आमदार निलेश राणे यांचे शिवसेनेतील वजन वाढले

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कणकवली नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केलेल्या चमकदार कामगिरीनंतर त्यांचे पक्षातील वजन वाढले आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीत निलेश राणे यांनी प्रभावी रणनीती आणि संघटन कौशल्य दाखवत पक्षाला यश मिळवून दिले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे. या यशामुळे निलेश राणे यांना लवकरच शिवसेनेत नेतेपदी नियुक्ती मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


सूत्रांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांच्या निवडणूक व्यवस्थापन आणि संघटन बांधणीवर समाधान मानले. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राणे यांच्यावर पक्षांतर्गत मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे. शिवाय कमी कालावधीत कोकणातील संघटनात्मक बांधणीत केलेल्या चमकदार कामगिरीची दखल घेऊन निलेश राणे यांना शिवसेना नेतेपदी बढती मिळणार असल्याचेही सांगण्यात आले.


शिवसेनेत नेते पदाला अतिशय महत्व आहे. मुख्य नेत्यानंतर शिवसेना नेते हे संघटनेतील क्रमांक दोनचे पद आहे. त्यानंतर उपनेते पदाला महत्त्व आहे. मुख्य नेत्याच्या निवडीसह पक्ष संघटनेतील अति महत्त्वाचे निर्णय नेत्यांचे मत जाणून घेतल्याशिवाय होत नाहीत.

Comments
Add Comment

Mumbai : जो पुरस्कार मिळवण्याचे स्वप्न बघितले तोच पुरस्कार देणारे हात झाले

मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते समाजातील ४४ महिलांचा गौरव मुंबई (विशेष प्रतिनिधी) : क्षेत्र कोणतेही

Ashwini Bhide : पहिल्या महिला मुंबई महापालिका आयुक्त म्हणून आश्विनी भिडे यांनी स्वीकारला पदभार

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबई महापालिका आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर ज्येष्ठ सनदी अधिकारी आश्विनी भिडे

Mahavir Jayanti : 'जागतिक अस्थिरतेच्या काळात महावीरांचा अहिंसेचा मार्गच मानवतेला तारू शकतो'

मुंबई : जागतिक पातळीवर वाढत असलेल्या युद्धजन्य परिस्थिती, हिंसा आणि असहिष्णुतेच्या पार्श्वभूमीवर भगवान

Lokesh Chandra Additional Chief Secretary : लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे नवे अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई : राज्याच्या प्रशासनात वरिष्ठ स्तरावर मंगळवारी मोठे फेरबदल करण्यात आले असून, १० सनदी अधिकाऱ्यांच्या

kurla bus accident : कुर्ला बस दुर्घटना प्रकरणातील आरोपी बस चालकाला जामीन

मुंबई: सव्वा वर्षापूर्वी कुर्ला पश्चिम येथे बेस्टचा भीषण अपघात झाला होता. या अपघात दुर्घटनेतील आरोपी चालक संजय

Maharashtra : महाराष्ट्रात १६ मेपासून जनगणना, देशात प्रथमच डिजिटल पद्धतीचा वापर

मुंबई : २०२७ च्या जनगणनेचे वेळापत्रक देशव्यापी जाहीर करण्यात आले आहे. महाराष्ट्रात जनगणनेचा पहिला टप्पा १६ मे ते