आमदार निलेश राणे यांचे शिवसेनेतील वजन वाढले

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण आणि कणकवली नगर परिषद निवडणुकीत शिवसेना आमदार निलेश राणे यांनी केलेल्या चमकदार कामगिरीनंतर त्यांचे पक्षातील वजन वाढले आहे. या प्रतिष्ठेच्या लढतीत निलेश राणे यांनी प्रभावी रणनीती आणि संघटन कौशल्य दाखवत पक्षाला यश मिळवून दिले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कामगिरीचे भरभरून कौतुक केले आहे. या यशामुळे निलेश राणे यांना लवकरच शिवसेनेत नेतेपदी नियुक्ती मिळणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.


सूत्रांनी सांगितले की, एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांच्या निवडणूक व्यवस्थापन आणि संघटन बांधणीवर समाधान मानले. त्यामुळे महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये राणे यांच्यावर पक्षांतर्गत मोठी जबाबदारी सोपवली जाणार आहे. शिवाय कमी कालावधीत कोकणातील संघटनात्मक बांधणीत केलेल्या चमकदार कामगिरीची दखल घेऊन निलेश राणे यांना शिवसेना नेतेपदी बढती मिळणार असल्याचेही सांगण्यात आले.


शिवसेनेत नेते पदाला अतिशय महत्व आहे. मुख्य नेत्यानंतर शिवसेना नेते हे संघटनेतील क्रमांक दोनचे पद आहे. त्यानंतर उपनेते पदाला महत्त्व आहे. मुख्य नेत्याच्या निवडीसह पक्ष संघटनेतील अति महत्त्वाचे निर्णय नेत्यांचे मत जाणून घेतल्याशिवाय होत नाहीत.

Comments
Add Comment

घाटकोपरमधील संजय भालेराव आणि डॉ अर्चना भालेराव यांचा उबाठाला 'जय महाराष्ट्र'

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : घाटकोपर पश्चिम मधील प्रभाग क्र. १२६च्या माजी नगरसेविका डॉ. अर्चना संजय भालेराव आणि माजी

Rahul Kalate : पिंपरीत शरद पवारांना मोठा धक्का; राहुल कलाटे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश, स्थानिक नेत्यांचा विरोध डावलून 'कमळ' हाती

मुंबई : आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार)

एनआयए प्रमुख सदानंद दाते होणार महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक

नवी दिल्ली : पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी २६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईत अतिरेकी हल्ला केला होता. या

Bangladesh High Commission Protests Delhi : हिंदूंवरील अत्याचाराचे दिल्लीत तीव्र पडसाद; संतप्त हिंदू संघटनांचा बांगलादेशी उच्चायुक्तालयावर धडक मोर्चा

नवी दिल्ली : शेजारील देश बांगलादेशमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या भीषण हिंसाचाराचे आणि हिंदू

रोजगार निर्मितीतच नव्हे तर नव्या अर्जदारांसह महिला अर्जदारांची संख्या तुफान वाढली- अहवाल

मुंबई: एक प्रसिद्ध झालेल्या अहवालातील माहितीनुसार, सेवेवर आधारित नोकरभरतीचा विस्तार झाल्याने तसेच महिलांसह

Dumping Ground : "प्रदूषणामुळे श्वास घेणं कठीण, ही तर आणीबाणीच!"; कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडप्रकरणी हायकोर्टाचे पालिकेवर ताशेरे

मुंबई : कांजूरमार्ग डंपिंग ग्राऊंडमधून येणारी दुर्गंधी आणि वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईकरांच्या आरोग्याचा