पत्नीकडे घर खर्चाचा हिशोब मागणे गुन्हा नाही

नवी दिल्ली  : पतीने पत्नीला घर खर्चाचा हिशोब ठेवण्यासाठी एक्सेल शीट बनवण्यास सांगणे क्रुरता नाही, तसेच या कारणामुळे पतीवर फौजदारी कारवाई केली जाऊ शकत नाही, असे मत सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच एका सुनावणी दरम्यान नोंदवले.


पत्नीने तिच्या पतीविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करताना सर्वोच्च न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले की, भारतीय समाजात हे वास्तव असू शकते जिथे पुरुष अनेकदा घराच्या आर्थिक बाबींवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु या कारणावरून फौजदारी खटला भरता येणार नाही.


न्या. बी.व्ही. नागरथना आणि आर. महादेवन यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. खंडपीठाने स्पष्ट केले की, वैवाहिक तक्रारी हाताळताना न्यायालयांनी खूप सावधगिरी बाळगली पाहिजे आणि व्यावहारिक वास्तवांचा विचार केला पाहिजे. अनेकदा अशा तक्रारी लग्नानंतरच्या दैनंदिन जीवनातील किरकोळ वादांतून उद्भवतात, ज्यांना कोणत्याही प्रकारे क्रूरता म्हणता येणार नाही.


खंडपीठाने पुढे म्हटले की, पतीने आपल्या पत्नीला सर्व खर्चाची एक्सेल शीट तयार करण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे, मात्र जरी तो खरा मानला तरी, क्रूरतेच्या व्याख्येत येत नाही. कोणतेही मानसिक किंवा शारीरिक नुकसान झालेले नसताना फक्त पतीचे आर्थिक वर्चस्व क्रूरता म्हणता येणार नाही. ही परिस्थिती भारतीय समाजात एक वास्तव आहे, जिथे घरातील पुरुष अनेकदा महिलांच्या आर्थिक स्थितीवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात, परंतु फौजदारी खटल्याचा वापर हा सूड उगवण्यासाठी केला जाऊ शकत नाही.

Comments
Add Comment

दिल्ली आणि इंदूरमधील आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

नवी दिल्ली : दिल्लीतील पालम आणि मध्य प्रदेशातील इंदूर येथे वेगवेगळ्या आगीच्या दुर्घटनांबद्दल पंतप्रधान

गुजरातच्या मुंद्रा बंदरात ८०,८८६  मेट्रिक टन कच्चे तेल घेऊन 'जग लाडकी' जहाज दाखल

गांधीनगर : पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, भारतीय ध्वज असलेले कच्चे तेल वाहून नेणारे जहाज 'जग लाडकी'

धक्कादायक घटना, EV ने घेतला सात जणांचा बळी

इंदूर : मध्य प्रदेशमध्ये इंदूरच्या बंगाली स्क्वेअरजवळील बृजेश्वरी कॉलनीत एक धक्कादायक घटना घडली. मनोज पुगालिया

दिल्लीत चार मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम दिल्लीतील साध नगर, पालम परिसरात बुधवारी चार मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. या

२८ फेब्रुवारीपासून आखाती देशांमधून किती भारतीय परतले ?, परराष्ट्र मंत्रालयाकडून खुलासा

नवी दिल्ली: अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर बदललेल्या परिस्थितीत, आखाती देशांमधून मोठ्या

भारताकडून कठोर शब्दांत पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याचा निषेध

- गुन्हेगारी कृत्याच्या दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानकडून काबुलमध्ये झालेल्या हवाई हल्ल्यात