ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या परिवाराचा दुरान्वयेही संबंध नाही - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या टोळीचा पर्दाफाश केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस दलाचे अभिनंदन केले आहे. त्याचवेळी या अंमली पदार्थांच्या प्रकरणात राजकीयदृष्टया आणि जाणीवपूर्वक उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव जोडण्याचा प्रयत्न केला जात असून हा प्रकार अत्यंत चुकीचा आणि निषेधार्थ असल्याचे मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केले आहे.


आतापर्यंत झालेल्या तपासात आणि पुढे आलेल्या पुराव्यानुसार या प्रकरणात कुठेही उपमुख्यमंत्री शिंदे अथवा त्यांच्या परिवाराचा कुठलाही संबंध समोर आलेला नाही. दुरान्वयेही शिंदे यांचा या प्रकरणाशी संबंध नसल्याचे सांगतानाच अत्यंत चुकीच्या पद्धतीने या प्रकरणात शिंदे यांचा बादरायण संबंध जोडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.



मुंबईत वर्ल्ड हिंदू इकॉनॉमिक फोरमच्या उद्घाटन सत्रानंतर मुख्यमंत्री माध्यमांशी बोलत होते. या परिषदेदरम्यान देशातील आघाडीचे सिमेंट निर्माता कंपनी असलेल्या बांगर उद्योगाने चंद्रपूर जिल्ह्यात दोन हजार कोटींच्या गुंतवणुकीचे स्वारस्य पत्र प्रदान केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते माणिकराव कोकाटे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा स्वीकारण्यात आला असून त्यांच्याकडील खात्यांची जबाबदारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सोपविण्यात आल्याचही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

Comments
Add Comment

Manikrao Kokate : "कोकाटे शरण आले नाहीत, अटक वॉरंट कायम"; सरकारी वकिलांचा मुंबई उच्च न्यायालयात आक्रमक पवित्रा

मुंबई : नाशिकच्या १९९५ मधील बहुचर्चित गृहनिर्माण घोटाळा प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले

माजी मंत्री माणिकराव कोकाटेंवर होणार अँजिओग्राफी, सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षेबाबत आज उच्च न्यायालयात सुनावणी

मुंबई: बनावट कागदपत्रं दाखवून शासकीय कोट्यातली सदनिका लाटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन वर्षांच्या कारावासाची

Navnath Ban : "सामनाचे भाकीत म्हणजे गणपत वाण्याची माडी!" अमेरिकन फायलींवरून पंतप्रधान बदलण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना नवनाथ बन यांचे चोख प्रत्युत्तर

मुंबई : अमेरिकेतील गाजलेल्या 'एपस्टिन प्रकरणा'चा आधार घेत भारतातील पंतप्रधान बदलले जातील, अशा आशयाचा अग्रलेख

Ashish Shelar : "काँग्रेसने मारली लाथ, आता राष्ट्रवादीचे धरले..." उबाठा सेनेच्या माहिती पुस्तिकेवर आशिष शेलारांचा खोचक टोला

मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागताच सत्ताधारी आणि विरोधकांमधील कलगीतुरा शिगेला

छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची निवडणुकीनंतर होणार डागडुजी

मुंबई (विशेष प्रतिनिधी): दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज मैदानातील अनेक कठडे आणि बेंचेस तुटलेल्या अवस्थेत असून

काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या चार नगरसेवकांचे काय होणार?

आरक्षणामुळे वॉर्ड गेले, आता पुनर्वसन करायचे कुठे? पक्षापुढे पेच! मुंबई (विशेष प्रतिनिधी): मुंबई महापालिकेच्या