अंबरनाथमध्ये नगराध्यक्ष भाजपचाच

भाजपच्या तेजश्री करंजुले विजयी; शिंदे गटाच्या मनिषा वाळेकर पराभूत


अंबरनाथ : अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून, नगराध्यक्षपदावर भाजपने बाजी मारली आहे. भाजपच्या तेजश्री करंजुळे पाटील या नगराध्यक्ष म्हणून विजयी झाल्या. मात्र, नगरसेवक संख्येत शिवसेना (शिंदे गट) आघाडीवर राहिली असून, पक्षाचे सर्वाधिक २३ नगरसेवक निवडून आले आहेत. या निवडणुकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शिवसेना शिंदे गटाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.


नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या मनिषा वाळेकर आणि भाजपच्या तेजश्री करंजुळे पाटील यांच्यात चुरशीची लढत झाली. अखेरीस भाजपने नगराध्यक्षपद पटकावत सत्ता मिळवली. नगराध्यक्ष भाजपचा असला, तरी नगरसेवक संख्येत शिंदेसेनेची आघाडी कायम राहिल्याने अंबरनाथमधील सत्तासमीकरणे संतुलित असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.


विजयी नगरसेवकांची यादी :


भाजप (१०): स्वप्ना गायकवाड, मीना वाळेकर, रंजना कोतेकर, मनीष गुंजाळ, अभिजीत करंजुळे, जयश्री थर्टी, अनिता भोईर, सुजाता भोईर, सचिन गुंजाळ, सुप्रिया आतिष पाटील.


शिवसेना (शिंदे गट) (२३): संगीता गायकर, रेश्मा गुडेकर, राहुल सोमेश्वर, निखिल चौधरी, ज्योत्सना भोईर, कुणाल भोईर, अपर्णा भोईर, पल्लवी लकडे, विकास सोमेश्वर, स्वप्निल बागुल, पुरुषोत्तम उगले, संदीप भराडे, कल्पना गोरे, रोहिणी भोईर, संदीप तेलंगे, अजय मोहिरीकर, सचिन मंचेकर, रेश्मा सुर्वे, सुनीता बागुल, रवींद्र करंजुळे, दीपक गायकवाड, रवी पाटील, राजेंद्र वाळेकर.


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) (४): सदाशिव पाटील, सचिन पाटील, मीरा शेलार, सुनीता पाटील.


काँग्रेस (१२): तेजस्विनी पाटील, प्रदीप पाटील, विपुल पाटील, कबीर गायकवाड, मनीष म्हात्रे, धनलक्ष्मी जयशंकर, संजवणी देवडे, दिनेश गायकवाड, किरण राठोड .


५९ नगरसेवक पदांसाठी झालेल्या निवडणुकीत निकाल पुढीलप्रमाणे लागला


शिवसेना (शिंदे गट) : २३ जागा


काँग्रेस : १२ जागा


भाजप : १० जागा


राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) : ४ जागा

Comments
Add Comment

भिवंडीत श्वानदंश झालेल्या मुलाचा मृत्यू

भिवंडी : श्वानदंश झालेल्या १२ वर्षीय हमीद खान याचा उपचारादरम्यान मृत्यूची घटना भिवंडीत घडली आहे. १० जानेवारीला

ठाण्यातील भव्य त्रिमंदिर भाविकांसाठी खुले; तीन दिवसांच्या प्राणप्रतिष्ठेनंतर दर्शनास सुरुवात

ठाणे : ठाणे शहरात उभारण्यात आलेले भव्य त्रिमंदिर अखेर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. तीन दिवस चाललेल्या

ठाणे-घोडबंदर रोडचे रुंदीकरण होणार?

मीरा-भाईंदर (वार्ताहर): ठाणे-घोडबंदर रस्ता ६० मीटर रुंद करण्यासाठी आवश्यक असणारी भूसंपादनाची प्रक्रिया

कोयना प्रकल्पग्रस्त सुविधांपासून वंचित

ठाणे ( प्रतिनिधी): साडेसहा दशकांपूर्वी सातारा जिल्ह्यातील कोयना धरण प्रकल्पात बाधित झालेल्या सुमारे ८०हून अधिक

ठाणे शहरात उभारणार १९ ई-वाहन चार्जिंग स्टेशन्स

ठाणे (प्रतिनिधी) : महापालिका क्षेत्रातील इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शहरात ई-वाहन वापराला

सायबर दृष्टी सेलचा डिजिटल साक्षरता प्रवास

कल्याण (प्रतिनिधी) : बी. के. बिर्ला नाईट कॉलेज, कल्याण येथील सायबर दृष्टी सेल यांच्या विद्यमाने नागरिकांमध्ये