केदारनाथमधून बर्फ गायब; निसर्गाचा इशारा की हवामान बदलाचा परिणाम?

उत्तराखंड : ऋतुचक्र बदलत चाललंय या आधी आपण फक्त बोलतच होतो पण आता ते प्रत्यक्षात घडत जात आहे. कारण केदारनाथ धाममधील यंदाचा हिवाळा अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. डिसेंबर महिना अर्धा संपूनही बाबा केदारची नगरी अद्याप बर्फाविना दिसत असल्याने भाविकांसह वैज्ञानिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरवर्षी या काळात केदारनाथ परिसरात पाच फुटांहून अधिक बर्फ साचलेला असतो, मात्र यंदा चित्र पूर्णपणे वेगळे असून निसर्गाचं चक्रच जणू उलटं फिरल्याचं जाणवत आहे.


हवामानातील बदलाचा थेट परिणाम केदारनाथवर होत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. केदारनाथमध्ये शेवटची बर्फवृष्टी २० नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यानंतर डिसेंबरचा तिसरा आठवडा सुरू होऊनही आजूबाजूच्या पर्वतशिखरांवर बर्फाचा लवलेशही दिसत नाही. यामुळे परिसरात कोरडी पण तीव्र थंडी अनुभवायला मिळत आहे.


या कोरड्या थंडीमुळे केदारनाथमध्ये रात्रीचे तापमान उणे १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जात आहे. सकाळी साधारण १० वाजेपर्यंत सूर्यप्रकाश पडतो, मात्र दुपारनंतर लगेचच वातावरणात पुन्हा कडाक्याची थंडी पसरते. परिणामी धाममध्ये सुरू असलेल्या विकासकामांवर मर्यादा येत असून सुमारे १५० मजूर दिवसाला फक्त ५ ते ६ तासच काम करू शकत आहेत.


दरम्यान, २०१३ साली झालेल्या भीषण आपत्तीनंतर चौराबाडी येथून वाहून आलेले प्रचंड दगड आता केदारपुरीच्या सौंदर्यात भर घालत आहेत. ज्या दगडांनी एकेकाळी मोठ्या प्रमाणावर विनाश घडवला होता, त्याच दगडांवर आता सुंदर कलाकृती साकारल्या जात आहेत. धाममधील दगडांवर मंदिर, गोमाता, भगवान गणेश, शंकर, विष्णू, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती आणि कार्तिकेय यांच्या प्रतिमा कोरल्या जात आहेत. यासोबतच ऋषीमुनी, विविध आसनांमधील देवी-देवतांच्या मुद्रा, पाच पांडव तसेच पशु-पक्ष्यांच्या कलाकृतीही साकारण्यात आल्या आहेत. या सर्व कामांमुळे केदारपुरीचा परिसर पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि आकर्षक दिसणार आहे.

Comments
Add Comment

मेघालयमध्ये कोळसा खाणीत मोठी दुर्घटना

पूर्व जैंतिया हिल्स : मेघालयमधील पूर्व जैंतिया हिल्स (East Jaintia Hills district) जिल्ह्यातील कोळसा खाणीत मोठी दुर्घटना झाली. ही

Bharat Taxi App: ओला,उबरला पर्यायी भारत टॅक्सी ॲप लाँच; जाणून घ्या ॲप बद्दल

दिल्ली: केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी आज म्हणजेच गुरुवारी (५ फेब्रुवारी २०२६) भारतातील पहिले

Shiv Navratri 2026: उज्जैनमध्ये शिव नवरात्र कधी सुरू होणार, नऊ दिवसांत काय विशेष असणार, जाणून घ्या

दिल्ली: उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर जगप्रसिद्ध आहे. मंदिराशी संबंधित धार्मिक श्रद्धेमुळे येथे दररोज भाविकांची

Jammu and Kashmir: लष्कराची मोठी कारवाई; टॉप कमांडरसह २ पाकिस्तानी दहशदवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीर: जम्मू आणि काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यात भारतीय लष्कराकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत

विदेशी राजस्थान फिरण्यासाठी आले खरे, पण भारताने केली हकालपट्टी; कारण काय?

अजमेर : राजस्थानमध्ये लाखो पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. विदेशी पर्यटकांना राजस्थानातील राजे राजवाड्यांची,

श्री स्वामी सत्यमित्रानंद गिरी सनातन संस्कृतीचे प्रमुख वाहक

समाधी मंदिर भावी पिढ्यासाठी प्रेरणास्थळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांस्कृतिक पुनरोत्थानाच्या कार्याला