Nitesh Rane : "महापालिकांवर आता फक्त भगवाच फडकणार"! मंत्री नितेश राणेंना विजयाचा विश्वास

सगळीकडे भगवाधारी महापौर दिसणार : मंत्री नितेश राणे


सिंधुदुर्ग : निवडणुकीच्या निकालांनंतर राजकीय वातावरण तापले असून, भाजप आमदार आणि पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी महाविकास आघाडीवर सडकून टीका केली आहे. "आम्ही महाविकास आघाडीला आता औषधासाठीही शिल्लक ठेवले नाही," अशा शब्दांत त्यांनी उबाठा गट, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सगळीकडे फक्त शिवसेना आणि भाजपच दिसत असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.



येणाऱ्या महापालिका निवडणुकांबाबत भाष्य करताना मंत्री नितेश राणे म्हणाले की, "आगामी काळात सर्व महापालिकांवर हिंदुत्व विचारांचाच महापौर विराजमान झालेला दिसेल. संपूर्ण महाराष्ट्रात जिथे जिथे महापालिका आहेत, तिथे भगवाधारी महापौर पाहायला मिळतील. महायुती सर्वत्र आपले वर्चस्व निर्माण करेल, यात शंका नाही." त्यांच्या या विधानामुळे आगामी महापालिका निवडणुकांमध्ये महायुती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर अधिक आक्रमक होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


निवडणुकीत शिवसेना आणि भाजप आमनेसामने असल्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, "आम्ही प्रगल्भ लोक आहोत. प्रदेश पातळीवर झालेल्या निर्णयानुसार आम्ही मैत्रीपूर्ण लढत लढलो आहोत. पण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) सदैव एकत्र आहोत. निवडणुकीच्या वेळी निवडणूक असते, पण उद्या आम्ही विजयाचा गुलाल एकत्रच उधळू."


कणकवलीमध्ये सर्व विरोधक नितेश राणेंच्या विरोधात एकत्र आल्याच्या चर्चेवर त्यांनी सडेतोड उत्तर दिले. "कणकवलीची जनता नेहमीच राणे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली आहे. हा भाजपचा बालेकिल्ला आहे आणि उद्या जनता आम्हालाच आशीर्वाद देईल, याची मला पूर्ण खात्री आहे," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

श्रीलंकेच्या फिरकीपुढे आयर्लंडची शरणागती

२० धावांनी थरारक विजय मिळवत यजमान संघ सरस कोलंबो : टी-२० विश्वचषक २०२६ च्या अत्यंत चुरशीच्या सामन्यात यजमान

मोहोळमधील राखीव मतदान यंत्र प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई

राखीव मतदान यंत्र प्रत्यक्ष मतदान प्रक्रियेसाठी वापरली नाहीत मुंबई : मोहोळ तालुक्यात (जि. सोलापूर) जिल्हा परिषद

नवख्या वाटणाऱ्या संघांनी अनुभवी संघांना रडवले

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. यंदाच्या स्पर्धेत आतापर्यंत पाच सामने

टी ट्वेंटी विश्वचषकात सर्वाधिक बळी घेणाऱ्यांमध्ये शाकिब अव्वलस्थानी

मुंबई : आयसीसी पुरुष टी ट्वेंटी विश्वचषक ७ फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. स्पर्धा सुरू होताच विश्वचषकात

आंगणेवाडी यात्रोत्सवासाठी एसटी प्रशासन झाले सज्ज, जादा १३५ बसेसचे नियोजन

कणकवली : कोकणची काशी म्हणून ओळखली जाणारी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची यात्रा ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. या

अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना तोटा नाही : शिवराज सिंह

भोपाळ : अमेरिकेसोबतच्या व्यापार करारामुळे भारतीय कृषी उत्पादनांना नुकसान होणार नाही, अशी ग्वाही केंद्रीय कृषी