अहिल्यानगर जिल्ह्यातील १३ कारखान्यांकडून ३७ लाख ३७ हजार मे. टनाचे गाळप

कोपरगांव : अहिल्यानगर जिल्हयात ११ सहकारी व २ खाजगी अशा १३ साखर कारखान्यांनी १८ डिसेंबर पर्यंत ३७ लाख ३७ हजार ३२७ मे. टन ऊसाचे गाळप करून त्यापासुन २८ लाख २९ हजार २८५ साखर पोत्यांची निर्मीती केली आहे तर सरासरी गाळप ऊतारा ९.२८ टक्के मिळाला आहे. जिल्हयात सर्वाधिक गाळप अंबालिका कारखान्याने करून आघाडी घेतली आहे. जिल्हयातील साखर कारखाने त्यांचे ऊस गाळप मे. टनात, तयार झालेले एकुण साखर पोते व दैनंदिन गाळप ऊतारा टक्के याबाबतची आकडेवारी कंसात पुढीलप्रमाणे दर्शविली आहे. अंबालिका (६ लाख ७६ हजार २१० मे. टन गाळप), ४ लाख ५१ हजार २०० साखर पोते), (७.०८ टक्के सरासरी गाळप ऊतारा), ज्ञानेश्वर (४ लाख १२ हजार ८५०) (३ लाख ४३ हजार ६००) (९.७६), गंगामाई (३ लाख ८१ हजार ९८०) (१ लाख ९५ हजार ३००) (९.७६), मुळा (३ लाख ९२ हजार १३०) (२ लाख ८७ हजार ५००) (९.७१), पद्मश्री विखे पाटील (३ लाख ४८ हजार ५५०) (२ लाख २८ हजार ६५०) (९.८६), कर्मवीर काळे (२ लाख ५४ हजार ६२६) (२ लाख ४९ हजार २००), अशोक १ लाख ७१ हजार ७९०, सहकारमहर्षी कोल्हे (१ लाख ६७ हजार ५३३) (१ लाख १३ हजार ८५०), संगमनेर (३ लाख १८ हजार ७७०) (२ लाख ६८ हजार ४६०) याप्रमाणे गळीत झाले आहे.
Comments
Add Comment

अयोध्येच्या राम मंदिरात ७० नवे पुजारी

नवी मुंबई  : अयोध्येतील राम मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नोव्हेंबर महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते

बांगलादेशातील हिंदूच्या हत्येप्रकरणी ७ जणांना अटक

ढाका : बांगलादेशातील मैमनसिंग जिल्ह्यातील भालुका येथे दीपू चंद्र दास या २७ वर्षीय हिंदू तरुणाची जमावाकडून

चालक परवान्याचे वेळेत नूतनीकरण करणे अनिवार्य

नवी दिल्ली  : चालक परवान्याची मुदत ज्या दिवशी संपते, त्याच दिवसापासून संबंधित व्यक्तीचा चालक म्हणून असलेला दर्जा

होमगार्ड पदासाठी पदवीधरांची गर्दी

भुवनेश्वर  : ओडिशात संबलपूर येथे होमगार्डच्या भरती परीक्षेसाठी ८ हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने त्यांची

पुणे-महाबळेश्वर ई-शिवाई बस सुरू

पुणे : स्वारगेट आगारातर्फे महाबळेश्वरसाठी वातानुकूलित ई-शिवाई बस सेवा सुरू केली आहे.

फुकट पाणीपुरी न दिल्याने दुकानदारावर चाकू हल्ला

बेंगळुरू : पाणीपुरी हा सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा पदार्थ आहे. या पाणीपुरीसाठी एक दुकानदाराचा जीव गेला आहे. फुकटात