नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत २८८ पैकी १२९ जागांवर भाजपचा निर्विवाद विजय

मुंबई : राज्यातील २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुतीने राज्यभरात घवघवीत यश मिळवले असून, भाजप हा क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. तीन ते चार वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पार पडलेल्या या निवडणुकीत जनतेने विकासाच्या मुद्द्यांना प्राधान्य देत महायुतीला कौल दिला. महाविकास आघाडीला मात्र मोठा धक्का बसला असून, त्यांचा प्रभाव नाममात्र राहिला.


राज्यातील एकूण २८८ नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल रविवारी (२१ डिसेंबर २०२५) जाहीर झाले. मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू झाली आणि संध्याकाळपर्यंत बहुतांश निकाल स्पष्ट झाले. महायुतीला सुमारे २१४ हून अधिक जागांवर विजय मिळाला, तर महाविकास आघाडीला केवळ ४९ जागा आणि स्थानिक आघाड्या तथा अपक्षांना २५ जागा मिळाल्या. विशेष म्हणजे, एकट्या भाजपचे १२९, नगराध्यक्ष आणि ३ हजार ३२५ नगरसेवक निवडून आले. उबाठा आणि शरद पवार गटाला दोन आकडी संख्या देखील गाठता आलेली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारादरम्यान "२० तारखेला दिवसभर कमळाची काळजी तुम्ही करा, त्यानंतर पुढची पाच वर्षे तुमची काळजी देवाभाऊ घेईल", असे आवाहन केले होते. ते जनतेला भावले. या निवडणुकीत भाजपने १२९ नगराध्यक्षपदे मिळवली, तर महायुतीचे घटकपक्ष शिवसेना ५१ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ३५ जागा जिंकल्या.



कोणाच्या किती जागा ?


पक्ष - नगराध्यक्ष - सदस्य
भाजप - १२९ - ३३२५
शिवसेना - ५१ - ६९५
राष्ट्रवादी - ३५ - ३११
काँग्रेस - ३५ - १३१
उबाठा - ९ - ३७८
शरद पवार गट - ७ - १५३
इतर - २२ - १४०



विभागनिहाय निकाल :


- विदर्भ (१०० जागा): भाजप ५८, शिवसेना ८, राष्ट्रवादी ७, काँग्रेस २३, उबाठा ०, शरद पवार ०, इतर ४.
- मराठवाडा (५२ जागा): भाजप २५, शिवसेना ८, राष्ट्रवादी ६, काँग्रेस ४, उबाठा ४, शरद पवार २, इतर ३.
- उत्तर महाराष्ट्र (४९ जागा): भाजप १८, शिवसेना ११, राष्ट्रवादी ७, काँग्रेस ५, उबाठा २, शरद पवार १, इतर ५.
- पश्चिम महाराष्ट्र (६० जागा): भाजप १९, शिवसेना १४, राष्ट्रवादी १४, काँग्रेस ३, उबाठा १, शरद पवार ३, इतर ६.
- कोकण (२७ जागा): भाजप ९, शिवसेना १०, राष्ट्रवादी १, काँग्रेस ०, उबाठा २, शरद पवार १, इतर ४.



मागील नगराध्यक्ष संख्या


भाजप - ९४
शिवसेना - ३६
काँग्रेस - ५१
राष्ट्रवादी - २९
इतर - २८
अपक्ष - २२

Comments
Add Comment

Rajnath Singh : पाकिस्तानविरुद्ध दीर्घ लढ्यास भारत तयार – राजनाथ सिंह

नवी दिल्ली : भारताने ऑपरेशन सिंदूर हे आपल्या अटींवर स्वेच्छेने थांबवले होते आणि गरज पडल्यास पाकिस्तान विरुद्ध

Women's T20 World Cup : महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; अशी केली जाणार निवड

मुंबई : २०२६ च्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेची तयारी सुरू झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा १२ जून ते ५ जुलै

Summer Special Trains : प्रवाशांच्या मागणीमुळे LTT वरून खास, मुंबई – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्या

मुंबई : प्रवाशांच्या मागणीची दखल घेऊन मध्य रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस – मडगाव दरम्यान २ अतिरिक्त उन्हाळी

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या संपर्क केंद्रात भारतीय सांकेतिक भाषा सहाय्य सेवेची सुरुवात

मुंबई : भारताची आंतरराष्ट्रीय बँक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँक ऑफ बडोदाने (बँक) आपल्या संपर्क केंद्रात व्हिडीओ

Kalyan and Badlapur Power Blocks : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवर उद्या आणि परवा विशेष ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक्स

मुंबई : कल्याण – बदलापूर दरम्यान ३री व ४थी लाईनवरील ओएचई (OHE) कामासाठी अप व डाउन दक्षिण-पूर्व मार्गावर दिनांक

Missing link : मिसिंग लिंकची गिनीज वर्ल्ड बुक मध्ये नोंद; जगातला सर्वात रुंद बोगदा म्हणून रेकॉर्ड केला नावावर

मुंबई : भारतीय इंजिनिअरींगचा अदभूत चमत्कार असलेला आणि मुंबई पुणे अंतर कमी करणारा सर्वात महत्वाच्या पुलाची आता