देशाच्या साखर उत्पादनात महाराष्ट्राची आघाडी

उत्तर प्रदेशही शर्यतीत पुढे


मुंबई : यंदाच्या साखर हंगामाची सुरुवात उत्साहवर्धक झाली आहे. १५ डिसेंबरपर्यंत देशभरातील ४७९ साखर कारखान्यांनी ७७.९० लाख टन साखरेचे उत्पादन नोंदवले आहे. गेल्या वर्षी याच काळात ४७३ कारखान्यांनी फक्त ६०.७० लाख टन साखर उत्पादन केले होते. उस गळीत हंगामाने गत दीड महिन्यात मोठी गती घेतली असून, ऊस पट्ट्यात पडलेली चांगली थंडी, कारखान्यांची वाढलेली गाळप क्षमता, तसेच तोडणी-वाहतुकीचे नियोजन या सर्व अनुकूल परिस्थितीमुळे उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. उर्वरीत राज्यांमधील ९३ कारखान्यांनी एकूण ६.०५ लाख टन साखर तयार केली आहे.


साखर उत्पादनाची स्थिती चांगली असली तरी, कारखान्यांमधील विक्री दर सरासरी ३७ रुपये प्रति किलो राहिला आहे. साखरेच्या विक्री दरातील घसरणीमुळे कारखान्यांच्या खेळत्या भांडवलावर परिणाम झाला असून, सुमारे १.३० लाख कोटी रुपयांची एफआरपी थकीत आहे. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केंद्र सरकारकडे तातडीने धोरणात्मक निर्णय घेण्याची मागणी केली आहे. महासंघाच्या म्हणण्यानुसार, साखरेचे विक्री दर ३१ रुपयांपासून ४१ रुपयांपर्यंत वाढविणे गरजेचे आहे. इथेनॉलसाठी अतिरिक्त ५ लाख टन साखर वळविण्याचा प्रस्ताव स्वीकारल्यास, महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील उद्योगाला आर्थिक स्थैर्य मिळू शकेल. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील म्हणाले, "केंद्र सरकारने एफआरपी, कापणी आदींमुळे साखर उत्पादनाचा खर्च वाढल्याने थकीत रक्कम सोडवण्यासाठी धोरणात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे."


राज्यनिहाय स्थिती अशी आहे


महाराष्ट्र : १९० कारखान्यांनी ३७९ लाख टन उसाचे गाळप करून ३१.३० लाख टन साखर उत्पादन केले आहे.


उत्तर प्रदेश : १२० कारखान्यांनी २६४ लाख टन ऊस गाळप करून २५.०५ लाख टन साखर तयार केली आहे.


कर्नाटक : ७६ कारखान्यांनी १८६ लाख टन उसाचे गाळप करून १५.५० लाख टन साखर उत्पादन केले आहे.

Comments
Add Comment

गोरेगाव संतोषनगरमध्ये दोन गटात हाणामारी,महापालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर चालवला गेला 'बुलडोझर'

मुंबई : गोरेगाव पूर्व येथील संतोषनगर परिसरात रविवारी घडलेल्या हिंदू आणि मुस्लिम गटांतील हाणामारीच्या घटनेनंतर

महापालिका शाळांमधील वाचन कौशल्य पाहून आयुक्तही भारावले, मुलांच्या पाठीवर मारली कौतुकाची थाप

मुंबई: दादर येथील येथील भवानी शंकर मार्ग शाळेत महानगरपालिका आयुक्त आश्विनी भिडे यांनी पूर्व प्राथमिकसह

मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प ८०० कोटी रुपयांच्या अंतर्गत फेरफारीसह स्थायी समितीत मंजुर

मुंबई: मुंबई महापालिकेचा सन २०२६-२७च्या अर्थसंकल्पाला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. तब्बल ८०० कोटी रुपयांच्या

मुंबईतील रेलिंगचे वाढीव दराने कंत्राट कुणाच्या दबावाखाली दिले; शिवसेना अमेय घोले यांचा उबाठाला सवाल

मुंबई: मुंबई महापालिकेच्यावतीने संभाव्य कंत्राट कामांच्या निविदा भाजपने पारदर्शी कारभाराची चुणूक दाखवून रद्द

२०२९ चा संकल्प पूर्ण करण्यासाठी भाजपाचा कार्यकर्ता सज्ज; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांचा विश्वास

मुंबई: देशात आणि महाराष्ट्रात जनतेमध्ये भारतीय जनता पक्षाविषयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आणि

Ahilyanagar: लग्नाच्या आमिषाने तरुणीचे लैंगिक शोषण; श्रीरामपूरात गुन्हा दाखल

श्रीरामपूर: लग्नाचे आमिष दाखवून एका २३ वर्षीय तरुणीचे दीर्घकाळ लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अक्षय विश्वनाथ गवळी