देशाच्या साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी

उत्तर प्रदेशही शर्यतीत पुढे


मुंबई : यंदाच्या साखर हंगामाची सुरुवात उत्साहवर्धक झाली आहे. १५ डिसेंबरपर्यंत देशभरातील ४७९ साखर कारखान्यांनी ७७.९० लाख टन साखरेचे उत्पादन नोंदवले आहे. गेल्या वर्षी याच काळात ४७३ कारखान्यांनी फक्त ६०.७० लाख टन साखर उत्पादन केले होते. उस गळीत हंगामाने गत दीड महिन्यात मोठी गती घेतली असून, ऊस पट्ट्यात पडलेली चांगली थंडी, कारखान्यांची वाढलेली गाळप क्षमता, तसेच तोडणी-वाहतुकीचे नियोजन या सर्व अनुकूल परिस्थितीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरीत राज्यांमधील ९३ कारखान्यांनी एकूण ६.०५ लाख टन साखर तयार केली आहे.


साखर उत्पादनाची स्थिती चांगली असली तरी, कारखान्यांमधील विक्री दर सरासरी ३७ रुपये प्रति किलो राहिला आहे. साखरेच्या विक्री दरातील घसरणीमुळे कारखान्यांच्या खेळत्या भांडवलावर परिणाम झाला असून, सुमारे १.३० लाख कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. महासंघाच्या म्हणण्यानुसार, साखरेचे विक्री दर ३१ रुपयांपासून ४१ रुपयांपर्यंत वाढविणे गरजेचे आहे. इथेनॉलसाठी अतिरिक्त ५ लाख टन साखर वळविण्याचा प्रस्ताव स्वीकारल्यास, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील उद्योगाला आर्थिक स्थैर्य मिळू शकेल. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले, "केंद्र सरकारने एफआरपी, कापणी आदींमुळे साखर उत्पादनाचा खर्च वाढल्याने थकीत रक्कम सोडवण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे."


राज्यनिहाय स्थिती अशी आहे


महाराष्ट्र : १९० कारखान्यांनी ३७९ लाख टन उसाचे गाळप करून ३१.३० लाख टन साखर उत्पादन केले आहे.


उत्तर प्रदेश : १२० कारखान्यांनी २६४ लाख टन ऊस गाळप करून २५.०५ लाख टन साखर तयार केली आहे.


कर्नाटक : ७६ कारखान्यांनी १८६ लाख टन उसाचे गाळप करून १५.५० लाख टन साखर उत्पादन केले आहे.

Comments
Add Comment

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Port Crane Accident : मुंबई पोर्टवर कार्गो उचलताना मोठी दुर्घटना; क्रेनला आग, दोन ऑपरेटर जखमी

मुंबई : मुंबई पोर्ट परिसरातील बीपीएस (BPS) पोर्ट येथे कार्गो उचलण्याच्या कामादरम्यान रविवारी (३० ऑगस्ट) सायंकाळी

Devendra Fadnavis : मराठा आंदोलनप्रश्नी मार्ग काढू, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

नागपूर : मराठा समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्यातील कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या मागण्यांवर सकारात्मक विचार