BJP News : भाजपचा उबाठासह शरद पवारांना पुन्हा दणका! माजी आमदार सुरेश भोईर, संजोग वाघेरेंच्या हाती कमळ

शरद पवारांच्या आमदराचा मुलगा भाजपमध्ये दाखल


मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर होताच, भाजपने विरोधी पक्षांचे बुरुज उद्ध्वस्थ करण्यास सुरुवात केली आहे. नुकतेच मुंबईतील महत्त्वपूर्ण पक्षप्रवेश झाल्यानंतर, भाजपने कल्याण-डोंबिवलीसह पुणे आणि पिंपरी-चिंचवडकडे आपला मोर्चा वळवला. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत शनिवारी उबाठा गटाचे माजी आमदार सुरेश भोईर, मावळ मतदारसंघातील महत्त्वाचा चेहरा असलेले संजोग वाघेरे पाटील आणि शरद पवार गटाचे वडगावशेरीचे विद्यमान आमदार बापूसाहेब पठारे यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.



नरिमन पॉइंट येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात झालेल्या या पक्षप्रवेश सोहळ्याला केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी सुभाष भोईर यांच्यासोबत माजी नगरसेवक रवींद्र पाटील, माजी जि.प. सदस्य सुखदेव पाटील, सुरज जाधव, अभिषेक ठाकूर, विश्वनाथ पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. तसेच सुरेंद्र पठारे यांच्यासह माजी नगरसेवक सचिन दोडके, बाळासाहेब धनकवडे, माजी आमदार रमेश वांजळे यांच्या कन्या सायली वांजळे, विकास दांगट, नारायण गलांडे, रोहिणी चिमटे, कणव चव्हाण (वसंतराव चव्हाणांचे पुत्र), खंडू लोंढे, पायल तुपे, प्रतिभा चोरगे यांनी कमळ हाती घेतले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनुषंगानेही भाजपला मोठे बळ मिळाले. संजोग वाघेरे पाटील यांच्यासह उषा वाघेरे, प्रशांत शितोळे, विनोद नडे, प्रभाकर वाघेरे, राजू मिसाळ, नवनाथ जगताप, अमित गावडे या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला.



ठाणे आणि कल्याणमध्ये भाजपची ताकद वाढली


कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांच्या प्रवेशाने ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या तोंडावर उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. भोईर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातात. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या राजेश मोरे यांनी भोईर यांचा पराभव केला होता. सुभाष भोईर हे ठाणे महापालिकेचे पाच वेळा नगरसेवक, तसेच कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत. २०१४ मध्ये शिवसेनेतून आमदारकी जिंकलेल्या भोईर यांना २०१९ मध्ये उमेदवारी नाकारण्यात आली होती.



पिंपरी चिंचवडमध्ये मोठा धक्का


दुसरीकडे, उबाठा गटाकडून मावळ लोकसभा निवडणूक लढवलेले संजोग वाघेरे यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. उबाठा गटाने पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीची जबाबदारी वाघेरे यांच्यावर सोपवली होती. अजित पवारांचे निष्ठावंत मानले जाणारे वाघेरे लोकसभा निवडणुकीपूर्वी उबाठात दाखल झाले होते. विधानसभा निवडणुकीपासूनच त्यांच्या पक्षांतराच्या चर्चा होत्या. आता महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी भाजपची वाट धरली आहे.



शरद पवारांना धक्का


२०२४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी बापूसाहेब पठारे यांनी भाजप सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. त्यानंतर वडगाव शेरी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक जिंकली आणि अजित पवार गटाच्या सुनील टिंगरे यांचा पराभव केला होता. मात्र, अवघ्या दीड वर्षांत त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांची भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुरेंद्र हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुण्यातील 'यंग ब्रिगेड'चे सदस्य म्हणून ओळखले जातात. त्यांच्या प्रवेशामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महापालिका निवडणुकीत भाजपची संघटनात्मक ताकद आणखी वाढणार आहे.

Comments
Add Comment

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा