युवा भारताचे स्वप्न अधुरे!

१३ वर्षांनंतर पाकची जेतेपदावर मोहोर


दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी झाला. या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर ३४८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. मात्र भारताची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. भारतीय संघाकडून ३४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे सलामीला फलंदाजीला उतरले. वैभवने पहिल्याच षटकात दोन षटकार आणि चौकारासह १८ धावा चोपल्या. एका बाजूने वैभव आक्रमक खेळत असताना आयुष म्हात्रे मात्र तिसऱ्या षटकात फरहान युसूफच्या हातून अली रझाच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो २ धावांवर बाद झाला. त्यानंतरही फलंदाजीला आलेल्या ऍरॉन जॉर्जने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यान चौथ्या षटकात तीन चौकार मारले, मात्र त्यानंतर त्यालाही मोहम्मद सय्यमने चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. तो ९ चेंडूंत १६ धावा करून बाद झाला.


तो बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर अली रधाने वैभव सूर्यवंशीलाही बाद करत भारताला धक्का दिला. वैभवचा झेल हामझा झहुरने घेतला. वैभवने १० चेंडूंत १ चौकार आणि ३ षटकारांसह २६ धावांवर बाद झाला.


इतकेच नाही, तर उपकर्णधार विहान मल्होत्राही ७ धावांवर बाद झाला. त्यामुळे आक्रमक सुरुवातीनंतर भारताने ५९ धावांवरच ४ विकेट्स गमावल्या. भारतासमोर मोठे लक्ष्य असताना आता हे लक्ष्य पार करण्याची जबाबदारी मधल्या आणि तळातल्या फलंदाजांवर आहे.


तत्पूर्वी, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ बाद ३४७ धावा केल्या. पाकिस्तानकडून समीर मिन्हासने ११३ चेंडूंत १७२ धावा केल्या. अहमन हुसैनने ७२ चेंडूंत ५६ धावांची खेळी केली. उस्मान खानने ३५ धावांची खेळी केली. भारताकडून दीपेश देवेंद्रनने ३ विकेट्स घेतल्या.

Comments
Add Comment

भारतीय महिला संघाची विजयी सलामी

जेमिमाच्या अर्धशतकाने श्रीलंकेची कोंडी; मालिकेत १-० ने आघाडी विशाखापट्टणम : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चे

Rohit Sharma...२०२३ वर्ल्ड कपचा पराभव जिव्हारी लागला; क्रिकेट कायमचा सोडण्याचा विचार केला होता

मुंबई : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा याने २०२३ च्या वनडे वर्ल्ड कप फायनलमधील पराभवाबाबत मनमोकळं वक्तव्य

भारत १९ वर्षांखालील आशिया कप फायनलमध्ये विक्रमी नवव्यांदा विजय मिळवण्याकडे भारताचे लक्ष्य...

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया कप २०२५ चा अंतिम सामना आज, २१ डिसेंबर रोजी दुबई येथे होणार आहे. आयुष

भारत-श्रीलंका महिला संघांमध्ये टी-२० चा रणसंग्राम

आजपासून मालिकेला सुरुवात विश्वचषक संघ निवडीसाठी खेळाडूंची कसोटी विशाखापट्टनम : २०२६ च्या महिला टी-२०

दुबईत रविवारी भारत-पाक आमने-सामने, आशिया चषकावर कोण नाव कोरणार ?

दुबई  : क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि पारंपरिक लढत पुन्हा एकदा अंतिम सामन्याच्या निमित्ताने रंगणार आहे.

टी ट्वेंटी विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा; गिलला वगळले

मुंबई : भारत आणि श्रीलंका संयुक्तपणे आयोजीत करत असलेल्या टी ट्वेंटी विश्वचषक २०२६ साठी बीसीसीआयच्या निवड