केदारनाथमधून बर्फ गायब; निसर्गाचा इशारा की हवामान बदलाचा परिणाम?

उत्तराखंड : ऋतुचक्र बदलत चाललंय या आधी आपण फक्त बोलतच होतो पण आता ते प्रत्यक्षात घडत जात आहे. कारण केदारनाथ धाममधील यंदाचा हिवाळा अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. डिसेंबर महिना अर्धा संपूनही बाबा केदारची नगरी अद्याप बर्फाविना दिसत असल्याने भाविकांसह वैज्ञानिकांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. दरवर्षी या काळात केदारनाथ परिसरात पाच फुटांहून अधिक बर्फ साचलेला असतो, मात्र यंदा चित्र पूर्णपणे वेगळे असून निसर्गाचं चक्रच जणू उलटं फिरल्याचं जाणवत आहे.


हवामानातील बदलाचा थेट परिणाम केदारनाथवर होत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. केदारनाथमध्ये शेवटची बर्फवृष्टी २० नोव्हेंबर रोजी झाली होती. त्यानंतर डिसेंबरचा तिसरा आठवडा सुरू होऊनही आजूबाजूच्या पर्वतशिखरांवर बर्फाचा लवलेशही दिसत नाही. यामुळे परिसरात कोरडी पण तीव्र थंडी अनुभवायला मिळत आहे.


या कोरड्या थंडीमुळे केदारनाथमध्ये रात्रीचे तापमान उणे १० अंश सेल्सिअसपर्यंत खाली जात आहे. सकाळी साधारण १० वाजेपर्यंत सूर्यप्रकाश पडतो, मात्र दुपारनंतर लगेचच वातावरणात पुन्हा कडाक्याची थंडी पसरते. परिणामी धाममध्ये सुरू असलेल्या विकासकामांवर मर्यादा येत असून सुमारे १५० मजूर दिवसाला फक्त ५ ते ६ तासच काम करू शकत आहेत.


दरम्यान, २०१३ साली झालेल्या भीषण आपत्तीनंतर चौराबाडी येथून वाहून आलेले प्रचंड दगड आता केदारपुरीच्या सौंदर्यात भर घालत आहेत. ज्या दगडांनी एकेकाळी मोठ्या प्रमाणावर विनाश घडवला होता, त्याच दगडांवर आता सुंदर कलाकृती साकारल्या जात आहेत. धाममधील दगडांवर मंदिर, गोमाता, भगवान गणेश, शंकर, विष्णू, लक्ष्मी, सरस्वती, पार्वती आणि कार्तिकेय यांच्या प्रतिमा कोरल्या जात आहेत. यासोबतच ऋषीमुनी, विविध आसनांमधील देवी-देवतांच्या मुद्रा, पाच पांडव तसेच पशु-पक्ष्यांच्या कलाकृतीही साकारण्यात आल्या आहेत. या सर्व कामांमुळे केदारपुरीचा परिसर पूर्वीपेक्षा अधिक भव्य आणि आकर्षक दिसणार आहे.

Comments
Add Comment

India T20 World Cup Squad Announcement : वर्ल्ड कप २०२६ साठी टीम इंडिया सज्ज! BCCIची आज महत्त्वाची बैठक; कोणाला मिळणार संधी अन् कोणाचा पत्ता कट?

मुंबई : आयसीसी पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२६ साठी संपूर्ण क्रिकेट विश्व ज्याची वाट पाहत आहे, त्या भारतीय संघाची घोषणा

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना १७ वर्षांची जेल; भ्रष्टाचार प्रकरणात पत्नी बुशरा बीबीलाही मोठी शिक्षा

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका मोठ्या

Rajdhani Express Accident : आसाममध्ये काळजाचा थरकाप! राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ८ हत्तीचं जागीच दुर्दैवी मृत्यू

आसाममधील जमुनामुख जवळील सानरोजा भागात शुक्रवारी मध्यरात्री एक अत्यंत भीषण आणि दुर्दैवी रेल्वे अपघात झाला.

भारत-ओमानची मुक्त व्यापार करारावर स्वाक्षरी

करारामुळे द्विपक्षीय संबंधांना नवी ऊर्जा मस्कत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुलतान हैथम बिन तारिक यांच्याशी

IND vs SA : संजूचा नादच खुळा! १००० धावांचा टप्पा पार करत अभिषेक-सूर्याच्या पंगतीत पटकावले स्थान

भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर संजू सॅमसनने दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या शेवटच्या टी-२० सामन्यात आपल्या

पंतप्रधान येत्या २० आणि २१ डिसेंबरला आसाम दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या २० आणि २१  डिसेंबरला आसामला भेट देणार आहेत. दिनांक २० डिसेंबर रोजी दुपारी ३