जव्हार नगर परिषद निवडणुकीत भाजपच्या पूजा उदावंत विजयी

जव्हार : जव्हार नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीने स्पष्ट बहुमत मिळवत नगर परिषदेवर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जनतेने दिलेल्या कौलाचा सन्मान राखत आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करण्यासाठी भाजपच्या वतीने जव्हारमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात विजयाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत भाजपचे विजयी उमेदवार, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यावेळी पालघर लोकसभा खासदार डॉ. हेमंत विष्णू सवरा, विक्रमगड विधानसभा आमदार हरिश्चंद्र भोये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते प्रकाश निकम, तसेच नवनिर्वाचित नगराध्यक्ष पूजा उदावंत उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी ही सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन जव्हारचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध आहे. पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, रोजगार आणि नागरी सुविधा या क्षेत्रांमध्ये ठोस विकासकामे हाती घेतली जातील. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा प्रभावी लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यावर भर देण्यात येईल.

भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार

जव्हार नगर परिषद निवडणूक २०२५ मध्ये भारतीय जनता पार्टीचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : प्रभाग क्र. १ – नकुल पटेकर, प्रभाग क्र. २ – हितेश जाधव, पूजा खोरगडे, प्रभाग क्र. ३ – आफरीन शेख, प्रभाग क्र. ४ – कुणाल उदावंत, प्रभाग क्र. ६ – स्वप्निल औसरकर, स्नेहा घाटाळ, प्रभाग क्र. ७ – अनंता गरेल, प्रभाग क्र. ८ – सचिन सटणेकर, मनीषा वड, प्रभाग क्र. ९ – संगीता मुकणे, सुशील सहाने, प्रभाग क्र. १० – दर्शन तामोरे, रुचिता वाजे या निकालात भाजपच्या पूजा उदावंत यांची नगराध्यक्षपदी निवड झाली.

तसेच इतर पक्षांचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे: प्रभाग क्र. १ – पद्मा रजपूत (शिवसेना), प्रभाग क्र. ३ – अमोल बर्वे (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्र. ४ – अश्विनी चव्हाण (मविआ), प्रभाग क्र. ५ – कमल कुवरे, इमरान मेमन (राष्ट्रवादी काँग्रेस), प्रभाग क्र. ७ – नसीमा मेमन (शिवसेना गट)

 
Comments
Add Comment

प्रभाग समितीच्या रचनेत ‘बविआ’ची बाजी

नियमांच्या गणितात केवळ एक समिती भाजपकडे  विरार : वसई-विरार पालिका क्षेत्रात नऊ प्रभाग समित्यांची रचना

वनजमिनीच्या तांत्रिक पेचात अडकली आदिवासींची घरे

विवेक पंडित यांनी मंत्रालयाचे वेधले लक्ष वसई  : राज्यातील बेघर आदिवासी, विशेषतः आदिम कातकरी समाजाच्या गावठाण

तारापूर औद्योगिक वसाहतीत वायू गळती

बोईसर : पालघर जिल्ह्यातील बोईसरमधील तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या भघेरिया केमिकल्समध्ये (जुने नाव : झेनित

पालघरमध्ये बंद दगड खाणीत दुर्घटना; दोन अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

पालघर : पाण्याचा अंदाज न ओळखता आल्याने दोन मुलांचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना पालघरमध्ये घडली आहे. मनोरजवळील

औद्योगिक क्षेत्रातील समस्यांवर आमदारांनी वेधले लक्ष

विजेच्या अडचणींसह जमिनीचा लीज प्रश्न सोडवा वसई  : वसई-विरार औद्योगिक क्षेत्रातील छोटे मोठे उद्योजक विविध

वसई-विरारचा अर्थसंकल्प ‘वेटिंग’वर!

स्थायी समिती सभापतींची निवड लांबल्याने मार्चचा मुहूर्त विरार : महापौर, उपमहापौर निवडणूक उशिरा होऊनही मुंबई