मुंबई महापालिका रणधुमाळीत ठाकरे गटासमोर काँग्रेस की मनसे असा पेच?

मुंबई : राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान होणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीमधील सर्वच पक्षांनी तयारीला सुरुवात केली असून स्थानिक राजकीय समीकरणं लक्षात घेऊन रणनिती आखली जात आहे. यातच मुंबई महानगरपालिकेची निवडणूक सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे.


मुंबईवर वर्चस्व मिळवण्यासाठी सत्ताधारी भाजपसह सर्वच प्रमुख पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना सोबत घेतल्याने मुंबईतील राजकीय गणितं बदलल्याची चर्चा आहे. मनसेसोबतच्या युतीमुळे ठाकरे गटाची ताकद वाढताना दिसत असली, तरी निवडणूक जवळ येत असताना पक्षातील अंतर्गत अस्वस्थतेच्या चर्चांना उधाण आलं आहे.


मुंबई महापालिकेसाठी काँग्रेसने एकला चलोची भूमिका जाहीर केली आहे. तर शरद पवार हे ठाकरे गट आणि मनसेसोबत एकत्र निवडणूक लढवण्याच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र तिन्ही पक्ष एकत्र आले, तरी ठाकरे गटातील काही नेत्यांना अल्पसंख्यांक मतदार नाराज होण्याची भीती सतावत आहे. मनसेला सोबत घेण्याबाबत उद्धव ठाकरे ठाम असले, तरी काँग्रेसला बाजूला ठेवायचं की नाही, यावरून पक्षात संभ्रमाचं वातावरण आहे.


मुंबईत काँग्रेसची पारंपरिक ताकद लक्षात घेता हा निर्णय ठाकरे गटासाठी महत्त्वाचा मानला जात आहे. लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्यांक मतांच्या पाठिंब्यावर ठाकरे गटाला मोठा फायदा झाला होता. मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघांपैकी तीन जागा जिंकण्यात आल्या होत्या, तर वायव्य मुंबईची जागा अवघ्या ४८ मतांनी हातातून गेली होती. अशा परिस्थितीत काँग्रेसपासून फारकत घेतल्यास अल्पसंख्यांक मतांमध्ये घट होण्याची शक्यता असून मतविभागणीचा फटका ठाकरे गटाला बसू शकतो. त्यामुळे काँग्रेससोबतच राहावं, अशी भूमिका ठाकरे गटातील काही नेते अजूनही घेत असल्याचं समोर येत आहे.

Comments
Add Comment

Minister of State Ramdas Athawale : जातनिहाय जनगणना होईपर्यंत अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण करू नये

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी; 'बदर समिती' बरखास्त करण्याची मुख्यमंत्र्यांकडे करणार

Crime News : आधी कार आता दुचाकी जळून खाक, अहिल्यानगरात काय घडतंय ? CCTV तील 'ते' दृश्य पाहून संशय बळावला

Crime News :  अहिल्यानगर शहरात वाहनांना लक्ष्य करून आग लावण्याच्या घटना सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

Nashik : कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! ‘नाफेड-NCCF’ थेट बाजारात; 'या' दिवसापासून कांदा खरेदी सुरू

Nashik Onion Farmer : मागील अनेक दिवसांपासून कमी दरामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं. योग्य

The Fort owners : किल्लेदारांनी बोटीतून केली मिठी नदीची सैर... दाखवला नदीत कचऱ्यासह तीन फुटांपर्यंतचा गाळ

मुंबई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या नालेसफाईच्या कामाला सुरुवात असून सत्ताधारी पक्षाकडून प्रत्येक

Monkey's Pool Party Inside Taj Mahal : ताजमहालच्या फाउंटनमध्ये माकडांची 'पूल-पार्टी'! उकाड्यापासून वाचण्यासाठी वानरसेनेची धम्माल; व्हिडिओ व्हायरल

नवी दिल्ली : सध्या सर्वत्र उन्हाळ्याच्या तीव्र झळा जाणवत आहेत. या कडक उन्हापासून दिलासा मिळवण्यासाठी जशी

Navi Mumbai : नवी मुंबई हादरली! खारघरमध्ये महामार्गालगत महिलेचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळला; पोलिसांकडून कसून तपास सुरु

नवी मुंबई : नवी मुंबईतील खारघर परिसरात एक अत्यंत धक्कादायक आणि गूढ घटना उघडकीस आली आहे. शनिवारी मुंबई-पुणे