Ashish Shelar : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा बरी, विचारांवर नेहमीच खरी!' आशिष शेलारांची कवितेतून संजय राऊतांवर जहरी टीका

राऊतांच्या पुनरागमनावर मंत्री शेलारांची उपरोधिक टोलेबाजी


मुंबई : महाराष्ट्र राज्याचे राजकारण सध्या आरोप-प्रत्यारोपांनी तापलेले असतानाच, भाजपचे दिग्गज नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर 'काव्यप्रहार' केला आहे. संजय राऊत यांनी प्रकृतीच्या कारणास्तव काही काळ विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदा सुरू केल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर शेलारांनी ट्विटरच्या (X) माध्यमातून एक उपरोधिक कविता शेअर करत राऊतांच्या कार्यशैलीवर आणि त्यांच्या भाषेवर जोरदार टीका केली आहे.



"सकाळचा भोंगा पुन्हा सुरू झाला" आशिष शेलार यांनी आपल्या कवितेत संजय राऊत यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदांचा उल्लेख 'सकाळचा भोंगा' असा केला आहे. राऊत यांनी "मी तीन महिन्यांनी परत येईन" असे म्हटले होते, मात्र ते एका महिन्याच्या आतच परतल्याचा टोला शेलारांनी लगावला. "विश्वविख्यात प्रवक्त्यांना ठणठणीत पाहून बरे वाटले, पण आता महाराष्ट्राचा सकाळी सकाळी चॅनेल बदलण्याचा हंगाम परत आला आहे," असे म्हणत त्यांनी राऊतांच्या भाषणांतील कंटाळवाणेपणावर बोट ठेवले.

हास्यजत्रेची तुलना आणि 'उखाड दिया'चा उल्लेख शेलार यांनी आपल्या कवितेत लोकप्रिय विनोदी कार्यक्रम 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' याचा संदर्भ दिला आहे. ते म्हणतात, "यांना ऐकण्यापेक्षा महाराष्ट्राची हास्यजत्रा बरी, विनोदी असली तरी ती विचारांवर नेहमीच खरी!" संजय राऊत यांच्या आक्रमक भाषेवर टीका करताना शेलार पुढे म्हणतात की, हे प्रवक्ते खूप बोलतात, कोणाचेही नाव घेतात आणि 'उखाड दिया'ची गर्जना करतात. मात्र, अशा गर्जना करून ते स्वतःच्याच पक्षाला उखडून टाकत असल्याचा दावा शेलारांनी केला आहे.

२९ महापालिकांतील पराभवाचे भाकीत कवितेच्या शेवटी शेलारांनी राजकीय इशाराही दिला आहे. संजय राऊत हे त्यांच्या पक्षाचे 'हुकमाचे एक्के' असल्याचे म्हटले जाते, पण हे 'विश्वविख्यात' प्रवक्ते जितके जास्त बोलतील, तितका त्यांच्या पक्षाचा आगामी २९ महापालिकांमध्ये पराभव पक्का आहे, असा घणाघात शेलारांनी केला आहे. राजकीय वर्तुळात चर्चा आशिष शेलार यांची ही कविता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून भाजप समर्थकांकडून तिला दाद मिळत आहे. तर दुसरीकडे, ठाकरे गटाकडून या टीकेला काय उत्तर मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. शेलार आणि राऊत यांच्यातील हा 'ट्विटर वॉर' आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अधिक तीव्र होण्याची चिन्हे आहेत.
Comments
Add Comment

DCM Eknath Shinde : उपमुख्यमंत्री शिंदेंनी केली मिसिंग लिंकच्या कामाची पाहणी, महाराष्ट्र दिनी होणार उद्घाटन; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील घाटाला मिळणार बायपास

मुंबई : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे

HSC RESULT : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ?

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावीचा निकाल कधी जाहीर होणार ? हा प्रश्न

MSRTC : 'आपली बस, आपली सेवा'; एसटी महामंडळाची नवी मोहीम

मुंबई : महाराष्ट्राच्या जीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं

New Rule For Hotel : हॉटेलच्या मेन्युकार्डवर ‘पनीर’ किंवा ‘चीज ॲनालॉग’चा वापराचा उल्लेख बंधनकारक

मुंबई : पनीरच्या नावाखाली चीज ॲनालॉगचा वापर होत असल्याबाबतच्या तक्रारीनंतर अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नवीन

Sanjay Nirupam : निरुपम यांच्या कारची हवा काढणाऱ्यांना जामीन मंजूर

मुंबई : शिवसेनेचे संजय निरुपम दहिसरमध्ये रिक्षा - टॅक्सी चालकांशी संवाद साधण्यासाठी गेले होते. त्यावेळी

Maharashtra Weather : राज्यात उष्णतेचा कहर; ६ जिल्ह्यांना उष्णतेचा, तर १० जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

मुंबई : महाराष्ट्राचं हवामान बिघडलय आणि याचा फटका सर्वांनाच बसतो आहे. राज्यावर दुहेरी संकट आल्याचं चित्र