राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नवी मुंबई अध्यक्षपदी भरत जाधव

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नवी मुंबई शहराध्यक्षपदी भरत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष नामदेव भगत यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्या जागी भाजपपासून काही काळ दूर असलेले भरत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. जाधव हे नवी मुंबई महापालिकेत भाजपचे खाते उघडणारे पहिले नगरसेवक म्हणून ओळखले जातात. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असताना, २००५ मध्ये जाधव भाजपकडून सभागृहात निवडून गेले होते. त्यानंतर राजकीय प्रवासात अनेक स्थित्यंतरं झाली.


गणेश नाईक यांच्या पक्षांतरानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचा दबदबा पूर्वीसारखा राहिलेला नाही. अशा परिस्थितीत नामदेव भगत यांच्या जाण्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र भरत जाधव यांची थेट अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


वडील-मुलगी एकाच पक्षात:


ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच पक्षप्रवेश सोहळा रविवारी (ता. २१) ऐरोली येथे पार झाला. या वेळी अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, त्यांच्या पत्नी इंदुमती भगत, माजी नगरसेविका तनुजा मढवी यांच्यासह शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसच्या नवी मुंबई अध्यक्ष पूनम पाटील यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर भगत यांनीही पदाचा राजीनामा देत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

Comments
Add Comment

Thane Mumbra Firing : मुंब्य्रात दिवसाढवळ्या धाड-धाड गोळ्या झाडल्याने खळबळ; ३ जण गंभीर जखमी

ठाणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून खून, बलात्कार आणि चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, गुन्हेगारांना

Kalyan News : कल्याण हादरलं! गांधारी परिसरात नागाचा थरार; एकापाठोपाठ तीन भटक्या कुत्र्यांचा मृत्यू

कल्याण : कल्याण पश्चिम भागातील गांधारी परिसरातून एक अत्यंत धक्कादायक आणि भीतीदायक घटना समोर आली आहे. गेल्या अनेक

उबाठा सेनेच्या शहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

डोंबिवली : भारतीय जनता पार्टी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी डोंबिवली पश्चिम

अंबरनाथमध्ये चिमुकलीवर भटक्या कुत्र्याचा हल्ला; पण भावाला वाचवलं

अंबरनाथ : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या त्रासाचे आणखी एक गंभीर उदाहरण अंबरनाथमधून समोर आले आहे. श्वानाने लहान

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल आणि उद्योगांना मोठा दिलासा

ठाणे : देशातील व्यावसायिक एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठ्याबाबत केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून,

ठाणे जिल्ह्यात पमी गुरुचा दबदबा, व्हायरल झाले अनेक रील

ठाणे : नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात अशोक खरात नावाच्या भोंदू बाबाने धुमाकूळ घातला. या भोंदू बाबाला पोलिसांनी