उड्डाणानंतर दिल्ली - मुंबई विमानात बिघाड, इंजिन हवेतच पडलं बंद

नवी दिल्ली : दिल्लीहून मुंबईकडे निघालेल्या एअर इंडियाच्या विमानात उड्डाणानंतर अवघ्या ४० मिनिटांत तांत्रिक बिघाड झाल्याने आपत्कालीन लँडिंग करावं लागलं. या विमानात ३५५ प्रवासी प्रवास करत होते. उजव्या बाजूचं इंजिन बंद पडल्याने वैमानिकाने तातडीने विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर उतरवलं.


एअर इंडियाचं AI887 हे विमान आज सकाळी ६ वाजून १० मिनिटांनी दिल्लीहून मुंबईसाठी रवाना झालं होतं. मात्र उड्डाणानंतर काही वेळातच विमानाच्या उजव्या इंजिनमधील ऑईल प्रेशर शून्यावर आल्याचं वैमानिकाच्या निदर्शनास आलं. ही बाब लक्षात येताच वैमानिकांनी हवेतच यू-टर्न घेतला आणि ६ वाजून ५२ मिनिटांनी विमान सुरक्षितपणे दिल्ली विमानतळावर उतरवलं.


ऑईल प्रेशर कमी होणं ही विमानासाठी गंभीर तांत्रिक अडचण मानली जाते. या स्थितीत इंजिनच्या काही भागांपर्यंत तेल पोहोचत नाही, ज्यामुळे इंजिन गरम होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत उड्डाण सुरू ठेवल्यास इंजिन पूर्णपणे निकामी होण्याची शक्यता असते. मात्र विमानातील दुसरं इंजिन कार्यरत असल्यास वैमानिक सुरक्षित लँडिंग करू शकतात, म्हणूनच तत्काळ लँडिंगचा निर्णय घेण्यात आला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व प्रवासी सुरक्षित असून त्यांना पुढील प्रवासासाठी दुसऱ्या विमानाची व्यवस्था करण्यात आली.


दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने एअर इंडियाकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. तसेच नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाला या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Comments
Add Comment

जम्मू–काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर; आंतरराष्ट्रीय सीमेच्या जवळ घुसखोरीचा संशय

जम्मू : जम्मू–काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेच्या (IB) जवळ घुसखोरीचा संशय निर्माण झाल्यानंतर

ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या स्वतःच नष्ट होतात!

सोमनाथ स्वाभिमान पर्वात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संदेश सोमनाथ : ज्या संस्कृती इतरांना नष्ट करू पाहतात, त्या

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि