बदलापूरमध्ये फुलले 'कमळ'

नगराध्यक्षपदी रुचिता घोरपडे, नगरसेवक संख्येत बरोबरी


बदलापूर  : कुळगाव–बदलापूर नगरपरिषद निवडणुकीत भाजपने शिवसेना (शिंदे गट) यांना मोठा धक्का दिला आहे. भाजपच्या रुचिता राजेंद्र घोरपडे यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक ७ हजार ६३४ मतांच्या फरकाने जिंकत शिवसेनेचा बालेकिल्ला हादरवला. घोरपडे यांना ६४ हजार ६०४ तर शिवसेनेच्या वीणा वामन म्हात्रे यांना ५६ हजार ९७० मते मिळाली. नगराध्यक्षपद भाजपकडे गेले असले, तरी नगरसेवकांच्या संख्येत मात्र भाजप आणि शिवसेना समान पातळीवर राहिली.


पालिकेतील कथित भ्रष्टाचार, शिवसेनेतील घराणेशाहीचे आरोप (एकाच कुटुंबातील सहा उमेदवार), तसेच भाजपचा आक्रमक व नियोजनबद्ध प्रचार यामुळे भाजपचा विजय सोप्पा झाल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेली जंगी सभा आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिलेले बळही निर्णायक ठरले. ही निवडणूक शिवसेनेचे शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यातील संघर्षाचे प्रतिबिंब मानली जात होती. विधानसभा निवडणुकीपासून सुरू असलेला हा संघर्ष नगरपरिषद निवडणुकीत अधिक तीव्र झाला. भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियासोबत केलेली रणनितीही भाजपच्या बाजूने गेली.


दरम्यान, प्रचारादरम्यान समाजमाध्यमांवरील आरोप-प्रत्यारोप, रावळगाव फॅक्टरीचा मुद्दा आणि घराणेशाहीची चर्चा भाजपच्या प्रचाराला पूरक ठरल्याचे मानले जाते. निवडणुकीदरम्यान उघडपणे पैसे वाटपाच्या घटना घडल्या.

Comments
Add Comment

Eknath Shinde : ठाणे क्लस्टर योजनेला गती देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

वागळे इस्टेट, किसननगर, कोपरी क्लस्टर महाप्रीतकडून एमएसआरडीसीकडे देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे

Central Railway Power Block Update : मध्य रेल्वेवर पॉवर ब्लॉक; ६ जूनला अनेक गाड्या रद्द, वेळापत्रकात बदल, लोकल सेवांवरही परिणाम!

कल्याण (Mumbai Central Railway Block) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आटगाव स्थानकावर नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (Electronic Interlocking)

No-Parking Restrictions Ulhasnagar Roads : ठाणेकरांनो लक्ष द्या! उल्हासनगरमधील 'या' ५ मुख्य रस्त्यांवर २४ तास नो-पार्किंग; वाहतूक पोलिसांचा कडक निर्णय

उल्हासनगर : उल्हासनगर शहरात (Ulhasnagar) दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका करण्यासाठी ठाणे वाहतूक

Thane News : दिवा येथून ७ वर्षीय चिमुकली बेपत्ता; ३६ तासांच्या प्रयत्नानंतर ठाणे पोलिसांना यश

ठाणे : ठाणे (Thane News) जिल्ह्यातील दिवा परिसरातून बेपत्ता झालेल्या ७ वर्षीय मुलीचा अवघ्या ३६ तासांत शोध घेण्यात ठाणे

Bhiwandi Water : भिवंडीच्या १५ लाख लोकांना २७३ एमएलडी पाणी मिळणार, ४२६ कोटींचा पाणी प्रकल्प

भिवंडी : अमृत अभियान २.० उपक्रमांतर्गत भिवंडी-निझामपूर शहराच्या विस्तारित पाणीपुरवठा योजनेंतर्गत १५ लाख

Actor Sharad Ponkshe : सावरकरांचे विचार विश्व कल्याणाचे - अभिनेते शरद पोंक्षे

ठाणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कोणीही थांबवू शकत नाही. त्यांचे विचार विश्वकल्याणाचे आहेत. त्यांचे