भयानक हत्याकांड; जौनपूरमध्ये मुलानेच आई-वडिलांची निर्घृण हत्या करून मृतदेहाचे तुकडे नदीत फेकले

जौनपूर : उत्तर प्रदेशातील जौनपूर जिल्ह्यातून एक धक्कादायक हत्याकांड समोर आले आहे. जाफराबाद पोलीस स्टेशन हद्दीतील अहमदपूर गावात अंबेश कुमार या तरुणाने आपली आई बबिता (६०) आणि वडील श्यामलाल (६२) यांची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर आरोपीने दोघांच्या मृतदेहांचे तुकडे करून ते वेगवेगळ्या ठिकाणी नदीत फेकल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.


पोलिसांच्या चौकशीत अंबेश कुमारने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याने प्रथम आईची हत्या केल्यानंतर वडिलांचा गुदमरून मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर दोघांच्या मृतदेहांचे तुकडे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीचे वडील श्यामलाल हे रेल्वेचे निवृत्त लोको पायलट होते. ८ डिसेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास अंबेश आणि त्याच्या वडिलांमध्ये पैशाच्या कारणावरून जोरदार वाद झाला होता. या वादातूनच अंबेशने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.


हत्येनंतर आरोपीने मृतदेहांचे तुकडे सहा पोत्यांमध्ये भरून ते आपल्या गाडीच्या डिक्कीत ठेवले. घरातील रक्ताचे डाग साफ करून आणि कपडे धुऊन त्याने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पहाटे चार ते पाचच्या दरम्यान तो गाडीतून निघून गेला. वडिलांच्या मृतदेहाचे तुकडे गोमती नदीच्या बेलाव घाटावर फेकण्यात आले, तर आईच्या मृतदेहाचे तुकडे जलालापूर परिसरातील साई नदीत टाकण्यात आले. नदीत मृतदेहाचे अवयव आढळल्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली.


पोलिस तपासात कौटुंबिक वादाचा आणखी एक धागा समोर आला आहे. लॉकडाऊन काळात अंबेश कुमारने कोलकातामधील सहजिया नावाच्या महिलेशी विवाह केला होता. ती कोलकातामध्ये ब्युटी पार्लर चालवते. मात्र कुटुंबीय या विवाहास विरोध करत होते आणि अंबेशवर घटस्फोट घेण्यासाठी दबाव टाकत होते. घटस्फोटासाठी पैशांच्या मागणीवरून घरात सतत वाद होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेने जौनपूरसह संपूर्ण उत्तर प्रदेशात खळबळ उडवून दिली आहे.

Comments
Add Comment

Eknath Shinde : विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकार कटिबद्ध, नीट पेपर लीक प्रकरणात केंद्राच्या ऐतिहासिक निर्णयाला महाराष्ट्राचा पाठिंबा

विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी सरकार कटिबद्ध – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पेपर लीक रोखण्यासाठी फास्ट ट्रॅक

Pandharpur : पंढरपूरमध्ये पोहोचले १५ लाख भाविक, संतांचे पालखी सोहळे पंढरीत दाखल; चंद्रभागेला भक्तिचा महापूर

पंढरपूर : आषाढी एकादशीला विठुरायाचे रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी पंढरपूरमध्ये १५ लाख भाविक पोहोचले आहेत. हा आकडा

Narendra Modi : नीट पेपरफुटी प्रकरणी मोठी कारवाई, NTA च्या ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणी मोदी सरकारने मोठी कारवाई केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र

ISSF World Cup : आयएसएसएफ विश्वचषक: सैन्यमने १० मीटर एअर पिस्तूलमध्ये पटकावले रौप्यपदक

नवी दिल्ली : भारताची नेमबाज सैन्यम हिने चीनमधील हांगझोउ येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक

Amravati : राज्यात खरीप पेरण्यांना वेग; २० जुलैअखेर ७४ टक्के पेरणी पूर्ण, अमरावती विभाग आघाडीवर

मुंबई : जून महिन्यात पावसाने ओढ दिल्यामुळे राज्यभरातील खरीप हंगाम धोक्यात आला होता. वेळेवर पाऊस न झाल्याने

Mega Block : रविवारी ठाणे-कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक २६ जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे