा देत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

Comments
Add Comment

कल्याणमध्ये भटक्या कुत्र्यांचा पुन्हा हल्ला; ७ वर्षांच्या मुलाचा मृत्यू, परिसरात संताप

कल्याण : काही दिवसांपूर्वीच कुत्र्याच्या चाव्यानंतर भीतीतून एका तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली होती.

भटका कुत्रा चावला अन् तरुणाने उचलले टोकाचे पाऊल

कल्याण : दहशतवादी संघटनांप्रमाणेच आता भटक्या कुत्रांचीही दहशत अनेक शहरात वाऱ्यासारखी परसरत आहेत. अनेक

ठाणाच्या नगरसेवकांचा वेगळाच थाट; ठाणे महापालिकेच्या दारात सजल्या आलिशान गाड्या

ठाणे : कार एक्स्पो नव्हे तर ठाण्याच्या महानगरपालिका मुख्यालयाच अंगण आलिशान गाड्यांनी व्यापून गेलं होत. निमित्त

डोंबिवलीत जलवाहिनी फुटली, हजारो लीटर पाण्याची नासाडी

डोंबिवली : डोंबिवलीत जेसीबीचा धक्का लागल्यामुळे जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाण्याची

Thane Municipal Corporation : ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये ठाणे महापालिकेने पटकाविला तिसरा क्रमांक

ठाणे : राज्य शासनाच्या पर्यावरण व वातावरण बदल विभागामार्फत राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’

Ravindra Chavan : भिवंडी पालिकेत बंडखोरी करणाऱ्यांवर कारवाई करणार : रवींद्र चव्हाण

काँग्रेसच्या सहकार्याने भाजपचे बंडखोर महापौर पदी मुंबई : भिवंडी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत