गुटखा उत्पादक आणि सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी सरकार विशेष धोरण आणणार

मंत्री नरहरी झिरवाळ यांची माहिती; गुटखा उत्पादकांवर नवीन वर्षांत मकोका लागणार


मुंबई : राज्यात गुटख्यावर बंदी असूनही शाळा-महाविद्यालय परिसरात त्याची विक्री सर्रास होत असल्याने सरकार आता कठोर पावले उचलण्याच्या तयारीत आहे. गुटखा उत्पादक आणि सूत्रधारांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष धोरण आणले जाणार असून, मकोका कायद्यात आवश्यक दुरुस्त्या करून येत्या नव्या वर्षात गुटखा उत्पादकांवर मकोका लागू करण्यात येणार असल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.


यापूर्वी गुटखा उत्पादक आणि विक्रेत्यांवर मकोका लावण्यासाठीचा प्रस्ताव विधि आणि न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता. मात्र, कायद्यातील तरतुदींनुसार 'हार्म आणि हर्ट' या दोन्ही घटकांच्या अभावी तो लागू होऊ शकत नव्हता. त्यामुळे कायद्यात बदल करून गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर मकोका लागू करण्यासाठी आवश्यक दुरुस्त्या केल्या जाणार आहेत. हा कायदा अधिक कठोर करण्याबाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली होती.


नागपूरच्या हिवाळी अधिवेशनानंतर अन्न आणि औषध प्रशासन विभागाने यावर काम सुरू केले आहे. गुटखा उत्पादकांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष धोरण आणि कायद्यातील त्रुटी दूर करण्यासाठी दुरुस्ती प्रस्ताव लवकरात लवकर विधी आणि न्याय विभागाकडे पाठवण्याचे निर्देश मंत्री झिरवाळ यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Comments
Add Comment

पेपर सुरु असताना विद्यार्थिंनीसोबत घडला लाजिरवाणा प्रकार, नेमकं घडलं काय?

नाशिक: नाशिकमध्ये माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली. १३ मार्च रोजी दहावीचा पेपर सुरू असताना एका

सहावीत शिकणाऱ्या मुलीवर ॲसिड हल्ला करणाऱ्या आरोपीचे रेखाचित्र जारी; पोलिसांनी केलं आवाहन

संगमनेर: अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील ॲसिड हल्ला प्रकरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. एका सहा

मुंबईतील जन्म, मृत्यू प्रमाणपत्रांच्या प्रक्रियेचे ऑडिट, भाजपाने का केली मागणी?

मुंबई: मुंबईत बोगस जन्म प्रमाणपत्रे दिली जात असल्याचे प्रकार निदर्शनास आल्याने जन्म नोंदणी व जन्म प्रमाणपत्र

कडक शिस्तीच्या महापौर बाई, जेव्हा सभागृहात किशोरी पेडणेकर यांना चिडीचूप करतात तेव्हा...

मुंबई: मुंबई महापालिकेत उबाठाला आता २५ वर्षांनंतर विरोधी बाकांवर बसण्याची वेळ आली आहे. मात्र, या विरोधी बाकांवर

इराणप्रश्नी भारताने ठाम भूमिका घ्यायला हवी होती; राज ठाकरेंचे वक्तव्य

मुंबई: "इराणने दीर्घकाळ भारताला साथ दिली. आता त्या देशावर हल्ले होत असताना भारतानेही ठामपणे पाठिंबा द्यायला हवा

महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी आणि पायाभूत सुविधा उभारण्यावर भर; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कंटेंट क्रिएटर्ससोबत संवाद

मुंबई: महाराष्ट्रात गेमिंग, क्रिएटर इकॉनॉमी, शिक्षण आणि डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यासाठी शासन सक्षम वातावरण