अंबरनाथ, बदलापूरच्या विकासाला चालना देणार, पुढच्या चार महिन्यात मेट्रो १४ चे काम सुरू होणार


अंबरनाथ : मुंबई महानगर क्षेत्रात दोन लाख कोटींची कामे सुरू आहेत. मेट्रोच्या नेटवर्कच्या माध्यमातून अंबरनाथ, बदलापूर ही शहरे जोडली जाणार आहेत. कांजुरमार्ग ते बदलापूर या मेट्रो १४ चे काम येत्या चार महिन्यात सुरू होणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. ते अंबरनाथ नगर परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी घेतलेल्या सभेत बोलत होते. मेट्रो ५, १२, १४ चा फायदा अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये राहणाऱ्यांना होणार आहे; असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.


मुंबई महानगर क्षेत्राचा विकास करायचा आहे. अंबरनाथ शहरासाठीही माझे स्वप्न आहे. या स्वप्नाच्या पूर्ततेसाठी आमच्या उमेदवाराला विजयी करा, असे आवाहन फडणवीस यांनी यावेळी केले.


राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान झाले आहे. आता २० डिसेंबर रोजी नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी दुसऱ्या टप्प्याचे मतदान आहे. मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आधी एकाच टप्प्यात नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी निवडणूक घेण्याचे जाहीर केले होते पण २ डिसेंबरच्या मतदानाला दोन दिवस उरले असताना निवडणूक दोन टप्प्यात घेण्याची घोषणा करण्यात आली. वेळापत्रकात दुरुस्ती करण्यात आली. यामुळे अंबरनाथ नगर परिषदेची निवडणूक पुढे ढकलली गेली. ही निवडणूक पुढे गेली म्हणूनच अंबरनाथला येता आले असे मुख्यमंत्री म्हणाले.


अंबरनाथ हे मुंबईचे प्रवेशद्वार आहे. भाजपचा विकासाचा अजेंडा सांगण्यासाठी इथे आलो आहे, मी कुणावरही टीका करण्यासाठी आलेलो नाही, असे सांगत फडणवीस यांनी भाषणाच्या सुरूवातीलाच आपण शिवसेनेवर टीका करणार नाही हे स्पष्ट केले. यावेळी बोलताना रेल्वे, मेट्रो प्रकल्पांची माहिती देत त्याचा अंबरनाथ, बदलापूरला फायदा होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कल्याण बदलापूर तिसरी चौथी मार्गिका झाल्यास दर दहा मिनिटाला लोकल मिळेल, असेही फडणवीस म्हणाले. सर्व साध्या लोकल वातानुकूलीत करण्यासाठी २३८ रॅक्सची मागणी करत आहोत. लवकरच सर्व लोकल कोणत्याही भाडेवाढीविना वातानुकूलीत होतील, असेही फडणवीस म्हणाले.


अंबरनाथमध्ये भाजपने नगराध्यक्ष पदाचा युवा आणि सुशिक्षित उमेदवार दिला आहे. त्या सनदी लेखापाल आहेत. त्या सर्व हिशोब ठेवतील आणि सर्वांचा हिशोब करतीलही, असे फडणवीस यावेळी म्हणाले. भाजप उमेदवारांची स्वप्ने ही माझे स्वप्ने असून ही स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्यांना निवडून द्या असे आवाहन त्यांनी यावेळी केले.


फक्त नगराध्यक्ष नाही तर नगरसेवकही निवडून द्यायला हवेत, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, वनमंत्री गणेश नाईक, आमदार किसन कथोरे, कुमार आयलानी, सुलभा गायकवाड, चित्रा वाघ, माजी मंत्री कपिल पाटील यांच्यासह भाजपचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.


Comments
Add Comment

Kolhapur Crime : आईच्या आजारपणाचा गैरफायदा घेत मुख्याद्यापकानेच विद्यार्थिनीला फ्लॅटवर नेत...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील एका आश्रमशाळेशी संबंधित प्रकरणामुळे खळबळ उडाली आहे.

दौंडमध्ये राजकीय कार्यकर्त्यावर भररस्त्यात हल्ला; पोलीस ठाण्याजवळच घडले 'हे' धक्कादायक दृश्य

पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड शहरात घडलेल्या एका घटनेमुळे स्थानिक कायदा-सुव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह

मतदानाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत वाहतूक नियोजनात बदल; काही मार्गांवर प्रवेश मर्यादित

मुंबई : राज्यातील महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्या मतदान होणार असून, या प्रक्रियेच्या सुरळीत अंमलबजावणीसाठी

मशीदीवरचे भोंगे पुन्हा लावण्याचे वचन देऊन उद्धव ठाकरेंनी प्रचार केला

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; कुणाचाही महापौर झाला तरी आम्ही भोंग्यांना परवानगी देणार नाही मुंबई :

संक्रांतीच्या उत्सवाला गालबोट; अहिल्यानगर जिल्ह्यात पतंग उडवताना चिमुकल्याचा....

अहिल्यानगर : मकर संक्रांतीच्या दिवशी आनंद आणि उत्साहाचं वातावरण असतानाच अहिल्यानगर जिल्ह्यात एक हृदयद्रावक

BMC Election 2026 : महापालिका निकाल प्रक्रियेत बदल; मुंबईत मतमोजणीसाठी नव्या नियमांची अंमलबजावणी

मुंबई : राज्यात महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. १५ जानेवारी रोजी मतदान