पूर्वमुक्त मार्गावरील आणिक पांजरपोळ दुहेरी बोगदा होणार अधिक प्रकाशमान

विद्युतभाराची क्षमता वाढवणार


मुंबई : मुंबईतील पूर्वमुक्त मार्ग अर्थात इस्टर्न फ्री वेवरील आणिक पांजरपोळ भुयारी वाहतूक मार्गामध्ये मार्ग दिवे प्रकाशमान नसल्याने याठिकाणी विद्युत व्यवस्था कमजोर असल्याने यामध्ये अंधूक प्रकाश पसरतो. परिणाली या भुयारी वाहतूक मार्गामध्ये सुधारणा करण्यात येत आहे. यामध्ये विद्युत व्यवस्थेसह आता एक्झॉस्ट प्रणालीही समक्ष केली जाणार आहे.


मुंबई महानगरपालिकेच्या अखत्यारीतील पूर्वमुक्त मार्गामध्ये बांधलेले भारतातील पहिले दुहेरी बोगदे ५०५ मीटर उत्तरेकडे आणि ५५५ मीटर दक्षिणेकडे इतक्या लांबीचे तसेच प्रत्येकी १८ मीटर रुंदी आणि ९ मीटर उंचीचे आहेत. हे दुहेरी बोगदे हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने अर्थात एमएमआरडीएने आणिक पांजरपोळ लिंक रोड (एपीएलआर) प्रकल्पाचा भाग म्हणून बांधण्यात आले होते. हे दुहेरी बोगदे त्यानंतर मुंबई महानगरपालिकेस सुपुर्द करण्यात आले आहेत. जून २०१३ मध्ये हा मार्ग जनतेसाठी खुला करण्यात आला आहे. अशा प्रकारची बोगदा प्रणाली ही शहराच्या अखत्यारीत तयार करण्यात आलेली असून ती शहरी वाहतुकीकरिता वापरली जाणारी भारतातील पहिली बोगदा प्रणाली म्हणून ओळखली जाते.


पूर्वमुक्त मार्गाच्या दुहेरी बोगदयांमध्ये कराव्याच्या कामाच्या प्रमाणाची माहिती घेण्यासाठी महापालिकेच्या रस्ते विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ परिक्षण केली. या परिक्षणादरम्यान, या ठिकाणी असलेली विद्यमान प्रकाश व्यवस्था आणि इतर विद्युतभार एलटी कनेक्शनवर असल्याचे दिसून आले. विद्यमान विद्युत व्यवस्थेसाठी आवश्यक भार १२५ किलोवॅट आहे. परंतु येथील विद्युतभाराची क्षमता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार नवीन अद्ययावत प्रकाश व्यवस्था आणि एक्झॉस्ट प्रणालीसाठी आवश्यक भार सुमारे ५०० किलोवॅट आणि त्याहून अधिक वाढवण्यात येत आहे. त्यानुसार यांत्रिक व विद्युत विभागाच्यावतीने निविदा मागवून याचे काम हाती घेण्यात येत असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी सुमारे सव्वा पाच कोटी रुपयांचा खर्च केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हे काम पुढील ९ महिन्यांमध्ये पूर्ण केले जाईल असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

अनधिकृत ‘एलईडी’ मासेमारी करणाऱ्यांना मत्स्यव्यवसाय विभागाचा दणका

मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार गस्ती मोहीम; तीन नौकांवर कठोर कारवाई मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत

शेतकऱ्यांना पीक विम्याचे हेक्टरी १७ हजार ५०० रुपये मिळणार; पण काय सांगतो नियम आणि शेतकऱ्यांना मिळणार किती फायदा ?

पुणे : यंदाच्या खरीप हंगामात राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पिके

माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला

मुंबई : बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय सदनिका मिळवल्याप्रकरणी नाशिक सत्र न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा

तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडू नये ! - महसूलमंत्र्यांच्या स्पष्ट सूचना

महसूल विभागाचा ‘डिजिटल’ कायापालट! मुंबई :  छोट्या-छोट्या तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांची कामे अडता कामा

Pench : पेंच व्याघ्र प्रकल्पात आता 'सोलर बोट'ची सफारी लवकरचं पर्यटकांच्या सेवेत!

किरंगीसरा ते नवेगाव खैरी दरम्यान धावणार पर्यावरणपूरक 'सोलर बोट' पेंच : निसर्गप्रेमी आणि वन्यजीव पर्यटकांसाठी एक

Gold Silver Rate: सोने १३५००० जवळ चांदी २१०००० पार! सोन्याचांदीच्या वाढत्या रॅलीचे काय रहस्य? जाणून घ्या इत्यंभूत माहिती एका क्लिकवर

मोहित सोमण: आज प्रामुख्याने भूराजकीय अस्थिरतेचा फटका बाजारात बसल्याने सोने चांदी प्रचंड महाग झाले आहे. प्रति