रायगड जिल्ह्यात दहा नगरपालिकांच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष

उद्या कौल कोणाच्या बाजूने लागणार?


अलिबाग : जिल्ह्यात दहा नगरपालिकांसाठी २ डिसेंबर रोजी मतदान घेण्यात आले होते; परंतु न्यायालयाच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील नगरपालिका निवडणुकांचे निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर होणार आहेत. त्याबाबतची उत्सुकता सर्वांनाच लागून राहिलेली असून, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.


अलिबाग, कर्जत, खोपोली, पेण, उरण, महाड, श्रीवर्धन, मुरुड-जंजिरा, माथेरान, रोहा या दहा नगरपालिकांचा समावेश असून, २ डिसेंबरला घेण्यात आलेल्या मतदानानंतर मतमोजणीपूर्वी जय-पराजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. प्रत्येकालाच विजयाची खात्री असल्याने उमेदवार आणि कार्यकर्ते गुलाल आमचाच म्हणत असून, मात्र मतदाराने कौल कोणाच्या बाजूने दिला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे. न्यायालयीन घडामोडींमुळे उमेदवार आणि कार्यकर्त्यांना मतमोजणी आणि निकालासाठी प्रतिक्षा करावी लागली आहे. त्यामुळे विशेषतः उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता ताणली गेली आहे. दरम्यानच्या काळात निवडणूक निकालासंदर्भातील चर्चेला प्रत्येक शहरात ऊत आला आहे. रायगड जिल्ह्याचा विचार केल्यास बहुतांश नगरपालिकांमध्ये सरळ लढती पहायला मिळाल्याने या लढती तुल्यबळ ठरतील, असा अंदाज सर्वत्र वर्तवला जात आहे. युती आघाड्यांची गणिते बिघडली आणि स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणे उदयास आली, हे मतदारांच्या पचनी पडले आहे का, ते २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.


रायगड जिल्ह्यात महायुतीमधील घटक पक्ष एकत्र गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे येऊ शकले नाहीत. शिवसेना शिंदे दोन्ही पक्ष आमने-सामने लढल्याने दोन्ही पक्षांना मतविभाजनाची चिंता सतावत आहे. मात्र, निकालाबाबत वेगवेगळे दावे-प्रतिदावे होताना दिसत आहेत. उमेदवारांपेक्षा त्यांचे समर्थक आणि कार्यकर्ते उत्साहाने विजय आपलाच असल्याचे ठासून सांगत आहेत. यावरून मतांच्या आकड्यांसह पैजा लागत आहेत.

Comments
Add Comment

Eknath Shinde : रायगड किल्ल्यावरून परतताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त बाईक स्वाराला दिला मदतीचा हात

विचारपूस करत ताफ्यातील रुग्णवाहिकेतून नजीकच्या रुग्णालयात केले दाखल रायगड : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३

Eknath Shinde: रायगड किल्ल्यावरील पाण्याचे दुर्भिक्ष दूर करणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही; शिवछत्रपतींचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा मुंबई :

Dam Water Levels : रायगड जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ

जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा अलिबाग : रायगड जिल्ह्यात मागील

RTI : माहिती अधिकार कायद्यात मोठे बदल; महाराष्ट्र शासनाचे नवे नियम लागू

रायगड : माहितीचा अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत अर्जदारांसाठी महाराष्ट्र शासनाने काही महत्त्वपूर्ण बदल लागू केले

Nitesh Rane : रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा

मुंबई,  : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक

Ashish Shelar : रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी समन्वित कृती आराखडा तयार करून कामांना गती द्या

मुंबई,: रायगड किल्ल्याच्या संवर्धन व विकासासाठी राज्य शासनाकडून निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही.