Indian Railways : रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा! वेटिंग आणि RAC तिकिटांचे नियम बदलले, आता रात्री झोपण्यापूर्वीच...रेल्वेची मोठी अपडेट वाचा

मुंबई : भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अनेकदा रेल्वे तिकीट 'वेटिंग' किंवा 'RAC' असल्यास ते शेवटच्या क्षणापर्यंत कन्फर्म होईल की नाही, या चिंतेत प्रवाशांना राहावे लागत होते. प्रवाशांची हीच मानसिक ओढाताण थांबवण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने रिझर्व्हेशन चार्ट (Reservation Chart) तयार करण्याच्या नियमात मोठे बदल केले आहेत. आता प्रवाशांना गाडी सुटण्यापूर्वी बराच वेळ आधी आपले तिकीट स्टेटस समजणार आहे, ज्यामुळे त्यांना आपला पुढील प्लॅन तयार करणे सोपे होईल.



नेमका बदल कोणता?


सकाळच्या प्रवासासाठी रात्रीच माहिती : जर तुमची ट्रेन सकाळी ५:०१ ते दुपारी २:०० या वेळेत असेल, तर तिचा पहिला चार्ट आता आदल्या दिवशी रात्री ८:०० वाजेपर्यंतच तयार केला जाईल. यामुळे प्रवाशांना रात्रीच आपली सीट निश्चित झाली आहे की नाही, हे स्पष्ट होईल.


दुपार आणि रात्रीच्या गाड्या : दुपारी २ नंतर सुटणाऱ्या गाड्यांचा चार्ट प्रवासाच्या ४ ते ६ तास आधीच उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून स्टेशनवर जाण्यापूर्वी प्रवाशांना पूर्ण माहिती असेल.


मध्यरात्रीच्या गाड्यांसाठी १० तास आधी चार्ट : मध्यरात्री १२ ते पहाटे ५ या वेळेत सुटणाऱ्या गाड्यांबाबत रेल्वेने अधिक सतर्कता दाखवली आहे. या गाड्यांचा तिकीट चार्ट प्रवासाच्या १० तास आधीच प्रसिद्ध होईल.



प्रवाशांना नेमका काय फायदा होणार?


रेल्वेच्या ८७ टक्के तिकिटांचे बुकिंग आता ऑनलाइन होते. जर ऑनलाइन वेटिंग तिकीट कन्फर्म झाले नाही, तर ते चार्ट तयार झाल्यावर आपोआप रद्द होते. आता चार्ट लवकर तयार होणार असल्यामुळे प्रवाशांना तिकीट रद्द झाल्याची माहिती लवकर मिळेल आणि पर्यायाने त्यांच्या खात्यात रिफंड (पैसे परत मिळण्याची) प्रक्रियाही वेगाने सुरू होईल. विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि कुटुंबासह प्रवास करणाऱ्यांना ऐनवेळी स्टेशनवर जाऊन होणारी धावपळ आता टाळता येणार आहे. रेल्वेने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवाशांचा वेळ वाचणार असून त्यांना त्यांचा प्रवास अधिक नियोजनबद्ध पद्धतीने करता येईल.


Comments
Add Comment

स्वामी विवेकानंद यांची जयंती ; १० मुद्दे जे तुमचे भाषण गाजवतील

आज आपण 'युगपुरुष' स्वामी विवेकानंद यांची १६३ वी जयंती साजरी करणार आहोत. हा दिवस संपूर्ण भारतात 'राष्ट्रीय युवा

महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडणार ?

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता

हल्दियात भारतीय नौदल नवा तळ उभारणार

बंगालच्या उपसागरात नौदलाची पकड वाढणार कोलकात्ता : पश्चिम बंगालमधील हल्दिया येथे भारतीय नौदल नवीन नौदल तळ

कॅनडाचा इमिग्रेशन यूटर्न

नव्या नियमांचा भारतीय विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांसाठी अडथळा नवी दिल्ली : कॅनडाने २०२६ साठी विद्यार्थी आणि

‘अल्मोंट-कीड’ बालसिरपमध्ये ‘इथिलीन ग्लायकॉल’

औषधांच्या सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह नवी दिल्ली : मुलांना दिल्या जाणाऱ्या औषधांच्या सुरक्षिततेवर

Indore Truck Accident : मुंबई-आग्रा हायवेवर गाड्यांचा चेंदामेंदा! तीव्र उतारावर ट्रकचे नियंत्रण सुटले अन् सात गाड्या एकमेकांवर...

महू : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील मानपूर भेरू घाटात शनिवारी सकाळी सात वाहनांचा साखळी अपघात झाल्याची