जनतेचा निकाल मान्य, आता विकासावर लक्ष! निकालानंतर पालकमंत्र्यांची प्रतिक्रिया

कणकवली: नगरपरिषद आणि नगरपालिकेचे निकाल जाहीर होण्यास सुरुवात झाली आहे. कोणते उमेदवार, किती मतांनी विजयी झाले किंवा पराजित झाले याचे अधिकृत आकडे स्पष्ट होत असताना गुलाला उधळायला सुरुवात झाली आहे. सिंधुदुर्गात भाजपचे कमळ फुलवल्याल्यानंतर भाजप नेते आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणेंनी पहिली प्रतिक्रिया आली आहे.


नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या वेंगुर्ला आणि सावंतवाडी तालुक्यातील नगराध्यक्षपदासाठी भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत. वेंगुर्ल्यातून दिलीप उर्फ राजन गिरप तर सावंतवाडीत भाजपच्या युवराज्ञी श्रद्धा भोसले निवडून आल्या आहेत. तर दुसरीकडे मालवणमध्ये ममता वराडकर आणि कणकवलीमधून शहर विकास आघाडीचे संदेश पारकर निवडून आले आहेत.


जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून या शहराच्या विकासाच्या दृष्टीकोनातून चारही उमेदवाऱ्यांच्या मागण्या आणि अपेक्षा नियोजन स्वरुपात माझ्याकडे आल्यास कोणताही पक्षपात न करता शंभर टक्के न्याय देण्याचा शब्द नितेश राणेंनी दिला आहे. तसेच निवडणुका कोणत्याही परिस्थितीत झाल्या असल्या तरी विकास हाच केंद्रबिंदू मानून सरकारच्या वतीने जी मदत लागेल ती उभी करणे ही माझी जबाबदारी असेल असे राणेंनी स्पष्ट केले आहे.


कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा
नितेश राणे यांनी विजयाचे श्रेय कार्यकर्त्यांना दिले आहे. वेंगुर्ला आणि सावंतवाडीमध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक चांगल्या मतांच्या फरकाने निवडून आल्यामुळे राणेंनी सर्व श्रेय कार्यकर्त्यांना दिले आहे. सर्व कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे आणि कोणतीही कसर न ठेवता निवडणूक काळात जे काम केले त्यासाठी नितेश राणेंनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.


जनतेचा निकाल मान्य
लोकशाहीमध्ये जनतेने दिलेल्या मताचा आदर ठेवावा लागतो. त्यामुळे जनतेने दिलेला निकाल आम्ही स्वीकारतो आणि या दृष्टीतून मालवण आणि कणकवलीमध्ये पक्ष बांधणीमध्ये काय काय करता येईल आणि कसे सक्षम होता येईल यासाठी संघटनात्मक पद्धतीने पावले उचलू असे राणेंनी सांगितले. तसेच २०१७ ला कणकवलीच्या जनतेने सेवेची संधी दिली होती. आमच्या कामाबाबत त्यांना काही गोष्टी पटल्या नसतील, त्यामुळे जनतेने मतदानाच्या स्वरुपात त्यांच्या मनातील भावना मांडल्या आहेत ते आम्हाला मान्य असल्याचे मोठ्या मनाने स्वीकारल्याचे राणेंच्या प्रतिक्रियेतून दिसून येते.





निलेश राणेंचे अभिनंदन
मालवण आणि कणकवलीचे प्रभारी म्हणून निलेश राणेंकडे जबाबदारी होती. त्यामुळे दोन्ही ठिकाणी जो विजय मिळाला त्यात निलेश राणेंच्या नेतृत्वाचा सिंहाचा वाटा आहे सांगत नितेश राणे यांनी मोठ्या भावाचे अभिनंदन केले. तसेच विरोधकांबाबत ज्या रणनीती आखल्या त्याबाबत कौतूक सुद्धा केले.


नेमकं माझं कोण? राणेंचा प्रश्न
नगरपरिषदा, लोकसभा आणि विधानसभा वेगवेगळ्या विचारांनी लढल्या जातात. कणकवलीच्या निवडणुकीत सर्व एकत्र होते. ज्या परिस्थितीमध्ये निवडणूक लढली गेली, त्यामध्ये कुटुंबापासून ते विरोधकांपर्यंत सर्वच विरोधात लढत असल्याने नेमकं माझं कोण हा प्रश्न पडल्याचे नितेश राणेंनी सांगितले. त्यामुळे पक्ष श्रेष्ठींसोबत बोलणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.




Comments
Add Comment

शेअर बाजारात 'कंसोलिडेशन' मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूकदारांची विक्री सेन्सेक्स २४४.९८ अंकाने घसरत ८३३८२.७१ व निफ्टी ६६.७० कोसळला!

मोहित सोमण: जागतिक अस्थिरतेच्या फटक्यामुळे आजही शेअर बाजारात घसरण झाली आहे. त्यामुळे अखेरच्या सत्रात सेन्सेक्स

क्वाड्रंट फ्युचर टेक शेअरमध्ये ९% वाढ 'या' कारणामुळे तरीही शेअर विकण्याचा तज्ञांचा सल्ला!

मोहित सोमण: क्वाड्रंट फ्युचर टेक शेअर्समध्ये आज तुफान वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर इंट्राडे ९% पातळीवर उसळला असून

सोन्याचांदीत 'हाहाःकार' सोने १ दिवसात प्रति तोळा १०९० रूपयांने तर चांदी १५००० उसळत २९०००० प्रति किलोवर

मोहित सोमण: सलग चौथ्यांदा सोन्यातचांदीत हाहाःकार निर्माण झाला आहे. फेडरल रिझर्व्ह व्याजदरातील कपातीवरील

BMC Election 2026 : ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा, मनसेची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली; याचिकाकर्त्यांना सुनावले खडेबोल

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकीत ६६ नगरसेवकांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला असून, याविरोधात

Madhya Pradesh News : मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडला अन्....मध्य प्रदेशात मारहाण, लाठीमार आणि महामार्गावर चक्काजाम

खरगोन : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यात एका मुस्लिम मुलीच्या पायावर पाय पडण्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर

आर्मर सिक्युरिटी इंडिया आयपीओला पहिल्या दिवशी थंड प्रतिसाद! दुपारपर्यंत केवळ ०.०३ पटीने मिळाले सबस्क्रिप्शन

मोहित सोमण: आजपासून आर्मर सिक्युरिटी इंडिया लिमिटेड (Armour Security India Limited) कंपनीचा आयपीओ (IPO) बाजारात गुंतवणूकदारांसाठी