वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडी फुटणार

एमएमआरडीए उभारणार नवा पादचारी पूल


मुंबई  : वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानक आणि लकी हॉटेल जंक्शन परिसरातील तीव्र वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.


मेट्रो लाईन २बी च्या कामासाठी पाडलेल्या जुन्या स्कायवॉकच्या जागी आता २७८ मीटर लांबीचा आधुनिक पादचारी पूल उभारला जाणार आहे. या प्रकल्पासाठी ४१.४४ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून पुढील १८ महिन्यांत हे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.


हा नवीन पूल एस. व्ही. रोडवरून वांद्रे मेट्रो स्थानकाला थेट पश्चिम रेल्वे स्थानकाशी जोडणार आहे. यामुळे रेल्वेतून उतरून मेट्रोकडे जाणाऱ्या किंवा उलट प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना रस्त्यावरील गर्दीत न उतरता सुरक्षित प्रवास करता येईल. विशेषतः लकी हॉटेल जंक्शनवरील सिग्नल आणि वाहनांच्या गर्दीतून प्रवाशांची सुटका होणार आहे.


स्थानिकांचा विरोध आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह


नव्या पुलाच्या नियोजनाबाबत स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधींची नाराजी आहे. प्रकल्प आखताना स्थानिक एस. व्ही. रोड रहिवासी संघाशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नाही. जुना स्कायवॉक अपग्रेड करण्याऐवजी पुन्हा तोच प्रयोग करणे म्हणजे नियोजनातील त्रुटी आहे, असे स्थानिकांनी सांगितले. नवीन प्रकल्पही जुन्या स्कायवॉकसारखाच 'पांढरा हत्ती' ठरू नये, अशी भीती आहे.

Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र