हिंगोली जिल्ह्यात महायुतीचा डंका, तिन्ही नगरपरिषदांवर महिला नगराध्यक्ष

हिंगोली : राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यभरात भाजपचे १२० नगराध्यक्ष निवडून आले असून शिंदे गटाची शिवसेना ५७, अजित पवार गट ३८, काँग्रेस ३०, ठाकरे गट १०, शरद पवार गट १० तर इतर पक्षांचे २३ नगराध्यक्ष निवडून आले आहेत.


या निकालांमध्ये हिंगोली जिल्ह्यात महिलांचा प्रभाव ठळकपणे दिसून आला आहे. हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या तिन्ही नगरपरिषदांमध्ये महिला नगराध्यक्ष निवडून आल्या असून महाविकास आघाडीला या तिन्ही ठिकाणी एकही जागा राखता आलेली नाही.


हिंगोली नगरपरिषदेत शिंदे गटाच्या शिवसेनेचा मोठा विजय झाला आहे. नगराध्यक्ष पदासाठी उभ्या असलेल्या रेखा बांगर यांनी २३ हजार ७९ मते मिळवत दणदणीत विजय मिळवला. त्यांच्यासमोर महाविकास आघाडीकडून उभ्या असलेल्या शिवसेना उबाठा उमेदवाराला केवळ ३ हजार ३८४ मतांवर समाधान मानावं लागलं.


वसमत नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनीता बाहेती यांनी २० हजार १६५ मते मिळवत नगराध्यक्षपद पटकावलं. काँग्रेसच्या सीमा अब्दुल हाफिज यांना १६ हजार ७१४ मते मिळाली असून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. वसमत नगरपरिषदेत महाविकास आघाडीचे केवळ सहा नगरसेवक निवडून आल्याने आघाडीला मोठा फटका बसल्याचं चित्र आहे.


कळमनुरी नगरपरिषदेतही शिंदे गटाच्या शिवसेनेचा वरचष्मा राहिला. नगराध्यक्षपदासाठी आश्लेषा चौधरी यांनी ५ हजार ६३५ मते मिळवत विजय मिळवला. काँग्रेसच्या उमेदवाराला ३ हजार २८८ मते मिळाली असून त्यांचा पराभव झाला आहे. या नगरपरिषदेत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना ठाकरे गटाचा एकही नगरसेवक निवडून आलेला नाही, तर काँग्रेसला केवळ एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे.


हिंगोली जिल्ह्यातील या निकालांनी महिलांचं नेतृत्व आणि महायुतीचं वर्चस्व स्पष्ट केलं असून महाविकास आघाडीसाठी हा निकाल मोठा इशारा मानला जात आहे.

Comments
Add Comment

गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वाचे : मुख्यमंत्री

महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कॅनडाची भागीदारी मुंबई, दि. 5 : महाराष्ट्राच्या विकासात योगदान

'ग्रामीण विकासासाठी शिवसेनेला पाठबळ द्या'

विकासकामे, घरकुल आणि पाणीप्रश्न सोडवण्याची दिली हमी खेडमधील प्रचारसभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास

अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यातील १५ आमदार जाणार लंडन दौऱ्यावर

मुंबई : महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यातील १५ आमदार दि. १५ ते २२ फेब्रुवारी

'जिल्हा परिषद निवडणूक कार्यकर्त्यांची; आंबेगावच्या सर्वांगीण विकासाला गती देऊ '

पर्यटन, उद्योग, पाणी यासाठी मांडला मोठा आराखडा जिल्हा परिषदेत भगवा फडकवण्याचे आवाहन; उपमुख्यमंत्री एकनाथ

'पल्स' परिषदेच्या माध्यमातून वैद्यकीय वेलनेस पर्यटनाचा 'महाराष्ट्र ब्रँड' निर्माण करा - मुख्यमंत्री फडणवीस

मुंबईत २७ व २८ मार्च रोजी वैद्यकीय परिषद 'पल्स' चे आयोजन मुंबई : वैद्यकीय क्षेत्रात जागतिक स्तरावर महाराष्ट्राला

शिवजन्मभूमीचा विकास करणे आमचे भाग्य

जुन्नरला देशातील क्रमांक-१ पर्यटन तालुका करणार एमआयडीसी, आयटी पार्क चांगले रस्ते तयार करून जुन्नरचा कायापालट