उरणमध्ये भावना घाणेकर यांचा विजय

उरण : 'उरण नगरपालिकेत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भावना घाणेकरांचा विजय कार्यकर्त्यांना नवचैतन्य देणारा आहे. ज्या वेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराबाबत प्राथमिक चर्चा सुरू होती, भावना घाणेकर टक्कर देणाऱ्या आणि जिंकणाऱ्या उमेदवार आहेत. त्या राजकारणात सक्रिय आहेत, त्या लढाऊ आहेत. त्यामुळे भावना घाणेकरच उमेदवार हव्यात, या निर्णयावर आम्ही ठाम राहिलो. आज तो निर्णय भावना घाणेकरांच्या विजयाने सार्थ ठरला, याचा मला मनस्वी आनंद आहे, असे महेंद्र घरत म्हणाले. त्यामुळे भावना घाणेकर यांचा दणदणीत विजय 'ए तो झाकी, बहोत कुछ बाकी है'. जे म्हणत होते, भावना घाणेकर यांचे डिपॉझिट जप्त होईल. त्यांना भावना घाणेकरांच्या दणदणीत विजयाने 'एकही मारा लेकीन सॉलिड मारा', अशी अवस्था करून ठेवली आहे.


उरणमध्ये सर्वच कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी खूप मेहनत घेतली. अनेक नेत्यांनी प्रचाराच्या अंतिम टप्प्यात महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे उरणमध्ये यश मिळाले, या निवडणुकीत मी चाणक्य नीतीचा वापर केला, असे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत म्हणाले.


विजयाच्या आनंदाने महेंद्र घरत यांचा चेहरा फुलला होता. यावेळी त्यांनी बाळ्या मामा यांच्याशी मोबाईलवरून संपर्क साधून विजयाबद्दल अभिनंदन केले. यावेळी महेंद्र घरत म्हणाले, "उरणबाबत आपण घेतलेली रोखठोक भूमिका मतदारांना आवडली. आपण मतदानाच्या दिवशी स्वतः येऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहन दिलेत, ठामपणे मागे राहिलात याचा निश्चितच फायदा उरण नगरपालिका निवडणुकीत झाल्याचे सांगताना . त्यांनी त्याबद्दल अभिनंदन आणि आभार व्यक्त केले.

Comments
Add Comment

Raigad Ropeway: रायगडावर जाणे होणार स्वस्त! रोपवेचे तिकीट ३५० रुपयांवरून ५०-१०० रुपयांपर्यंत कमी होणार

रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने रायगडावर नवीन रोपवे

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक