युवा भारताचे स्वप्न अधुरे!

१३ वर्षांनंतर पाकची जेतेपदावर मोहोर


दुबई : १९ वर्षांखालील आशिया कप २०२५ स्पर्धेतील अंतिम सामना रविवारी झाला. या सामन्यात पाकिस्तानने भारतासमोर ३४८ धावांचे मोठे लक्ष्य ठेवले आहे. मात्र भारताची सुरुवात फारशी चांगली झालेली नाही. भारतीय संघाकडून ३४८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी वैभव सूर्यवंशी आणि कर्णधार आयुष म्हात्रे सलामीला फलंदाजीला उतरले. वैभवने पहिल्याच षटकात दोन षटकार आणि चौकारासह १८ धावा चोपल्या. एका बाजूने वैभव आक्रमक खेळत असताना आयुष म्हात्रे मात्र तिसऱ्या षटकात फरहान युसूफच्या हातून अली रझाच्या गोलंदाजीवर बाद झाला. तो २ धावांवर बाद झाला. त्यानंतरही फलंदाजीला आलेल्या ऍरॉन जॉर्जने आक्रमक पवित्रा घेतला होता. त्यान चौथ्या षटकात तीन चौकार मारले, मात्र त्यानंतर त्यालाही मोहम्मद सय्यमने चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर बाद केले. तो ९ चेंडूंत १६ धावा करून बाद झाला.


तो बाद झाल्यानंतर पुढच्याच चेंडूवर अली रधाने वैभव सूर्यवंशीलाही बाद करत भारताला धक्का दिला. वैभवचा झेल हामझा झहुरने घेतला. वैभवने १० चेंडूंत १ चौकार आणि ३ षटकारांसह २६ धावांवर बाद झाला.


इतकेच नाही, तर उपकर्णधार विहान मल्होत्राही ७ धावांवर बाद झाला. त्यामुळे आक्रमक सुरुवातीनंतर भारताने ५९ धावांवरच ४ विकेट्स गमावल्या. भारतासमोर मोठे लक्ष्य असताना आता हे लक्ष्य पार करण्याची जबाबदारी मधल्या आणि तळातल्या फलंदाजांवर आहे.


तत्पूर्वी, पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकात ८ बाद ३४७ धावा केल्या. पाकिस्तानकडून समीर मिन्हासने ११३ चेंडूंत १७२ धावा केल्या. अहमन हुसैनने ७२ चेंडूंत ५६ धावांची खेळी केली. उस्मान खानने ३५ धावांची खेळी केली. भारताकडून दीपेश देवेंद्रनने ३ विकेट्स घेतल्या.

Comments
Add Comment

T20 World Cup 2026: भारतीय संघाला मोठा झटका; 'हा' खेळाडू स्पर्धेतून बाहेर

मुंबई: आयसीसी पुरुष T२० विश्वचषक २०२६ ची आजपासून (शनिवार, ७ फेब्रुवारी) सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरु

युवा भारत सहाव्यांदा विश्वविजेता, अंतिम सामन्यात इंग्लंडवर 'वैभव'शाली विजय

हरारेत तिरंगा डौलाने फडकला हरारे  : आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या १९ वर्षांखालील भारतीय क्रिकेट

टी-२० विश्वचषकाचा शनिवारपासून रणसंग्राम, भारतासमोर अमेरिकेचे कडवे आव्हान

मुंबई : टी-२० विश्वचषकाचा बिगुल वाजला असून, गतविजेता भारतीय संघ शनिवारी घरच्या मैदानावर म्हणजेच वानखेडे

हरारेत सूर्यवंशीचा शतकी 'तांडव', कर्णधार आयुष म्हात्रेची भक्कम साथ

हरारे : १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेच्या महाअंतिम सामन्यात भारतीय युवा संघाने इंग्लंडविरुद्ध धावांचा पाऊस

शनिवारपासून सुरू होणार टी२० क्रिकेटचा थरार

मुंबई : पुरुषांचा आयसीसी टी ट्वेंटी विश्वचषक शनिवार ७ फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होत आहे. या विश्वचषकाचा अंतिम

१९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात वैभवची वादळी खेळी; फक्त ३० चेंडू आणि ....

मुंबई : सर्वत्र सध्या चर्चा सुरु आहे ती फक्त आणि फक्त १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्याची आणि