नव्या वर्षातही विरोधी पक्ष नेतेपदाची वाट खडतर

२०२६ मध्ये महाविकास आघाडीचे ७ आमदार निवृत्त होणार


मुंबई : विधान परिषदेत महाविकास आघाडीचे संख्याबळ सातत्याने घटत असल्याने विरोधी पक्ष नेतेपदाची वाट दिवसागणिक खडतर बनत चालली आहे. काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांनी राजीनामा दिल्यानंतर, आता नव्या वर्षात विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांसह सात आमदार निवृत्त होणार आहेत. परिणामी वरिष्ठ सभागृहातदेखील सरकारला प्रभावी आव्हान देणे मविआसाठी कठीण होणार आहे.


पुढील मे आणि डिसेंबर महिन्यात अनेक आमदारांचा कार्यकाळ संपुष्टात येणार असल्याने २०२६ हे वर्ष मविआसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. उबाठा पक्षप्रमुखांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि काँग्रेसच्या राजेश राठोड यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपुष्टात येईल, तर शरद पवार गटाचे अरुण लाड ६ डिसेंबर २०२६ रोजी निवृत्त होतील.


याशिवाय नागपूर पदवीधर मतदारसंघाचे अभिजीत वंजारी, पुणे शिक्षक मतदारसंघाचे जयंत आसगावकर आणि अपक्ष आमदार किरण सरनाईक यांचा कार्यकाळ डिसेंबर २०२६ मध्ये संपणार आहे. परिणामी, विरोधी पक्षातील सुमारे सात आमदार कमी होणार असून, मविआकडे केवळ ८ आमदार शिल्लक राहतील. त्यामुळे आपसूकच विरोधी पक्ष नेतेपदावरील सर्वांचाच दावा संपुष्टात येईल. दुसरीकडे, सत्ताधारी महायुतीमधील काही सदस्यांचा कार्यकाळही पुढील वर्षी संपत आहे.


विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी, भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, दादाराव केचे, संजय केनेकर, संदीप जोशी यांचा कार्यकाळ १३ मे २०२६ रोजी संपेल, तर सतीश चव्हाण ६ डिसेंबर २०२६ रोजी निवृत्त होतील.


मात्र, महायुतीचे विधानसभेतील प्रचंड बहुमत लक्षात घेता, त्यांना विधान परिषदेची निवडणूक सोपी जाणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

Comments
Add Comment

Maharashtra Election 2026 Voting : आज दारू मिळणार? बँका सुरु आहेत का? आज काय काय सुरु आहे? वाचा संपूर्ण यादी

मुंबई : संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज सकाळी

आज शेअर बाजार व कमोडिटी बाजार सुरु राहणार का? 'ही' आहे माहिती

प्रतिनिधी: आज दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी शेअर बाजार बंद

BMC Elections : ही सुट्टी म्हणून घरात बसून राहू नका...; नाना पाटेकरांचे मतदारांना कळकळीचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्र आज एका मोठ्या राजकीय वळणावर उभा आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या २,८६९ जागांसाठी आज मतदान

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी