राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) नवी मुंबई अध्यक्षपदी भरत जाधव

नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) नवी मुंबई शहराध्यक्षपदी भरत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान अध्यक्ष नामदेव भगत यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्या जागी भाजपपासून काही काळ दूर असलेले भरत जाधव यांची निवड करण्यात आली आहे. जाधव हे नवी मुंबई महापालिकेत भाजपचे खाते उघडणारे पहिले नगरसेवक म्हणून ओळखले जातात. गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली एकेकाळी शिवसेना व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता असताना, २००५ मध्ये जाधव भाजपकडून सभागृहात निवडून गेले होते. त्यानंतर राजकीय प्रवासात अनेक स्थित्यंतरं झाली.


गणेश नाईक यांच्या पक्षांतरानंतर आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पक्षाचा दबदबा पूर्वीसारखा राहिलेला नाही. अशा परिस्थितीत नामदेव भगत यांच्या जाण्यानंतर निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र भरत जाधव यांची थेट अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने काही जुन्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


वडील-मुलगी एकाच पक्षात:


ऐरोली आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मेळावा तसेच पक्षप्रवेश सोहळा रविवारी (ता. २१) ऐरोली येथे पार झाला. या वेळी अजित पवार गटाचे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष नामदेव भगत, त्यांच्या पत्नी इंदुमती भगत, माजी नगरसेविका तनुजा मढवी यांच्यासह शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना (उद्धव ठाकरे) गटातील अनेक पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. काँग्रेसच्या नवी मुंबई अध्यक्ष पूनम पाटील यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केल्यानंतर भगत यांनीही पदाचा राजीनामा देत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे.

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये