ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या परिवाराचा दुरान्वयेही संबंध नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस दलाचे अभिनंदन केले आहे. त्याचवेळी या अंमली पदार्थांच्या प्रकरणात राजकीयदृष्टया आणि जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि निषेधार्थ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.


आतापर्यंत झालेल्या तपासात आणि पुढे आलेल्या पुराव्यानुसार या प्रकरणात कुठेही उपमुख्यमंत्री शिंदे अथवा त्यांच्या परिवाराचा कुठलाही संबंध समोर आलेला नाही. दुरान्वयेही शिंदे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगतानाच अत्यंत चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात शिंदे यांचा बादरायण संबंध जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



मुंबईत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटन सत्रानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. या परिषदेदरम्यान देशातील आघाडीचे सिमेंट निर्माता कंपनी असलेल्या बांगर उद्योगाने चंद्रपूर जिल्ह्यात दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीचे स्वारस्य पत्र प्रदान केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आल्याचही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट…

मुंबई : राज्य परिवहन महामंडळाच्या दादर – पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या फेऱ्यांमध्ये कमालीची घसरण झाली आहे. दोन

मुंबईत ७०० चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ?

उबाठाच्या प्रस्तावाला सत्ताधारी भाजप- शिवसेनेची मंजुरी मुंबई : मुंबईतील ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना

होळीसाठी मुंबई-रत्नागिरी दरम्यान ६ अतिरिक्त गाड्या

'दिवा-चिपळूण' गाडीच्या तारखेत बदल पनवेल-रत्नागिरी मार्गावर मेमू स्पेशल धावणार मुंबई : येत्या होळी सणानिमित्त

राज्य शासनाकडे पालिकेची ११ हजार कोटींची थकबाकी

वसुलीसाठी नेमलेली समिती कागदावरच? मुंबई : मुंबईतील राज्य शासनाच्या अखत्यारितील विविध कार्यालयांकडून सहाय्यक

अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यासाठी उद्यापासून राज्यभर धडक मोहीम; परिवहन मंत्र्यांचे आदेश

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर जप्तीची कारवाई मुंबई  : राज्यभरात फोफावलेल्या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे

रविवार १ मार्चला मध्य आणि पश्चिम रेल्वेवर जम्बो मेगाब्लॉक; रेल्वेसेवा बघूनच घराबाहेर पडा

मुंबई : दररोज मुंबईच्या उपनगरीय रेल्वेतून लाखो प्रवासी प्रवास करतात. यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी आणि